AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजितदादांची अजब अट! राष्ट्रवादीलाच निवडून दिलं तर 100 कोटींचा निधी देतो, लातूरमधील औसा इथले शब्द!

लातूरमधील औसा नगरपालिकेच्या विकास कामांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे नुकत्याच एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी बोलताना त्यांनी औसा येथील लोकांना थेट अट घातली. तुम्ही राष्ट्रवादीला निवडून आणलं तर तुम्हाला 100 कोटी रुपयांचा निधी देईल, असं ते म्हणाले. अजितदादांचं हे वक्तव्य सध्या चर्चेत आहे.

अजितदादांची अजब अट! राष्ट्रवादीलाच निवडून दिलं तर 100 कोटींचा निधी देतो, लातूरमधील औसा इथले शब्द!
अजित पवार, उपमुख्यमंत्री
| Edited By: मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Dec 12, 2021 | 4:21 PM
Share

लातूर (औसा): उपमुख्यमंत्री (Deputy Chief Minister) अजित पवार (Ajit Pawar) यांनी लातूर जिल्ह्यातल्या औसा नगर पालिकेत केलेलं वक्तव्य चांगलंच गाजतंय. औसा (Ausa, Latur) येथील नगरपालिकेच्या विकासकामाच्या शुभारंभासाठी आयोजित कार्यक्रमात अजित पवार बोलत होते. ते म्हणाले, नगरपालिकेला 100 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार आहे. मात्र एक अट आहे. तुम्ही जर औसा नगर पालिकेत पुन्हा राष्ट्रवादीच्याच उमेदवाराला निवडून दिले तरच हा निधी तुमच्याकडे येईल.’ अजित पवारांचं हे वक्तव्य सध्या चांगलंच चर्चेत आहे. उपमुख्यमंत्री पदावरील व्यक्तीने अशा प्रकारचं वक्तव्य करणं गैर आहे, असं मत जनसामान्यांमध्ये उमटत आहे.

..तरच 100 कोटी देतो, हा माझा शब्द!

औसा नगर पालिकेत राष्ट्रवादीच्याच पॅनलला म्हणजे डॉ. अफसर शेख यांच्या पॅनलला निवडून दिले तरच मी तुम्हाला 100 कोटी रुपयांचा विकास निधी उपलब्ध करून देतो, हा माझा शब्द आहे, असं अजित पवार या कार्यक्रमात बोलताना म्हणाले. आता 100 कोटी रुपयांच्या निधी देण्याच्या अजित पवारांच्या शब्दाकडे औसा येथील जनता कशी पाहते, हे पहावे लागेल.

विकासकामाचे उद्घाटन प्रसंगी वक्तव्य

औसा येथील विविध विकास कामाच्या उद्घाटन प्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार शनिवारी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राज्यमंत्री संजय बनसोडे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आमदार बाबासाहेब पाटील, आमदार विक्रम काळे, आमदार सतीश चव्हाण, माजी आमदार विलास लांडे आदी उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही लोक उघड्यावर शौचास बसतात, ही लाजिरवाणी बाब आहे. स्वच्छता अभियानात एकदाच पारितोषिक मिळवून चालणार नाही, तर त्यात सातत्य असणे आवश्यक आहे. यासाठी जनतेनेही आपली जबाबदारी पार पाडावी.

इतर बातम्या-

Sharad Pawar | सहकुटुंब, सहपरिवार…भावुक झालेल्या पवारांनी सांगितलं 12 डिसेंबरचं मायाळू नातं…!

VIDEO: तेरे संग यारा… टांझानियाच्या तरुणाचे आणखी एक गाणे हीट! लाजवाब लिपसिंक, नेटकरी म्हणाले awesome!

Follow Us
नागपुरात बनावट सोन्याचे दागिने गहाण ठेवून कोट्यवधींची फसवणूक उघड
Nagpur :  नागपुरात बनावट सोन्याचे दागिने गहाण ठेवून कोट्यवधींची फसवणूक उघड
आदिवासी विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
Pune Adivasi Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य, विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
Pune Adivasi Students Protest | पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
मराठा आरक्षणावर 12 डिसेंबरला मनोज जरांगे पाटील घेणार मोठा निर्णय!
मराठा आरक्षणावर 12 डिसेंबरला मनोज जरांगे पाटील घेणार मोठा निर्णय!
मुंबई उच्च न्यायालयाने अन्न व औषध प्रशासनाला फटकारले...
'तुम्ही स्वतःला देव समजता का?' मुंबई उच्च न्यायालयाचा तुकाराम मुंडेंच्या अन्न व औषध प्रशासनाला सवाल
'नमो सहकार टॅक्सी'अंतर्गत मुंबै बँकेमार्फत टॅक्सी खरेदीसाठी 95% कर्ज
प्रवीण दरेकर यांची मोठी घोषणा; नमो सहकार टॅक्सी अंतर्गत मुंबै बँकेमार्फत टॅक्सी खरेदीसाठी 95 टक्के कर्ज...
मुंबईत मोठ्या गणेश मंडळांच्या बाप्पांचे जल्लोषात आगमन!
मुंबईत मोठ्या गणेश मंडळांच्या बाप्पांचे जल्लोषात आगमन; गणेशोत्सवाला उत्साहात सुरुवात!
विठ्ठलवाडी आगाराच्या बस चालकाची दादागिरी; थेट ॲम्ब्युलन्सच अडवली...
कल्याणमध्ये विठ्ठलवाडी आगाराच्या बस चालकाची दादागिरी; ॲम्ब्युलन्स अडवली, नागरिकांचा संताप...
अस्वच्छतेमुळे सिंधुदुर्ग रुग्णालयाचे उपहारगृह बंद; परवाना निलंबित
सिंधुदुर्ग शासकीय रुग्णालयाच्या उपहारगृहात मिसळमध्ये आढळले झुरळ; एफडीएची कारवाई
नेपाळ महापुरात बँकेची तिजोरी नदीत वाहून गेली
नेपाळ महापुरात बँकेची तिजोरी नदीत वाहून गेली. २९ जणांना लुटमारीचा प्रयत्न करताना अटक