
ठाण्यातील चंदनवाडी परिसरात परप्रांतीय मासे विक्रेत्याला पकडून पळवण्यात आले… सर्व गंभीर प्रकार असल्यामुळे येणाऱ्या काळात अतिक्रमण विभाग यांनी रस्त्यावर मासे विक्री करणाऱ्या आशांवरती कठोर कारवाई करावी अन्यथा पालिका आयुक्तांच्या दालनात मासे फेकून निषेध व्यक्त केला जाणार असा इशारा सामाजिक कार्यकर्ते महेश कदम यांनी दिला आहे…
श्रीगोंदा तालुक्यातील घारगाव – कोळगाव रोडवरील माऊली मंदिरा जवळ भीषण अपघात झाला आहे. ट्रक आणि इकोकारची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. चार जणांचा जागीच मृत्यू तर एक लहान मुलगा गंभीर जखमी आहे. मृतांमध्ये चालकासह एकाच कुटुंबातील तिघांचा समावेश आहे. आज पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. अपघातानंतर ट्रक ड्रायव्हर फरार असून बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करायचे काम सुरू आहे.
विधान भवनाच्या पायऱ्यांवर झिरवाळ्यांचा राजीनाम्याची मागणी होत आहे. विरोधक आक्रमक झाले असून, तीन्ही पक्षाचे नेते आंदोलनात उपस्थित आहेत. मंत्रालयात लक्ष्मी दर्शन झिरवाळ राजीनामा द्या अशा घोषणा सुरु आहे.
धाराशिवमध्ये द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी सरकारकडे कर्जमाफीची मागणी केली आहे. धाराशिव जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. ऐन काढणीच्या काळात झालेल्या पावसामुळे बागेतच द्राक्ष सडण्याची भीती निर्माण झाली आहे. यामुळे अनेक ठिकाणी द्राक्षांना तडे जाण्यास सुरुवात झाली आहे. द्राक्षांना तडे गेल्यास बाजारभावात तब्बल ३० ते ४० टक्क्यांपर्यंत घसरण होते. अवकाळी पावसामुळे धाराशिवमधील द्राक्ष पट्ट्यात चिंतेचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे सध्या शेतकरी कर्जमाफीची मागणी करत आहेत.
भाजपने नुकतंच प्रदेश कार्यकारिणीची घोषणा केली आहे. यात आतापर्यंत मुख्य प्रवक्ते म्हणून जबाबदारी सांभाळणारे केशव उपाध्ये यांची आता प्रदेश उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. यानंतर आता त्यांनी ट्वीटरवरुन एक पोस्ट शेअर करत पक्षाचे आभार मानले आहेत.
चंद्रकांत दादा पाटील हे अध्यक्ष असताना त्यांनी एक उदाहरणं दिलेलं आठवत. संघ परिवारात कार्यकर्ता हा पोस्टकार्ड प्रमाणे असतो. जो पत्ता त्यावर टाकाल त्या पत्त्यावर ते पोस्टकार्ड जात. २६ वर्षे पक्षाच काम करीत आहे. जी जबाबदारी दिली ती पूर्ण करण्याचा यशस्वी प्रयत्न केला. आणि गेले ८ वर्ष भाजपाचा मुख्य प्रवक्ता म्हणून काम करत होतो. आता पक्षाने मला प्रदेश उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी दिली आहे. मी नेतृत्वाचा आभारी आहे, असे केशव उपाध्ये यांनी म्हटले आहे.
मविआ म्हणून बैठक झाली नाही. प्रदेशाध्यक्ष यांनी सांगितलं आहे आम्हाला जागा देण्यात यावी. येणाऱ्या आठवड्यात आम्ही एकत्र बसू आणि यावर चर्चा करु. महाविकासआघाडीच्या तिन्हीही पक्षात कोणतेही भांडण नाही, असे आमदार सतेज पाटील म्हणाले.
बदलापूर मध्ये गोरगरीब महिलांना पैशाचं आमिष दाखवून स्त्री बीज तस्करी करणाऱ्या तीन महिलांना पोलिसांनी अटक केली आहे यामध्ये मुख्य आरोपी असणारी बदलापूरमधील ज्युवेली गावात राहणाऱ्या सुलक्षणा गाडेकर हिला अटक करण्यात आली आहे. तसेच तिच्या साथीदार अश्विनी चाबुकस्वार मंजुषा वानखडे यांनी पोलिसांनी मुस्क्या आवळल्या. या तिन्ही आरोपींना 25 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाचे धागेदोरे आता तेलंगणा, कर्नाटक, केरळ, नाशिक आणि नागपूरपर्यंत गेले आहेत. तसेच ठाणे आणि उल्हासनगरमधील दोन हॉस्पिटलमध्ये महिलांची सोनोग्राफी केली जात असल्याचेही समोर आले आहे.
