AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

288 जागांसाठी किती उमेदवार रिंगणात? आकडा उघड; तुमच्या जिल्ह्यातील उमेदवारांची संख्या घ्या जाणून

महाराष्ट्रातील २०२४ च्या विधानसभा निवडणुकीसाठी ४१४० उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. २०१९ च्या तुलनेत हा आकडा २८ टक्क्यांनी जास्त आहे. येत्या २० नोव्हेंबरला मतदान आणि २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहेत. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील कडवी लढत पाहायला मिळणार आहे.

288 जागांसाठी किती उमेदवार रिंगणात? आकडा उघड; तुमच्या जिल्ह्यातील उमेदवारांची संख्या घ्या जाणून
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक
| Updated on: Nov 05, 2024 | 11:49 AM
Share

Maharashtra Assembly Elections 2024 : महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक 2024 चा रणसंग्राम सुरु झाला आहे. येत्या 20 नोव्हेंबरला राज्यात विधानसभा निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. तर 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होईल. यंदा विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढत पाहायला मिळणार आहे. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा काल शेवटचा दिवस होता. काल अर्ज घेण्याची मुदत संपल्यानंतर अखेर विधानसभा निवडणुकांचे चित्र स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्रातील 288 मतदारसंघांसाठी एकूण 7 हजार 995 उमेदवारांनी अर्ज दाखल केला होता. त्यातील 2 हजार 938 उमेदवारांनी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे आता रिंगणात 4 हजार 140 उमेदवार उतरणार आहेत.

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर आता राज्याच्या मुख्य निवडणूक आयोगाने एकूण किती उमेदवार रिंगणात उतरले आहेत, याची माहिती दिली आहे. राज्याच्या मुख्य निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील 288 विधानसभेच्या जागांसाठी 7 हजार 078 जणांनी अर्ज दाखल केले होते. त्यातील 2 हजार 938 उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने आता 4 हजार 140 उमेदवार रिंगणात राहिले आहेत. त्यामुळे 288 विधानसभा मतदारसंघात 4 हजार 140 उमेदवारांमध्ये काटे की टक्कर पाहायला मिळणार आहे.

2019 पेक्षा 28 टक्क्यांनी वाढला आकडा

येत्या विधानसभा निवडणुकीसाठी 4 हजार 140 उमेदवार मैदानात उतरले आहेत. हा आकडा 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत 28 टक्क्यांनी जास्त आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत 288 मतदारसंघांसाठी 3 हजार 239 उमेदवार रिंगणात उतरले होते.

सर्वाधिक उमेदवार कोणत्या मतदारसंघात?

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत नंदुरबारच्या शहादा विधानसभा मतदारसंघात सर्वात कमी फक्त तीन उमेदवार रिंगणात आहेत. तर बीडच्या माजलगाव मतदारसंघातून सर्वाधिक 34 उमेदवार मैदानात उतरले आहेत. त्यासोबतच मुंबईतील 36 जागांवर 420 उमेदवार, पुणे जिल्ह्यातील 21 जागांवर 303 उमेदवार निवडणूक लढवणार आहेत, अशी माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली आहे.

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकाचा कार्यक्रम कसा?

दरम्यान महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता 15 ऑक्टोबर 2024 पासून लागू झाली आहे. विधानसभा निवडणुकीची अधिसूचना 22 ऑक्टोबर 2024 रोजी जारी करण्यात आली होती. त्यानंतर मंगळवार 29 ऑक्टोबर 2024 ही उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख होती. यानंतर 30 ऑक्टोबर 2024 रोजी अर्जांची छाननी करण्यात आली. यानंतर 4 नोव्हेंबर 2024 पर्यंत उमेदवारांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख होती. आता येत्या 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होईल आणि 23 नोव्हेंबर 2024 रोजी मतमोजणी होईल.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.