AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गरज 60 हजारांची, मिळणार फक्त 26 हजार, रेमडेसिव्हीरच्या पुरवठ्यावरुन राज्य सरकार नाराज, केंद्राला पत्र लिहणार

राज्य सरकार केंद्राला रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा पुरवठा वाढवावा अशी मागणी करणार आहे. तशा आशयाचे पत्रसुद्धा राज्य सरकार लिहणार आहे. (remdesivir injection corona patient)

गरज 60 हजारांची, मिळणार फक्त 26 हजार, रेमडेसिव्हीरच्या पुरवठ्यावरुन राज्य सरकार नाराज, केंद्राला पत्र लिहणार
j
| Updated on: Apr 22, 2021 | 4:30 PM
Share

मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची(Corona patien) संख्य प्रचंड प्रमाणात वाढत आहे. रोज 65 हजाराच्या पुढे नवे रुग्ण आढळत आहेत. रुग्ण वाढत असल्यामुळे आरोग्य यंत्रणवेवर ताण पडतो आहे. रोज 10 ते 15 टक्के रुग्णांना रेमडेसिव्हीरची गरज भासते आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सराकारने राज्याला रेमडेसिव्हीरच्या केलेल्या पुरवठ्यावरुन चांगलंच राजकारण रंगलं आहे. राज्याने रेमडेसिव्हीरचे इंजेक्शन (Remdesivir injection) गरजेपेक्षा अत्यंत कमी दिल्याचा आरोप केला आहे. त्यासाठी राज्य सरकार केंद्राला रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा पुरवठा वाढवावा अशी मागणी करणार आहे. तशा आशयाचे पत्रसुद्धा राज्य सरकार लिहणार आहे. (Maharashtra government will write letter to Central Government on Remdesivir injection supply and Corona patient)

राज्य सरकार केंद्राला लिहिणार पत्र

देशातील विविध राज्यांना दिल्या जाणाऱ्या रेमडेसिव्हीरचे आकडे केंद्र सरकारनं नुकतेच जारी केलेत. महाराष्ट्राची गरज दिवसाला 60 हजार इंजेक्शन्सची आहे. राज्य सरकार सातत्याने तशी मागणी करत आहे. केंद्र सरकारने नव्याने घेतलेल्या निर्णयानुसार राज्य सरकारला कमी इंजेक्शन्स मिळणार आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात कोरोनाग्रस्तांची हेळसांड होणार असून त्यातून मृतांचा आकडा वाढण्याचा धोका संभवतो असं राज्य सरकारचं म्हणणं आहे. राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांपैकी 10 ते 15% रुग्णांना रेमडेसिव्हीरची गरज असते. त्यामुळे राज्याला दर दिवशी 60 हजार रेमडेसिव्हीर मिळणे गरजेचे आहे. याच कारणामुळे राज्य सराकर केंद्र सरकारला पत्र पाठवणार आहे. तसेच राज्याला दिलेल्या पुरवठ्याबद्दल विचार व्हावा अशी विनंतीसुद्धा राज्य सरकार केंद्राला करणार आहे.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची नाराजी

केंद्र सरकारच्या या निर्णयाबद्दल आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीसुद्दा नाराजी व्यक्त केलीय. केंद्राने कोणत्या राज्याला किती रेमडेसिवीर वाटायचं याच नियंत्रण स्वत:कडे घेतलं आहे. यातून महाराष्ट्राला 21 ते 30 एप्रिल या काळात फक्त 26 हजार रेमडेसिव्हीर देण्यात येणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. या निर्णयाने राज्यात 10 हजार रेमडेसिव्हीरचा तुटवडा भासणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. रेमडेसिव्हीर आयात करू शकत नाही. तो केंद्राचा अधिकार आहे. निर्यातदारांचा साठा वापरू शकत नाही. त्यावरसुद्धा केंद्राचे नियंत्रण आहे. केंद्राने पीएओ स्तरावर रेमडेसिव्हीर निर्माण करणाऱ्या पेटंट कंपनीशी बोलून महाराष्ट्राचा आणि देशाचा प्रश्न सोडवावा, अशी मागणीही टोपे यांनी केंद्राकडे केलीय.

इतर बातम्या :

अत्यावश्यक कारणाशिवाय आंतरजिल्हा प्रवास करण्यावर मनाई: राजेश टोपे

Coronavirus: होम क्वारंटाईन असताना शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी झाली तर काय कराल?

Corona Cases and Lockdown News LIVE : दादर परिसरात पोलिसांकडून नाकाबंदी, आतापर्यंत 60 लोकांवर केली कारवाई

(Maharashtra government will write letter to Central Government on Remdesivir injection supply and Corona patient)

Follow Us
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?.
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल.
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?.
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?.
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.