राष्ट्रवादीकडून राज्यसभेसाठी पार्थ पवार उमेदवार असणार, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. तर सुनेत्रा पवार या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष होणार असल्याचे बोललं जात आहे. येत्या २६ फेब्रुवारीला वरळी डोममध्ये राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्या बैठकीत या नावांवर शिक्कामोर्तब केला जाण्याची शक्यता ाहे.
कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची संसदीय मैत्री गटात निवड करण्यात आली आहे. यामुळे भारताच्या जागतिक कूटनीतीला नवे बळ मिळणार आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या पुढाकारातून संसदीय मैत्री गटाची स्थापना करण्यात येणार आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर भारताच्या आंतरराष्ट्रीय धोरणाचा पुढचा टप्पा लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. विविध पक्षांच्या खासदारांचा समावेश असलेले बहुपक्षीय शिष्टमंडळ तयार करण्यात आला आहे. भारताचा आवाज जागतिक स्तरावर प्रभावीपणे मांडण्यासाठी श्रीकांत शिंदे यांची निवड करण्यात आली आहे.
बीच वरील फेरफटका, जंगल सफारी त्यानंतर आता हॉटेलवर एकत्र अंताक्षरीमध्ये वेळ घालवतानाचा व्हिडिओ समोर. धाराशिवमध्ये निवडणूक निकालापासून भाजपसह मित्रपक्षांचे उमेदवार एकत्र सहलीवर. सहलीवरील उमेदवाराकडून मनोरंजनासाठी गाण्याचे बोल
बीड तालुक्यातील नेकनूरमध्ये रात्रीतून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला आहे. नेकनूर येथील मिरची बाजार परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्याची मागणी शिवप्रेमींकडुन गेल्या अनेक दिवसांपासून होत होती. ् आज अखेर शिवप्रेमींनी रात्रीतून नेकनूरमध्ये हा अश्वारूढ पुतळा उभारला आहे. शिवाजी महाराजांचा पुतळा उभारल्यानं शिवप्रेमींकडुन आनंद व्यक्त केला जातोय तर नेकनूरच्या सौंदर्यात भर पडल्याच्या प्रतिक्रिया येत आहेत.
आरक्षणाची 50% ची मर्यादा ओलांडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यास सर्वोच्च न्यायालयाकडून मनाई करण्यात आली आहे. राज्य सरकारने न्यायालयाच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून प्रलंबित निवडणुका घेऊन देण्याची विनंती केली होती, मात्र ही मर्यादा ओलांडलेल्या 22 जिल्हा जिल्हा परिषद तसेच पंचायत समितींच्या निवडणुका घेण्यास सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने स्पष्ट शब्दात नकार दिला आहे.
कथित फसवणूक प्रकरणात अंबानींना मोठा झटका. अनिल अंबानी विरोधात सुरू केलेल्या फसवणुकीच्या वर्गीकरणाच्या कारवाईला यापूर्वी एकलपीठाने दिलेला स्थगिती आदेश खंडपीठाकडून रद्द. बँक ऑफ बडोदा, इंडियन ओव्हरसीज बँक आणि आयडीबीआय बँक यांचे अपिल मंजूर. रिलायन्स कम्युनिकेशन्सच्या कर्ज खात्यांच्या फसवी वर्गीकरणावरून वाद
न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या आदेशाला आव्हान. मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे व न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्यासमोर सुनावणी
चंद्रपूर : शिवसेना उबाठाचे नगरसेवक मुंबईत दाखल झाले असून ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज दुपारी भेट घेणार आहेत. उबाठाचे 6 नगरसेवक, 2 अपक्ष नगरसेवक, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संदीप गिर्हे आणि माजी जिल्हाध्यक्ष सतीश भिवगडे आज उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. भाजपसोबत सत्तेत जाण्यावरून शिवसेना उबाठा आणि काँग्रेसमध्ये तीव्र वाद निर्माण झाला होता. याच वादाच्या पार्श्वभूमीवर ही भेट होत आहे.
