AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जे अस्तित्वहीन आहेत, त्यांनी एकनाथ शिंदेंवर…; कुणी डागलं उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र

Uday Samant on Uddhav Thckeray CM Eknath Shinde : शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याने शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार शाब्दिक हल्ला केला आहे. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. ते नेमकं काय म्हणाले? वाचा सविस्तर...

जे अस्तित्वहीन आहेत, त्यांनी एकनाथ शिंदेंवर...; कुणी डागलं उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र
Uddhav ThackerayImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 24, 2024 | 3:44 PM
Share

राजकारण करणं म्हणजे एखादा लेख लिहिण्यासारखं नाही. त्यानं ते केलं म्हणून यानं हे करायचं. महाराष्ट्रातील जनतेला सर्व कळालं आहे. 2019 साली बाळासाहेब ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांचे फोटो लावून आम्ही निवडून आलो. त्यानंतर सत्येसाठी, कुणाच्या पदासाठी आम्ही काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसलो हे महाराष्ट्राला माहिती आहे. गद्दार आणि खोके हा विषय संपला आहे.. सत्ता असताना अजितदादा सोबत आले त्याचं कारण म्हणजे हे सरकार गतिमान आहे. 215 पेक्षा जास्त आमदार आमच्याकडे आहे, लोकसभा आणि विधानसभा देखील आमचीच आहे, असं म्हणत शिवसेनेचे नेते, राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ते कोल्हापुरात माध्यमांशी बोलत होते.

ठाकरे-राऊतांना टोला

ज्यांचे आधीच अस्तित्व संपलेलं आहे. त्यांनी दुसऱ्याच्या अस्तित्वाची चिंता करू नये. जे अस्तित्वहीन झाले आहेत त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर बोलू नये. ज्यांचे कुणी ऐकत नाही. ज्यांना कुणी पाहत नाही. ज्यांच्या सभांना कोण बघत नाही. त्यांनी आमच्या नेतृत्वावर बोलू नये, असं म्हणत उदय सामंत यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

प्रियांका गांधींना टोला

कुणाच्या घराणेशाहीवर जाऊ नये. पण दागिने गहाण ठेवले म्हणजे त्यांच्याकडे किती श्रीमंती होती हे सर्वांना माहिती आहे. त्यांच्या घरातील कपडे इस्त्रीसाठी कुठं जायचं हे सगळ्यांना माहिती आहे. राहुल गांधी यांनी महिलांबाबत केलेलं वक्तव्य सगळ्यांनी पाहिलं आहे. त्यावर पडदा टाकण्यासाठी हे कदाचित बोलले असतील. मात्र भारत जोडो यात्रेचा कोणताही फायदा होणार नाही, असं म्हणत उदय सामंत यांनी प्रियांका गांधी यांच्यावर टीका केली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील महायुतीच्या दोन्ही जागा मोठ्या संख्येने निवडून येतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 27 तारखेला सभा होणार आहे. आमच्या दोन्ही उमेदवारांच्या विजयावर शिक्कामोर्तब होईल. देशात पुन्हा एकदा मोदी सरकार येईल, असा विश्वास उदय सामंत यांनी व्यक्त केला आहे.

Follow Us
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ....
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ.....
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक.
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली.
रिलायन्स इंडस्ट्रीची अमेरिकेत गुंतवणूक, संजय राऊत यांचा हल्लाबोल
रिलायन्स इंडस्ट्रीची अमेरिकेत गुंतवणूक, संजय राऊत यांचा हल्लाबोल.
व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा; हॉटेल व्यवसाय आणि उद्योग अडचणीत
व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा; हॉटेल व्यवसाय आणि उद्योग अडचणीत.
मिठी नदीच्या नाल्यातून गॅस निर्मितीचा प्रकल्प उभारा, उद्घाटनाला...
मिठी नदीच्या नाल्यातून गॅस निर्मितीचा प्रकल्प उभारा, उद्घाटनाला....
मध्यपूर्वेतील युद्धाचा इंधन पुरवठ्यावर परिणाम; ESMA कायदा लागू
मध्यपूर्वेतील युद्धाचा इंधन पुरवठ्यावर परिणाम; ESMA कायदा लागू.
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.