AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Budget 2026-27 : किती लाखापर्यंतची काम निविदेशिवाय मिळणार, स्टार्टअप्ससाठी काय महत्वाची घोषणा?

Maharashtra Budget 2026-27 : "या संस्थेच्या माध्यमातून आपल्या तरुणांना परदेशातील नोकऱ्यांसाठी आवश्यक भाषा कौशल्य, आर्थिक मार्गदर्शन केलं जाईल. समुपदेशन सेवेचा विस्तार 36 नवदिशा केंद्र स्थापन करण्यात येईल" अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली.

Maharashtra Budget 2026-27 : किती लाखापर्यंतची काम निविदेशिवाय मिळणार, स्टार्टअप्ससाठी काय महत्वाची घोषणा?
CM Fadnavis
| Updated on: Mar 06, 2026 | 3:35 PM
Share

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा 2026-27 वर्षासाठीचा अर्थसंकल्प आज मांडला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी वेगवेगळ्या योजनांची घोषणा केली. त्यात स्टार्टअप्ससाठी केलेल्या काही घोषणा महत्वाच्या आहेत, त्या जाणून घ्या. “जागतिक बँकेच्या सहकार्याने आपण दक्ष महत्वाकांक्षी प्रकल्प राबवतोय. त्यासाठी महिमा महाराष्ट्र एजन्सी फॉर होलिस्टिक इंटरनॅशनल मोबिलिटी अँड अॅडव्हान्समेंट संस्थेची स्थापना केली जाईल. या संस्थेच्या माध्यमातून आपल्या तरुणांना परदेशातील नोकऱ्यांसाठी आवश्यक भाषा कौशल्य, आर्थिक मार्गदर्शन केलं जाईल. समुपदेशन सेवेचा विस्तार 36 नवदिशा केंद्र स्थापन करण्यात येईल” अशा घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली.

“मला सांगताना अभिमान वाटतोय केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्र देशाचा स्टार्ट अप कॅपिटल ठरला आहे. युनिकॉनच्या संख्येत आपलं राज्य देशात पहिल्या क्रमांकावर आहे. राज्याला जागतिक केंद्र बनवण्यासाठी नवीन स्टार्टअप नावीन्य धोरण 2025 जाहीर केलय. पुढच्या पाचवर्षात 1 लाख 25 हजार उद्योजक घडवणं, 50 हजार स्टार्टअप्सना बळ देणं हा उद्देश आहे” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

किती लाखापर्यंतची काम निविदेशिवाय दिली जाणार?

“तळागाळातील नवउद्योजकांना आर्थिक बळ देण्यासाठी मुख्यमंत्री उद्योजक महाफंड स्थापन करत आहोत. त्यातून निवडक स्टार्टअप्सना थेट आर्थिक मदत दिली जाईल. या उपक्रमातंर्गत 50 सर्वोत्तम स्टार्टअप्सची निवड केली जाईल. त्यांचे नावीन्यपूर्ण प्रकल्प शासन विभागात राबवण्यासाठी 25 लाख रुपयापर्यंतची काम निविदेशिवाय थेट दिली जातील” असं मुख्यमंत्री म्हणाले.

बिरसा योजना काय?

“चर्मकार डिझाइन उत्पादन केंद्र वांद्रे येथे स्थापित करण्याचे प्रस्तावित आहे. नवीन उद्योजक केंद्र, सर्व सुविधांसह बांधण्याचा प्रस्ताव आदिवासी जमातीतील युवकांना नावीन्यतेच्या आधारावर उद्योजक बनवण्यासाठी भारत इनोव्हेशन रिसर्च स्टार्ट फॉर आत्मनिर्भरता बिरसा ही योजना राबवणार आहोत” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं.

Follow Us
आगीचा भडका अन् किंकाळ्यांचा थरार! राजधानीत 10 जणांचा दुर्दैवी अंत
आगीचा भडका अन् किंकाळ्यांचा थरार! राजधानीत 10 जणांचा दुर्दैवी अंत.
हैराण करणारी बातमी! डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारतावर लावणार टॅरिफ, 60 देश
हैराण करणारी बातमी! डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारतावर लावणार टॅरिफ, 60 देश.
महायुतीचे 17 अधिकृत उमेदवार कोण? नावे जाहीर, बंडखोरांना सक्त इशारा काय
महायुतीचे 17 अधिकृत उमेदवार कोण? नावे जाहीर, बंडखोरांना सक्त इशारा काय.
शिवसेना विलिनीकरणावर अब्दुल सत्तारांचे खळबळजवक वक्तव्य, थेट म्हणाले...
शिवसेना विलिनीकरणावर अब्दुल सत्तारांचे खळबळजवक वक्तव्य, थेट म्हणाले....
मतांच्या गणितात आम्ही…अनिल कदमांचं बेधडक विधान नाशिकमध्ये मोठा ट्विस्ट
मतांच्या गणितात आम्ही…अनिल कदमांचं बेधडक विधान नाशिकमध्ये मोठा ट्विस्ट.
शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफी फसवी; रोहित पावरांचा धक्कादायक दावा
शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफी फसवी; रोहित पावरांचा धक्कादायक दावा.
गोराईत ठाकरे सेनेचा आक्रमक पवित्रा! बॅरिकेट्स तोडून पोलिसांशी थेट संघर
गोराईत ठाकरे सेनेचा आक्रमक पवित्रा! बॅरिकेट्स तोडून पोलिसांशी थेट संघर.
मातोश्रीवर या आणि पश्चाताप व्यक्त करा; राऊतांनी कुणाला दिल निमंत्रण?
मातोश्रीवर या आणि पश्चाताप व्यक्त करा; राऊतांनी कुणाला दिल निमंत्रण?.
सिद्धिवनायक मंदिरात भाविकांची गर्दी! अधिक महिन्यातील संकष्टी चतुर्थीला
सिद्धिवनायक मंदिरात भाविकांची गर्दी! अधिक महिन्यातील संकष्टी चतुर्थीला.
शिंदे गटच आमचा पहिल्या क्रमांकाचा शत्रू, संजय राऊत कडाडले
शिंदे गटच आमचा पहिल्या क्रमांकाचा शत्रू, संजय राऊत कडाडले.