अनिल अंबानी यांच्या विरोधात सुरू केलेल्या फसवणुकीच्या वर्गीकरणाच्या कारवाईला यापूर्वी एकलपीठाने दिलेला स्थगिती आदेश खंडपीठाकडून रद्द करण्यात आला आहे. बँक ऑफ बडोदा, इंडियन ओव्हरसीज बँक आणि आयडीबीआय बँक यांचे अपिल मंजूर करण्यात आले आहेत. रिलायन्स कम्युनिकेशन्सच्या कर्ज खात्यांच्या फसवी वर्गीकरणावरून वाद सुरू होता. न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या आदेशाला आव्हान देण्यात आलं होतं. फॉरेन्सिक ऑडिटमध्ये गंभीर त्रुटी आढळल्याचा दावा बँकांनी केला होता. स्थगिती उठवल्याने अंबानींसमोरील कायदेशीर अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
छत्रपती संभाजीनगर- आरक्षणाची 50% ची मर्यादा ओलांडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यास सर्वोच्च न्यायालयाकडून मनाई करण्यात आली आहे. राज्य सरकारने न्यायालयाच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून प्रलंबित निवडणुका घेऊन देण्याची विनंती केली होती. मात्र ही मर्यादा ओलांडलेल्या 22 जिल्हा जिल्हा परिषद तसेच पंचायत समितींच्या निवडणुका घेण्यास सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने स्पष्ट शब्दात नकार दिला आहे. बंटीया समितीच्या आधी जी स्तिथी होती त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश न्यायालयाने दिले होते.
बीड जिल्ह्यातील बहुतांश भागात अवकाळीचा मोठा फटका बसला आहे. तसंच माजलगाव तालुक्यात देखील बहुतांश भागात काल आणि आज सकाळी वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसाने मोठं नुकसान झालं आहे. ज्वारी, हरभरा या पिकांसह फळबागांचंदेखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अचानक सुरू झालेल्या या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
नाशिक – १५ मार्चनंतर शहरात रस्ता खोदकामाला बंदी करण्यात आली आहे. शहरातील २८ प्रमुख रस्त्यांवर सध्या एकाचवेळी कामे सुरू आहेत. एकाच वेळी काम सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. दीर्घकालीन नियोजनाचा भाग असल्याने 15 मार्चपर्यंत सर्व केबल पाईप टाकण्यास सूचना देण्यात आल्या आहेत. 15 मार्चनंतर खड्डे करण्यास लगाम लावला जाईल.
छत्रपती संभाजीनगर- शिक्षकांच्या पदोन्नती यादीत नाव समाविष्ट करण्याच्या याचिकांमध्ये टीईटी अर्हता निर्णायक ठरली आहे. मुंबई उच्च न्यायालयच्या औरंगाबाद खंडपीठाने २० फेब्रुवारीचा अंतरिम आदेश मागे घेतला आहे. त्या अंतरिम आदेशानुसार झालेली पदोन्नतीची कार्यवाहीही न्यायालयाने अवैध ठरवली. टीईटी पात्रता नसलेल्या शिक्षकांना पदोन्नतीसाठी विचार करता येणार नाही, असं स्पष्ट करण्यात आलं. नागपूर खंडपीठातील याचिकाकर्ते शिक्षक टीईटी पात्र होते. मात्र त्यांच्या नावांचा पदोन्नती यादीत समावेश झालेला नव्हता. औरंगाबाद खंडपीठातील याचिकांमधील शिक्षकांकडे टीईटी पात्रता नव्हती. त्यामुळे त्यांना पदोन्नतीचा लाभ देता येणार नाही, असा न्यायालयाचा निष्कर्ष आहे.
धाराशिवमध्ये अवकाळी पावसाचा तडाखा बसला असून द्राक्ष उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत. पावसामुळे बागेतच द्राक्ष सडण्याची भीती निर्माण झाली आहे. द्राक्ष सडल्यास बाजारभावात 30 ते 40% नुकसान होण्याची शक्यता आहे. मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे अगोदरच उत्पादनात घट झाली आहे. त्यानंतर अवकाळी पावसाचं दुहेरी संकट शेतकऱ्यांसमोर उभं राहिलं आहे.
मुंबईतील हवेची गुणवत्ता पुन्हा घसरली असून दादरमध्ये गेल्या दोन दिवसांपासून AQI १५० पार गेला आहे. पहाटेपासून दादर चौपाटी परिसरात धूळ आणि धुक्याची चादर पहायला मिळतेय. नागरिकांना श्वास घेण्यास त्रास जाणवत असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मुंबईत सुरू असलेले मोठमोठे प्रकल्प, खाजगी बांधकाम आणि वाहतुकीमुळे प्रदूषणात वाढ झाली आहे.
विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून आज (मंगळवार) दुसरा दिवस आहे. सोमवारी या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या अभिभाषणाने झाली. त्यावेळी देवव्रत यांनी सरकारच्या वाटचालीचा आलेख मांडला. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्या निधनाबद्दल विधानसभेत शोकप्रस्ताव मांडत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. कर्तृत्ववान आणि शब्दाला जागणाऱ्या अजितदादांच्या रुपाने मित्र गमावला असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. आज अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या खात्यातील लाचखोरी प्रकरण तापण्याची शक्यता आहे. कारण विरोधक आज त्यांच्याविरोधात आंदोलन करणार आहेत. झिरवाळांच्या राजीनाम्याची मागणी विरोधक करत आहेत. यासह राज्य, देश-विदेशातील अपडेट्स जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग फॉलो करा.