AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

त्यांच्यासाठी व्होट जिहाद महत्त्वाचा, तर आमच्यासाठी…, वांद्रे अतिक्रमण हटाव मोहिमेवर किरीट सोमय्या यांची पहिली प्रतिक्रिया

वांद्रेमधील गरीब नगर झोपडपट्टीमधील अतिक्रमण हटवण्यास पश्चिम रेल्वेकडून सुरुवात झाली आहे. यावर आता भाजप नेते किरीट सोमय्या यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

त्यांच्यासाठी व्होट जिहाद महत्त्वाचा, तर आमच्यासाठी..., वांद्रे अतिक्रमण हटाव मोहिमेवर किरीट सोमय्या यांची पहिली प्रतिक्रिया
Kirit SomaiyaImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 20, 2026 | 7:08 PM
Share

मुंबईतील वांद्रे परिसरात असलेल्या गरीब नगरमधील झोपडपट्टीवर पश्चिम रेल्वेकडून अखेर बुलडोझर कारवाईला सुरुवात झाली आहे. कोर्टाच्या आदेशानुसार येथील अतिक्रमण हटवण्यात येत आहे. दरम्यान या कारवाईमुळे गरीब नगरमधील झोपडपट्टीमधील रहिवासी चांगलेच आक्रमक झाले आहेत. या ठिकाणी मोठा गोंधळ निर्माण झाला आहे.  स्थानिकांनी आधी पोलिसांच्या दिशेनं बाटल्या फेकल्या त्यानंतर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी  सौम्य लाठीचार्ज केला, परंतु त्यानंतर स्थानिकांकडून पोलिसांवर दगडफेक देखील करण्यात आली, त्यानंतर पोलिसांनी पुन्हा लाठीचार्ज केला. या घटनेत काही पोलीस जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान दगडफेक करणाऱ्या लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या अतिक्रमण हटाव मोहिमेवर आता भाजप नेते किरीट सोमय्या यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

नेमकं काय म्हणाले किरीट सोमय्या?   

काही लँड माफिया, लँड जिहादवाल्यांनी तिथे अडथळे निर्माण केले आहेत. कोर्टाने आदेश दिले आहेत, तोडकाम झालेले आहे, अजून काही बाकी आहे.  काही लँड जिहादी माफिया, मुस्लिम माफिया, बांगलादेशी माफिया आता तिथे लोकांना भडकाऊन अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, हे आम्हाला मान्य नाही. असं सोमय्या यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की,  जो कोणी पोलिसांवर हल्ला करणार, जो कोणी रेल्वेच्या जमिनी बळकवण्याचा प्रयत्न करणार त्यांना राजकीय नेते, पक्ष शिवसेना ठाकरे गट, एमआयएम, नवीन मुस्लिम लिग, काँग्रेस हे उसकवण्याचा प्रयत्न करणार, कारण त्यांच्यासाठी व्होट जिहाद महत्त्वाचा आहे, आमच्यासाठी देशाची सुरक्षा महत्त्वाची आहे. पोलिसानी संयम ठेऊन या सगळ्यांना इथून हाकलायचे आहे, आणि त्यांना जर कोणी उसकवणार असेल तर त्यातील एकालाही सोडू नका, अशी प्रतिक्रिया यावर सोमय्या यांनी दिली आहे.

दरम्यान पश्चिम रेल्वेच्या सीपीआरओ यांनी दिलेल्या माहितीनुसार  या भागातील सुमारे 500 अतिक्रमणे हटवण्यात येणार आहेत. अतिक्रम हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. यासाठी घटनास्थळी  १२०० कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. ज्यामध्ये आरपीएफ, जीआरपी आणि शहर पोलीस यांचा समावेश आहे.

Follow Us
अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं
Andheri Accident | अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं, रिक्षांचा चुराडा
अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Devendra Fadnavis on Ajit Pawar Accident | अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर CM फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Devendra Fadnavis | कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... मुख्यमंत्री फडणवीस नेमकं काय म्हणाले?
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून शिंदेंचा ठाकरे गटावर...
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून उपमुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल
रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही..
Ramesh Mhatre | डॉक्टर मारहाण प्रकरणात रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही कारवाईचे संकेत?
सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
Sudhir Mungantiwar | सत्ता आली की वचन विसरलात?; सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू...
Pandharpur Wari Chori News | पालखी सोहळ्यात चोरट्यांचा सुळसुळाट! खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू अनावर
सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
Beed kej Morcha | विलास घुले हत्या प्रकरण पेटलं! सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात काय घडतंय?
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात मोठं काय घडतंय? चर्चांना वेग
नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील... ठाकरे गटाची मोठी पोलखोल
Nashik Thackeray Nagarsevak | नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील त्यांना... ठाकरे गटाची पत्रकार परिषदेत मोठी पोलखोल