AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता गांजा लावून कर्ज फेडावं का? अतिवृष्टीने फुलशेती उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्याचा सवाल

महाराष्ट्रातील मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पूरस्थिती निर्माण झाली आहे. मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील जिल्हे सर्वात जास्त प्रभावित झाले आहेत. शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून, शेतकऱ्यांचे कर्ज आणि उत्पन्नाचे प्रश्न निर्माण झाले आहेत.

आता गांजा लावून कर्ज फेडावं का? अतिवृष्टीने फुलशेती उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्याचा सवाल
| Updated on: Sep 24, 2025 | 10:46 PM
Share

महाराष्ट्रामध्ये सुरू असलेल्या संततधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून, विशेषतः मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांना मोठा फटका बसला आहे. सोलापूर, धाराशिव, अहमदनगर, जालना, बीड आणि करमाळा या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या हातातून आलेला घास हिरावला गेला आहे. सोलापूर जिल्ह्यात पावसाने हाहाकार माजवला असून शहराकडे येणारे आणि शहरातून जाणारे रेल्वे आणि रस्ते मार्ग पाण्याखाली गेल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.

राज्यात सतत पडणाऱ्या पावसामुळे माढा आणि मोहोळ तालुक्यांमधील अनेक नागरिक पुराच्या पाण्यात अडकले आहेत. एनडीआरएफ आणि लष्कराच्या मदतीने बचावकार्य वेगाने सुरू आहे. माढा तालुक्यातील राहुलनगर, दारफळ आणि वाकाव येथे बचावकार्य सुरू आहे. हिंगोली जिल्ह्यातही संततधार पावसामुळे झेंडूच्या फुलांचे प्रचंड नुकसान झाले आहे. दिवाळी आणि दसरा या सणांच्या तोंडावर झेंडूच्या फुलांना मोठी मागणी असते. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी नगदी पीक म्हणून फुलशेती केली होती. मात्र, ढगफुटीसदृश पावसामुळे त्यांचे संपूर्ण पीक मातीमोल झाले आहे.

आता हे कर्ज कसे फेडायचे?

आता याबद्दल एका शेतकऱ्याने त्याची व्यथा मांडली आहे. मी साधारण 1 एकरवर झेंडू लावला होता. त्यासाठी 2 लाख रुपयांचे कर्ज घेतले आणि 50 हजार रुपये स्वतः घातले. पण आता माझे पूर्ण पीक नष्ट झाले आहे. आता हे कर्ज कसे फेडायचे? सरकारनेच आम्हाला सांगावे की कर्ज फेडण्यासाठी आम्ही गांजा लावायचा का? असा सवाल शेतकऱ्याने केला आहे.

आता सर्व मातीमोल झाले

या शेतकऱ्यांनी कृषीमंत्र्यांनी प्रत्यक्ष येऊन पिकांची अवस्था पाहावी अशी मागणी केली आहे. सातत्याने झालेल्या पावसामुळे सोयाबीन, उडीद, मूग यांसारख्या पारंपरिक पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पारंपारिक पीक सोडून आम्ही नगदी पिकाकडे वळू लागलो आहेत. त्यामुळे आम्ही फुलशेती केली. पण आता सणासुदीच्या तोंडावर ढगफुटी झाल्यानंतर संपूर्ण झेंडू उद्घवस्त झाला आहे. दिवाळी आणि दसऱ्याला आम्हाला जे काही पैसे मिळणार होते, ते आता सर्व मातीमोल झाले आहे, अशी व्यथा एका शेतकऱ्याने मांडली आहे.

Follow Us
वादग्रस्त ऑडिओनंतर आमदार संजय गायकवाडांनी मागितली माफी, माझा हेतू...
वादग्रस्त ऑडिओनंतर आमदार संजय गायकवाडांनी मागितली माफी, माझा हेतू....
भाजपने पुन्हा एकदा पंजाबच्या जनतेला दगा दिला; केजरीवाल यांचा हल्लाबोल
भाजपने पुन्हा एकदा पंजाबच्या जनतेला दगा दिला; केजरीवाल यांचा हल्लाबोल.
मीरा-भाईंदरमध्ये येऊन दाखवावं, सदावर्तेंना अविनाश जाधवांचं आव्हान
मीरा-भाईंदरमध्ये येऊन दाखवावं, सदावर्तेंना अविनाश जाधवांचं आव्हान.
दिल्लीत घडामोडी वाढल्या, आपचे 7 खासदार थेट भाजपा अध्यक्षांच्या भेटीला;
दिल्लीत घडामोडी वाढल्या, आपचे 7 खासदार थेट भाजपा अध्यक्षांच्या भेटीला;.
मोठी बातमी! केजरीवालांना धक्का, राघव चड्ढा यांच्यासोबत 7 खासदारांचा...
मोठी बातमी! केजरीवालांना धक्का, राघव चड्ढा यांच्यासोबत 7 खासदारांचा....
दिल्लीच्या राजकारणात आजवरचा सर्वात मोठा भूकंप, आम आदमी पक्ष फुटला
दिल्लीच्या राजकारणात आजवरचा सर्वात मोठा भूकंप, आम आदमी पक्ष फुटला.
हिंदू मुलींना मुस्लिम मुलंच आवडतात, माझ्या काकांच्या 3 बायका...
हिंदू मुलींना मुस्लिम मुलंच आवडतात, माझ्या काकांच्या 3 बायका....
अटकेच्या दिवशीच 58 लाखाचा व्यवहार! खरात तुरूंगात बसूनही करतोय कारनामे?
अटकेच्या दिवशीच 58 लाखाचा व्यवहार! खरात तुरूंगात बसूनही करतोय कारनामे?.
पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता अमित शाहांनी थेट सांगितलं...
पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता अमित शाहांनी थेट सांगितलं....
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरण आणखी चिघळलं, दोन पोलिसांवर..
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरण आणखी चिघळलं, दोन पोलिसांवर...