AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अधिवेशनात सर्वात प्रभावी नेता कोण ? लोक म्हणतात फक्त दादा, अजित पवार यांना 42 टक्के लोकांची पसंती !

सर्व नेतेमंडळींमध्ये अजित पवार यांनाच जनतेने सर्वात जास्त पसंदी दिल्याचं दिसतंय. टीव्ही 9 मराठीच्या पोलनुसार या हिवाळी अधिवेशनात अजित पवार यांनी जनतेच्या मनावर सर्वात प्रभावी नेता म्हणून आपली पाडली आहे.

अधिवेशनात सर्वात प्रभावी नेता कोण ? लोक म्हणतात फक्त दादा, अजित पवार यांना 42 टक्के लोकांची पसंती !
ajit pawar
| Edited By: | Updated on: Dec 28, 2021 | 10:53 PM
Share

मुंबई : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा (Maharashtra Assembly Winter Session 2021) आज अखेरचा दिवस होता. पाच दिवसांच्या या अधिवेशनात राज्यातील वेगवेगळ्या समस्यांवर चर्चा झाली. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना खिंडीत पकडण्याची एकही संधी सोडली नाही. तर विरोधकांनी उपस्थितीत केलेल्या प्रत्येक प्रश्नावर सत्ताधाऱ्यांनी तेवढ्याच तीव्रतेने उत्तरं दिली. या हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नेहमीप्रमाणेच सभाग्रहाच्या पटलावर महिला सुरक्षा, कायदा सुव्यवस्था तसेच अन्य महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले. तर दुसरीकडे शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भाषणांची महाराष्ट्रभर वाहवा झाली. मात्र या सर्व नेतेमंडळींमध्ये अजित पवार यांनाच जनतेने सर्वात जास्त पसंदी दिल्याचं दिसतंय. टीव्ही 9 मराठीच्या पोलनुसार या हिवाळी अधिवेशनात अजित पवार यांनी जनतेच्या मनावर सर्वात प्रभावी नेता म्हणून आपली पाडली आहे.

जनतेच्या मनात दादा, अजित पवार सर्वात प्रभावी

टीव्ही 9 मराठीने एक पोल घेऊन यंदाच्या हिवाळी अधिवेशनात कोणता नेते प्रभावशाली वाटला याबाबत जनतेला विचारले होते. या पोलला महाराष्ट्रातील जनेतेने भरभरून प्रतिसाद दिला आहे. राज्यातील 42 टक्के जनतेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यंदाचे अधिवेशन गाजवले असे वाटते. अजित पवार हे सर्वात प्रभावी असल्याचं मत 42 टक्के जनतेचं आहे. तर दुसरीकडे 33 टक्के लोकांना देवेंद्र फडणवीस सर्वात प्रभावी वाटले आहेत. त्या खालोखाल भास्कर जाधव यांना लोकांनी पसंदी दिली आहे. सत्ताधारी बाकावर बसलेले अजित पवार यांनी विधानसभा अध्यक्षपद, विधिमंडळातील सर्व सदस्यांचा आदर, तसेच सभागृहाची गरिमा याबद्दल बोलत सर्वांनी जबाबदारीने वागण्याचा सल्ला आमदार, मंत्र्यांना दिला. तसेच विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना तेवढ्याच क्षमतेने उत्तरं दिली. अजितदादांच्या याच भूमिकेमुळे महाराष्ट्रातील जनता प्रभावित झालेली दिसत आहे. राज्यातील 42 टक्के लोकांना अजित पवार हेच यावेळी सर्वात प्रभावी वाटले आहेत.

फडणवीसांनीदेखील अधिवेशन गाजवलं

तर दुसरीकडे विरोधी बाकावर बसलेले देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी वैचारिक पातली न सोडता राज्यातील समस्या तसेच कायदा व सुव्यस्था याबाबत राज्य सरकारला जाब विचारला. त्यांनी सभागृहात महिला अत्याचाराची आकडेवारी तसेच सरकारी अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार या प्रश्नाला घेऊन सरकारवर टीकेचे आसूड ओढले. याच कारणामुळे राज्यातील 33 टक्के लोकांना अधिवेशनात देवेंद्र फडणवीस हेच सर्वात प्रभावी असल्याचे वाटले.

ajit pawar

tv9 poll

भास्कर जाधवांचा 19 टक्के लोकांवर प्रभाव

दरम्यान, सभागृहात शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभागृहात नक्कल केल्यामुळे तेदेखील अधिवेशनाच्या काळात चर्चेच्या केंद्रस्थानी होते. मोदी यांची नक्कल केल्यामुळे भास्कर जाधव यांनी माफी मागावी अशी मागणी विरोधकांनी केली होती. देवेंद्र फडणवीस यांनी जाधव यांना निलंबित करण्यात यावं असंदेखील म्हटलं होतं. तर दुसरीकडे या वादावर स्पष्टीकरण देताना जाधव यांनी खेळलेला शाब्दिक खेळ अधिवेशनाच्या काळात चर्चेचा विषय ठरला होता. याच कारणामुळे राज्यातील 19 टक्के जनतेवर जाधव यांनी प्रभाव टाकला असून तेच अधिवेशनकाळात सर्वात प्रभावी ठरले, असे जनतेला वाटत आहे.

