AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

निवडणूक जाहीर होताच उत्तर भारतीय सेनेने मातोश्रीबाहेर लावले वादग्रस्त बॅनर, त्यावर लिहिलय की…

महाराष्ट्रातील 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. २ डिसेंबरला मतदान, तर ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत उत्तर भारतीय सेना या संघटनेने वादग्रस्त बॅनर लावला आहे.

निवडणूक जाहीर होताच उत्तर भारतीय सेनेने मातोश्रीबाहेर लावले वादग्रस्त बॅनर, त्यावर लिहिलय की...
| Updated on: Nov 05, 2025 | 9:02 AM
Share

गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अखेर जाहीर करण्यात आल्या आहेत. राज्यातील 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतींच्या निवडणुका डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला होणार आहेत. या सर्व निवडणुका एकाच टप्प्यामध्ये होणार आहेत. येत्या २ डिसेंबरला यासाठी मतदान होईल. त्यानंतर ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. यामुळे सध्या राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. त्यातच आता मुंबईत उत्तर भारतीय सेना या संघटनेने लावलेल्या अत्यंत वादग्रस्त बॅनरमुळे पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे.

महाराष्ट्र से बिहार तक, राजस्थान से यूपी तक

महाराष्ट्राच्या राजधानीत मुंबईत पुन्हा एकदा भाषेच्या मुद्द्यावरुन राजकारण सुरु झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. मुंबईतील अंधेरी, वांद्रे, शिवाजी पार्क, मातोश्री, शिवतीर्थ आणि शिवसेना भवन या ठिकाणी झळकत असलेल्या एका बॅनरमुळे नवा वाद उफाळून आला आहे. या बॅनरवर सावधान असा इशारा देण्यात आला आहे. तसेच उत्तर भारतीय बटोगे तो पिटोगे असा थेट धमकीवजा मजकूर यात पाहायला मिळत आहे. तसेच महाराष्ट्र से बिहार तक, राजस्थान से यूपी तक, असेही यात नमूद करण्यात आले आहे. या बॅनरच्या खाली उत्तर भारतीय सेना आणि त्यांचे अध्यक्ष सुनील शुक्ला यांचा फोटोही छापण्यात आला आहे.

उत्तर भारतीय मतदारांना कोणत्याही परिस्थितीत विभागू न देणे

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर भारतीय मतदारांना कोणत्याही परिस्थितीत विभागू न देणे, असा या बॅनरमागील उद्देश असल्याचे बोललं जात आहे. उत्तर भारतीय मतदारांना एकत्रित ठेवण्यासाठी आणि त्यांच्यात फूट पाडणाऱ्यांविरुद्ध हा इशारा असल्याचेही बोललं जात आहे. राज्यात विशेषतः मुंबई-ठाण्यात उत्तर भारतीय मतदारांची संख्या लक्षणीय असल्याने, निवडणुकीच्या काळात या घोषणांना विशेष महत्त्व प्राप्त होते.

दरम्यान उत्तर भारतीय सेनेचे अध्यक्ष सुनील शुक्ला हे गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रातील उत्तर भारतीय समाजाच्या हक्कांसाठी आक्रमक भूमिका घेत आहेत. विशेषतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भाषणांविरोधात त्यांनी वेळोवेळी आवाज उठवला आहे. तसेच न्यायालयात दाद मागितली आहे. मात्र आता या बॅनरमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. आता यावर कारवाई होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश.