AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता गांजा लावून कर्ज फेडावं का? अतिवृष्टीने फुलशेती उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्याचा सवाल

महाराष्ट्रातील मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पूरस्थिती निर्माण झाली आहे. मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील जिल्हे सर्वात जास्त प्रभावित झाले आहेत. शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून, शेतकऱ्यांचे कर्ज आणि उत्पन्नाचे प्रश्न निर्माण झाले आहेत.

आता गांजा लावून कर्ज फेडावं का? अतिवृष्टीने फुलशेती उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्याचा सवाल
| Updated on: Sep 24, 2025 | 10:46 PM
Share

महाराष्ट्रामध्ये सुरू असलेल्या संततधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून, विशेषतः मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांना मोठा फटका बसला आहे. सोलापूर, धाराशिव, अहमदनगर, जालना, बीड आणि करमाळा या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या हातातून आलेला घास हिरावला गेला आहे. सोलापूर जिल्ह्यात पावसाने हाहाकार माजवला असून शहराकडे येणारे आणि शहरातून जाणारे रेल्वे आणि रस्ते मार्ग पाण्याखाली गेल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.

राज्यात सतत पडणाऱ्या पावसामुळे माढा आणि मोहोळ तालुक्यांमधील अनेक नागरिक पुराच्या पाण्यात अडकले आहेत. एनडीआरएफ आणि लष्कराच्या मदतीने बचावकार्य वेगाने सुरू आहे. माढा तालुक्यातील राहुलनगर, दारफळ आणि वाकाव येथे बचावकार्य सुरू आहे. हिंगोली जिल्ह्यातही संततधार पावसामुळे झेंडूच्या फुलांचे प्रचंड नुकसान झाले आहे. दिवाळी आणि दसरा या सणांच्या तोंडावर झेंडूच्या फुलांना मोठी मागणी असते. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी नगदी पीक म्हणून फुलशेती केली होती. मात्र, ढगफुटीसदृश पावसामुळे त्यांचे संपूर्ण पीक मातीमोल झाले आहे.

आता हे कर्ज कसे फेडायचे?

आता याबद्दल एका शेतकऱ्याने त्याची व्यथा मांडली आहे. मी साधारण 1 एकरवर झेंडू लावला होता. त्यासाठी 2 लाख रुपयांचे कर्ज घेतले आणि 50 हजार रुपये स्वतः घातले. पण आता माझे पूर्ण पीक नष्ट झाले आहे. आता हे कर्ज कसे फेडायचे? सरकारनेच आम्हाला सांगावे की कर्ज फेडण्यासाठी आम्ही गांजा लावायचा का? असा सवाल शेतकऱ्याने केला आहे.

आता सर्व मातीमोल झाले

या शेतकऱ्यांनी कृषीमंत्र्यांनी प्रत्यक्ष येऊन पिकांची अवस्था पाहावी अशी मागणी केली आहे. सातत्याने झालेल्या पावसामुळे सोयाबीन, उडीद, मूग यांसारख्या पारंपरिक पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पारंपारिक पीक सोडून आम्ही नगदी पिकाकडे वळू लागलो आहेत. त्यामुळे आम्ही फुलशेती केली. पण आता सणासुदीच्या तोंडावर ढगफुटी झाल्यानंतर संपूर्ण झेंडू उद्घवस्त झाला आहे. दिवाळी आणि दसऱ्याला आम्हाला जे काही पैसे मिळणार होते, ते आता सर्व मातीमोल झाले आहे, अशी व्यथा एका शेतकऱ्याने मांडली आहे.

राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.