AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रथम वर्ष प्रवेशाचा निर्णय कधी, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री म्हणतात…

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने 12 वी च्या परीक्षा रद्द केल्या आहेत. 12 वी बोर्डाचे निकाल पुढील काही दिवसात लागतील, त्यानंतर पहिल्या वर्षाच्या प्रवेशाचं ठरणार आहे.

प्रथम वर्ष प्रवेशाचा निर्णय कधी, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री म्हणतात...
उदय सामंत, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री
| Edited By: | Updated on: Jun 07, 2021 | 7:41 PM
Share

सांगली दि. 7 : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने 12 वी च्या परीक्षा (HSC exam) रद्द केल्या आहेत. 12 वी बोर्डाचे निकाल पुढील काही दिवसात लागतील. त्याअनुषंगाने प्रोफेशनल व नॉन प्रोफेशनल शैक्षणिक अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशाचा तातडीने निर्णय घेण्यात येईल, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी आज येथे सांगितले. इस्लामपूर येथील तहसिलदार कार्यालयात प्रथम वर्ष पदवी प्रवेशा संदर्भात दूरदृश्यप्रणालीव्दारे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते.

यावेळी वाळवा उपविभागीय अधिकारी डॉ. विजय देशमुख, तहसिलदार रविंद्र सबनिस, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी यतीन पारगावकर तसेच दूरदृश्यप्रणालीव्दारे विविध विद्यापीठांचे कुलगुरू, प्राध्यापक उपस्थित होते.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत म्हणाले, 12 वी च्या निकालानंतर विद्यार्थ्यांचा कल विविध प्रोफेशनल शिक्षणाकडे जाण्याचा असतो. यासाठी सीईटी परीक्षा महत्वपूर्ण असते. या सीईटी च्या परीक्षा आयोजित करण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून तयारी सुरू आहे. १२ वीचा निकाल लागल्यानंतर तत्काळ प्रथम वर्ष प्रवेशाची प्रक्रिया सुरू करण्यात येईल. ज्या विद्यार्थ्यांना समान गुण मिळतील अशा काही अडीअडचणी सोडवून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष सुरळीत सुरू होईल याबाबत निर्णय घेण्यात येतील. तंत्र शिक्षणाच्या प्रवेशाची प्रक्रिया साधारण जुलै – ऑगस्ट पर्यंत चालते. तसेच कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याचाही विचार यावेळी करण्यात येईल. 12 वी बोर्ड परीक्षेचा निकाल लागल्यानंतरच गुणांची टक्केवारी कळेल. त्यानुसार प्रवेश प्रक्रिया राबविण्याचे धोरण राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ठरेल.

अन्य बातम्या 

मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी शरद पवार आणि अजित पवार ‘वर्षा’वर  

Pune Fire : पुण्यातील उरवडे औद्योगिक वसाहतीमध्ये रासायनिक कंपनीला आग, 15 महिलांचा मृत्यू

बजेटमध्ये शेतकऱ्यांना काय? निर्मला सीतारमण यांनी केली मोठी घोषणा
बजेटमध्ये शेतकऱ्यांना काय? निर्मला सीतारमण यांनी केली मोठी घोषणा.
अर्थसंकल्प 2026–27: अर्थव्यवस्था मजबूत करण्यावर केंद्र सरकारचा भर
अर्थसंकल्प 2026–27: अर्थव्यवस्था मजबूत करण्यावर केंद्र सरकारचा भर.
प्रत्येक जिल्ह्यात मुलींसाठी हॉस्टेल उभारणार! सीतारमण यांनी केली घोषणा
प्रत्येक जिल्ह्यात मुलींसाठी हॉस्टेल उभारणार! सीतारमण यांनी केली घोषणा.
मधुमेह आणि कॅन्सरवरची औषधं स्वस्त करणार; सीतारमण यांची मोठी घोषणा
मधुमेह आणि कॅन्सरवरची औषधं स्वस्त करणार; सीतारमण यांची मोठी घोषणा.
मुंबई-पुणे हायस्पीड रेल कॉरिडॉर तयार करणार! सीतारमण यांची घोषणा
मुंबई-पुणे हायस्पीड रेल कॉरिडॉर तयार करणार! सीतारमण यांची घोषणा.
खादी, हँडलूम उत्पादनाच्या वाढीवर भर - निर्मला सीतारमण
खादी, हँडलूम उत्पादनाच्या वाढीवर भर - निर्मला सीतारमण.
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडून अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडून अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात.
12 वर्षांपासून नियोजनबद्ध विकास सुरु; सीतारमण यांनी दिली माहिती
12 वर्षांपासून नियोजनबद्ध विकास सुरु; सीतारमण यांनी दिली माहिती.
केळी गेली, मका गेला, गहूही गेला... सांगा जगायचं कसं?
केळी गेली, मका गेला, गहूही गेला... सांगा जगायचं कसं?.
पुढे निर्णय पवार साहेबांनी घेतला पाहिजे होता! संजय राऊतांचं मोठी विधान
पुढे निर्णय पवार साहेबांनी घेतला पाहिजे होता! संजय राऊतांचं मोठी विधान.