AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Rains IMD | मुसळधार ते अतिमुसळधार, ‘या’ 4 जिल्ह्यांना आज रेड अलर्ट

Maharashtra Mumbai Rains | हवामान विभागाने आज बुधवारी 26 जुलै रोजी राज्यातील इतक्या जिल्ह्यांना रेड अलर्ट दिला आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून नागरिकांना सतर्क आणि गरज नसल्यास घराबाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात आलंय.

Maharashtra Rains IMD | मुसळधार ते अतिमुसळधार, 'या' 4 जिल्ह्यांना आज रेड अलर्ट
फाईल फोटो
| Updated on: Jul 26, 2023 | 3:06 AM
Share

मुंबई | राज्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस बरसतोय. राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये कमी जास्त प्रमाणात पाऊस होतोय. मध्ये काही दिवस पावसाने विश्रांती घेतली होती. त्यामुळे दुबार पेरणीचं संकटही ओढावलेलं. मात्र आता सातत्याने होत असलेल्या पावसामुळे बऱ्याच ठिकाणी सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. पावसाने काही जिल्ह्यांना चांगलंच झोडपून काढलंय. तर काही जिल्ह्यात अजूनही चांगल्या पावसाची अपेक्षा आहे. महाराष्ट्रात येत्या काही दिवसात दमदार पाऊस होण्याची शक्यता आहे. दरम्यान आता आयएमडी अर्थात भारतीय हवामान विभागाने राज्यातील 4 जिल्ह्यांना आज (26 जुलै) रेड अलर्ट दिला आहे. तसेच उर्वरित जिल्ह्यांना ऑरेन्ज आणि यलो अलर्टही दिला गेला आहे.

या 4 जिल्ह्यांना रेड अलर्ट

आयएमडीनुसार, कोकणातील आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रत्येकी 2 असे एकूण 4 जिल्ह्यांना रेड अलर्ट आहे. यामध्ये रायगड, रत्नागिरी, सातारा आणि पुणे या जिल्ह्यांना रेड अलर्ट दिला गेला आहे. त्यामुळे या 4 जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.

कोणत्या जिल्ह्यांना ऑरेन्ज अलर्ट?

तसेच मुंबई, ठाणे, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना हवामान खात्याने ऑरेन्ज अलर्ट दिलाय. त्यामुळे या 4 जिल्ह्यात मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज हा हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

यलो अलर्टचा इशारा कोणत्या जिल्ह्यांना?

पालघर, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ या चार जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा जोर कायम राहील, असा अंदाज आहे.

रायगडमधील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी

रायगड जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. रायगड जिल्ह्याला आज रेड अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. यामुळे खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासनाने सुट्टी जाहीर केली आहे.

प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन

दरम्यान आयएमडीने आज दिलेला पावसाचा इशारा पाहता प्रशासनही अलर्ट मोडवर आलं आहे. कोणतीही परिस्थिती ओढावल्यास मदतकार्यासाठी प्रशासन सज्ज आहे. तसेच प्रशासनाने नागिरकांना या अशा स्थितीत गरज असेल, तरच घराबाहेर पडा, अन्यथा पडू नये, असं आवाहन केलं आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.