AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विजयी झाल्यानंतर हुरळून जाऊ नका, गुलाल उधळलात तरी अंतिम फैसला 21 जानेवारीला, कोर्टाचा निकाल नीट वाचा

सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील ५७ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका थांबवण्याची याचिका फेटाळली आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया सुरू राहील. मात्र, ओबीसी आरक्षणामुळे ५०% मर्यादा ओलांडलेल्या या संस्थांचे निकाल न्यायालयाच्या अंतिम निर्णयावर अवलंबून असतील.

विजयी झाल्यानंतर हुरळून जाऊ नका, गुलाल उधळलात तरी अंतिम फैसला 21 जानेवारीला, कोर्टाचा निकाल नीट वाचा
maharashtra election
| Updated on: Nov 28, 2025 | 2:22 PM
Share

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन दाखल झालेली ५७ संस्थांमधील निवडणुका थांबवण्याची मागणी करणारी याचिका कोर्टाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया निर्धारित वेळेत सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र या ५७ संस्थांच्या निवडणुकीच्या निकालाबद्दल कोर्टाने महत्त्वपूर्ण टिप्पणी केली आहे.

निवडणुकीच्या निकालाबद्दल कोर्टाने काय म्हटलं?

ओबीसी आरक्षणामुळे काही ठिकाणी एकूण आरक्षण ५० टक्क्यांपेक्षा जास्त झाले होते. त्यामुळे या ठिकाणच्या निवडणुका थांबवण्यात याव्यात अशी मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र कोर्टाने ही मागणी स्पष्टपणे फेटाळली आहे. या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला आहे. त्यानुसार निवडणूक प्रक्रिया सुरूच राहील. कोणीही ती थांबवू शकणार नाही, असे कोर्टाने यावेळी स्पष्टपणे सांगितले. यामुळे निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे.

न्यायालयाने निवडणुकांना परवानगी दिली असली तरी ४० नगरपरिषदा आणि १७ नगरपंचायतींचा समावेश असलेल्या एकूण ५७ संस्थांच्या निकालाबाबत मोठी अट घातली आहे. ज्या ५७ नगरपालिका आणि नगरपंचायतींमध्ये आरक्षण ५० टक्क्यांपेक्षा जास्त झाले आहे, त्यांचा निकाल कोर्टाच्या अंतिम निर्णयावर अवलंबून असणार आहे. याचाच अर्थ, या ठिकाणी उमेदवार जरी विजयी झाले तरी कोर्टाकडून अंतिम निर्णय दिला जात नाही, तोपर्यंत त्यांचा निकाल न्यायप्रविष्ट राहील. त्यामुळे या ५७ संस्थांच्या विजयी उमेदवारांनी विजयाचा गुलाल उधळला तरी त्यांचा अंतिम फैसला २१ जानेवारीच्या सुनावणीनंतरच होणार आहे.

निवडणुकांना परवानगी देताना आणखी एक मोठी अट

दरम्यान, न्यायालयाने निवडणुकांना परवानगी देताना आणखी एक मोठी अट घातली आहे. यापुढे जाहीर होणाऱ्या निवडणुकांमध्ये कोणत्याही परिस्थितीत आरक्षण ५० टक्क्यांपेक्षा जास्त होता कामा नये. राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयोगाला (SEC) निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असेल, पण या निवडणुका घेताना आरक्षणाची मर्यादा कोणत्याही परिस्थितीत ५० टक्क्यांहून अधिक नसावी, असे कोर्टाने स्पष्ट केले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता २१ जानेवारी रोजी होणार आहे. म्हणजेच, ५७ संस्थांच्या निवडणुका पूर्ण झाल्यावर, त्या निकालांचे भवितव्य न्यायालयाच्या अंतिम निर्णयावर अवलंबून असणार आहे.

Follow Us
तर मी राजकारणातून संन्यास घेईन; मानेंच्या वक्तव्याने ठाकरे गटात खळबळ
Bal Mane | तर मी राजकारणातून संन्यास घेईन; बाळ मानेंच्या वक्तव्याने ठाकरे गटात खळबळ
हिंदुत्ववादी म्हणवणारे काही लोक गद्दारीसाठी एकत्र आले.....
Sanjay Raut On Bal Mane | हिंदुत्ववादी म्हणवणारे काही लोक गद्दारीसाठी एकत्र आले; बाळ माने यांच्या माघारीनंतर संजय राऊतांचा घणाघात
नवनीत राणांना राज्यसभेची लॉटरी की झटका?; काय घडतंय पडद्यामागे?
Navneet Rana | नवनीत राणांना राज्यसभेची लॉटरी की झटका? राष्ट्रवादीच्या भूमिकेने... काय घडतंय पडद्यामागे?
ठाकरेंनी काढलं, मानेंनी दिलं उत्तर; म्हणाले Revenge.....
ठाकरेंनी काढलं, मानेंनी दिलं उत्तर; म्हणाले Revenge..... त्या एका पोस्टनं पेटलं राजकारण!
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती!
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई...
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई सुरु, धक्कादायक खुलासे
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचण
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचणी वाढल्या, गेल्या 3 तासांपासून...
बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश
Girish Mahajan | बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश!
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात...
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात... त्या जागेमुळे नेत्याने खदखद बाहेर काढली!
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारी
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारीबाबत संजय राऊतांचा मोठा दावा