राज्यात ऑक्सिजनची मागणी वाढतेय, पुरवठा 200 मेट्रिक टनने वाढवा, राज्याची केंद्र सरकारकडे मागणी

केंद्र शासनाकडून सध्या होत असलेल्या पुरवठ्यात 200 मेट्रिक टन ऑक्सिजनचा वाढीव पुरवठा करण्यात यावा, असं राज्य सरकारने म्हटलं आहे. (maharashtra government oxygen corona patient)

राज्यात ऑक्सिजनची मागणी वाढतेय, पुरवठा 200 मेट्रिक टनने वाढवा, राज्याची केंद्र सरकारकडे मागणी
oxygen tank
Follow us
| Updated on: May 04, 2021 | 4:44 PM

मुंबई : महाराष्ट्र कोरोनाच्या (Corona) दुसऱ्या लाटेला तोंड देत असून राज्यातील 16 जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या वाढत आहे. रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे त्यांच्या उपचारासाठी ऑक्सिजनचीदेखील आवश्यकता भासत आहे. त्यामुळे राज्यात ऑक्सिजन (Oxygen) मागणी वाढत असून केंद्र शासनाकडून सध्या होत असलेल्या पुरवठ्यात 200 मेट्रिक टन ऑक्सिजनचा वाढीव पुरवठा करण्यात यावा, असं राज्य सरकारने म्हटलं आहे. तसेच लिक्विड ऑक्सिजनच्या वाहतुकीसाठी 10 टॅंकर्स महाराष्ट्राला उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी केंद्रीय मंत्रिमंडळ सचिव राजीव गौबा यांना पत्र पाठवून केली आहे. (Maharashtra government demands 200 Metric Ton extra Oxygen to central government for treatment of Corona patient)

ठाकरेंच्या निर्देशानुसार ऑक्सिजनची मागणी

वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून सातत्याने ऑक्सिजन, रेमडेसीव्हीर, बेड्स यांचा आढावा घेतला जात आहे. राज्याला वाढीव ऑक्सिजनची गरज असून त्याबाबत केंद्र शासनाकडे मागणी करण्याबाबत ठाकरे यांनी मुख्य सचिवांना निर्देश दिले होते. त्यानुसार मुख्य सचिव सीतारम कुंटे यांनी केंद्रीय मंत्रिमंडळ सचिवांना ऑक्सिजनचा पुरवठा वाढवण्याबाबतचे पत्र पाठवले.

विगवेगळ्या जिल्ह्यांत ऑक्सिजनची मागणी

राज्यात सध्या 6 लाख 63 हजार 758 सक्रिय रुग्ण आहेत. त्यातील 78 हजार 884 रुग्णांना कृत्रिम ऑक्सिजन दिला जातो. 24 पजार 787 रुग्ण अतिदक्षता विभागात दाखल आहेत. त्याचबरोबर राज्यातील पालघर, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नंदूरबार, बीड, परभणी, हिंगोली, अमरावती, बुलडाणा, वर्धा, गडचिरोली आणि चंद्रपूर या 16 जिल्ह्यांमध्ये सातत्याने रुग्ण वाढत आहेत. ऑक्सिजनच्या मागणीतही वाढ होत आहे. प्रत्येक जिल्ह्यात ऑक्सिजन ऑडिट केले जात आहे. या ऑडिट नुसार राज्याची ऑक्सिजनची मागणी वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. याच गोष्टीचा विचार करुन ऑक्सिजन पुरवठ्यात 200 मेट्रिक टनांची वाढ करण्यात यावी तसेच ऑक्सिजन लिफ्टींगची सुविधा राज्याच्या जवळ असावी, असेसुद्धा राज्य सरकारने आपल्या पत्रात म्हटले आहे.

भिलाई येथून 230 मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा व्हावा

राज्याला सध्या गुजरात जामनगर येथून दिवसाला 125 मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवठा होत असू त्यात 100 मेट्रिक टनाने वाढ करून दिवसाला 225 मेट्रिक टन आणि भिलाई येथून 230 मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा व्हावा, अशी विनंतीही मुख्य सचिवांनी केली आहे. भौगोलिकदृष्ट्या ही दोन्ही ठिकाणे महाराष्ट्राच्या जवळ असून त्यामुळे वाहतुकीचा कलावधी कमी होण्यास मदत होतानाच रुग्णांना वेळेवर ऑक्सिजन देण्यासाठी मदत होईल, असे राज्य सरकारने म्हटले आहे.

इतर बातम्या :

तिसऱ्या लाटेचा सामना करावाच लागणार, वीकेंड लॉकडाऊन, नाईट कर्फ्यू बिनकामाचे; डॉ. गुलेरिया यांचा इशारा

Kolhapur Lockdown | कोल्हापुरात कोरोना रुग्णसंख्या वाढती, पुढील 10 दिवस कडकडीत लॉकडाऊन

(Maharashtra government demands 200 Metric Ton extra Oxygen to central government for treatment of Corona patient)

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.