दरम्यान, दोन टक्के जनतेवर सुधीर मुनगंटीवार यांनी प्रभाव टाकला आहे. तर दुसरीकडे पाच टक्के जनतेला जोपीचंद पडळकर यांनी उपस्थित केलेले प्रश्न आणि त्यांची भूमिका आवडल्याचं टिव्ही 9 मराठीच्या पोलमधून दिसतंय.

इतर बातम्या :

‘लोकशाहीतला सर्वात काळा दिवस’ फडणवीसांचा हल्लाबोल, सरकारला पळपुटं का म्हणाले फडणवीस?

Corona : कोरोनाचे वाढते आकडे धडकी भरवणारे, दिवसभरात 2 हजार 172 नव्या रुग्णांची वाढ

नितेश राणेंना जेल की बेल?, उद्या सुनावणी; वाचा कोर्टात नेमकं काय घडलं?

Follow Us
गिरीश महाजनांची बदनामी करणारा अखेर अटकेत! बनावट फोटो व्हायरल...
Girish Mahajan | गिरीश महाजनांची बदनामी करणारा अखेर अटकेत! बनावट फोटो व्हायरल प्रकरणात मोठा खुलासा
ठाकरे गटाला जबर धक्का! आंदोलन सुरु असतानाच जिल्हाप्रमुखांचा भाजपमध्ये
ठाकरे गटाला जबर धक्का! आंदोलन सुरु असतानाच जिल्हाप्रमुखांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
वडिलांच्या प्रश्नावर राजुल पाटील गप्प! पण सोनम वांगचुकांच्या लढ्याला..
Rajool Patil | वडिलांच्या प्रश्नावर राजुल पाटील गप्प! पण सोनम वांगचुक यांच्या लढ्याला जाहीर पाठिंबा
शिवाजी पार्कवर ठाकरेंची सभा संपली, पण आंदोलक हटले नाहीत
Uddhav Thackeray | शिवाजी पार्कवर ठाकरेंची सभा संपली, पण आंदोलक हटले नाहीत; पोलिसांची धावपळ वाढली!
वांगचुकांशी संवाद टाळणाऱ्या सरकारवर उद्धव ठाकरेंचा संताप, म्हणाले...
Uddhav Thackeray | वांगचुकांशी संवाद टाळणाऱ्या सरकारवर उद्धव ठाकरेंचा संताप; पाकिस्तानचा दाखला देत घेरलं!
ठाकरेंचे किती आमदार संपर्कात? फुटीर खासदाराने दिली मोठी माहिती
ठाकरेंचे किती आमदार संपर्कात? फुटीर खासदाराने दिली मोठी माहिती
खासदार सुप्रिया सुळे अचानक पुढे गेल्या अन् भाजप नेत्याच्या पाया...
खासदार सुप्रिया सुळे अचानक पुढे गेल्या अन् भाजप नेत्याच्या पाया का पडल्या? त्या व्हिडीओने रोखल्या नजरा
जो देश भारतात दहशतवादी पाठवतो, त्याच्याशी... ठकारेंची सरकारवर टीका
जो देश भारतात दहशतवादी पाठवतो, त्याच्याशी...वांगचूक यांच्या आंदोनाला पाठिंबा देताना ठाकरेंची केंद्रावर सडकून टीका!
वांगचुक यांना मोठा धक्का! त्या याचिकेवर कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल;
वांगचुक यांना मोठा धक्का! त्या याचिकेवर कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल; आता उपचार...
हायकोर्टाचा मोठा झटका! रमेश म्हात्रेंना 5 वाजेपर्यंत शरण येण्याचे आदेश
Dombivli Hospital Case | हायकोर्टाचा मोठा झटका! रमेश म्हात्रेंना 5 वाजेपर्यंत शरण येण्याचे आदेश; पोलिसांचा ॲक्शन मोड!
IND vs ENG: शेवटच्या सामन्याच्या वावड्या आणि रोहित शर्माने केली बोलती बंद, ठोकलं दणदणीत शतक.

IND vs ENG: शेवटच्या सामन्याच्या वावड्या आणि रोहित शर्माने केली बोलती बंद, ठोकलं दणदणीत शतक

आज रात्रभर हॉटेल सुरू राहणार, रेस्टॉरंट्स पहाटे 4 पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी; सरकारने का घेतला निर्णय?.

आज रात्रभर हॉटेल सुरू राहणार, रेस्टॉरंट्स पहाटे 4 पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी; सरकारने का घेतला निर्णय?

सोनम वांगचुक आपल्या Youtube चॅनलने किती कमाई करतात ? या कमाईवर कर भरतात का ?.

सोनम वांगचुक आपल्या Youtube चॅनलने किती कमाई करतात ? या कमाईवर कर भरतात का ?

Horoscope : चार लकी राशींचे वाईट दिवस संपले, आता संपूर्ण घरात सुखाचा वर्षाव; वाचा राशीभविष्य.

Horoscope : चार लकी राशींचे वाईट दिवस संपले, आता संपूर्ण घरात सुखाचा वर्षाव; वाचा राशीभविष्य

GK : मृत्यूनंतर शरीराचा कोणता अवयव किती काळ जीवंत असतो ?.

GK : मृत्यूनंतर शरीराचा कोणता अवयव किती काळ जीवंत असतो ?

IND vs ENG : तीन सामन्यात 257 चेंडू आणि 249 धावा..! संपूर्ण मालिकेत नाबाद राहण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड.

IND vs ENG : तीन सामन्यात 257 चेंडू आणि 249 धावा..! संपूर्ण मालिकेत नाबाद राहण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड