
राज्यातील 29 महापालिकांचे निकाल लागले असून 22 जानेवारी 2026 रोजी महापाैरपदाची सोडत निघेल. त्यापूर्वी महापाैर पदावरून रस्सीखेच बघायला मिळत आहे. जिल्हा परिषद निवडणुकीचीही जोरदार तयारी सुरू आहे. मुंबई महापालिकेचा महापाैर नक्की भाजप की शिवसेना शिंदे गटाचा होणार यावर संभ्रम कायम आहे. दिल्लीमध्ये यावरून मोठ्या घडामोडी सुरू असल्याचे बघायला मिळत आहे. भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाने महापालिका निवडणुका एकत्र लढवल्या. भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांची दिल्लीत रात्री उशिरापर्यंत बैठक सुरू होती. शिंदे सेनेतून राहुल शेवाळे आणि भाजपच्या अमित साटम यांच्यात चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. महापौर, स्थायी समिती, सुधार समिती, आरोग्य आणि शिक्षण समितीवरून चर्चा झाल्याची माहिती आहे. जिल्हा परिषद निवडणुकीनिमित्तही घडामोडी वाढताना दिसत आहेत. यासोबतच निवडणुकीसंदर्भातील इतर अपडेट्स, राज्याभरातील घडामोडी, राष्ट्रीय पातळीवरील बातम्या जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग फॉलो करा..
दावोस येथील वर्ल्ड इकोनॉमिक फोरमलाला संबोधित करताना ट्रम्प म्हणाले, “आम्ही व्हेनेझुएलामधून 50 दशलक्ष बॅरल तेल आयात करू. व्हेनेझुएला मोठा नफा कमवेल. आमच्या तेल खरेदीमुळे व्हेनेझुएला श्रीमंत होईल. आम्ही सहा महिन्यांत श्रीमंत करू.”
दावोसमध्ये बोलताना ट्रम्प म्हणाले, “आम्ही तेल आणि गॅसवर मोठा करार केला आहे. आमच्या धोरणांमुळे अमेरिकेत महागाई कमी झाली आहे. अमेरिकेला वार्षिक 1 ट्रिलियन डॉलर्सची तूट होती. आम्ही उर्जेचे नवीन स्रोत उघडत आहोत.”
दावोस येथील वर्ल्ड इकोनॉमिक फोरमला संबोधित करताना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की जर अमेरिका समृद्ध झाली तर जग समृद्ध होईल. आम्ही शुल्क लादून व्यापार तूट कमी केली. जुने शुल्क धोरण अमेरिकेचे नुकसान होते. आम्ही अमेरिकेची व्यापार तूट 77 टक्क्यांनी कमी केली आणि संघीय खर्च 100 अब्ज डॉलर्सने कमी केला.
दावोस शिखर परिषदेबाबत केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, भारत एआयसाठी पाच स्वरूपांवर काम करत आहे. भारतात जागतिक आर्थिक मंच आयोजित केला पाहिजे. देशाच्या आर्थिक सुधारणा आणि गुंतवणुकीची वाढती जागतिक मान्यता अधोरेखित करणारी दावोससारखी शिखर परिषद आयोजित करण्याची हीच योग्य वेळ आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दावोस येथे होणाऱ्या वर्ल्ड इकोनॉमिक फोरमला संबोधित करतील. दावोसमध्ये जगभरातील नेते मंडळींनी हजेरी लावली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्र्यांनीही उपस्थिती लावली आहे.
पुण्याच्या जुन्नरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. तालुकाध्यक्ष माऊली खंडागळे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत पक्ष प्रवेश केला आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत युती करताना विश्वासात न घेता युती केली. जिल्हा परिषदेच्या उमेदवारीत ही डावलल्याने नाराज असलेल्या खंडागळे यांनी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.
उद्या जालनातील महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत होणार असून जालन्यात इच्छुकांनी देव पाण्यात ठेवले आहेत. प्रथमच निर्माण झालेल्या जालना महानगरपालिकेचे महापौर पद कुणाला सुटणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. भाजपाकडून दिग्गजांना संधी मिळणार कि नवख्याला याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 41 जागा जिंकत बहुमतात असलेल्या भाजपकडे सर्वच प्रवर्गातील विजयी उमेदवार उपलब्ध आहेत.
अकोल्यातून मोठी बातमी समोर आली आहे. गवळी समाजाचे प्रदेशाध्यक्ष आणि अकोल्यातील प्रॉपर्टी व्यावसायिक किसनराव हूंडीवाले हत्या प्रकरणाचा आज जिल्हा सत्र न्यायालयात अंतिम युक्तीवाद पार पडला. यावेळी तब्बल दहा जणांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. 6 मे 2019 रोजी पोलीस अधीक्षकांच्या शासकीय बंगल्याशेजारी असलेल्या सार्वजनिक न्यास उपनिबंधक कार्यालयात हूंडीवाले यांची हत्या करण्यात आली होती.
शुल्लक कारणावरून मित्रानेच मित्राची हत्या केल्याची घटना लातूर शहरात घडली आहे. मजुरी करून आपला उदरनिर्वाह करणारे दोघे मित्र नेहमीपणे छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकाळी एकत्र आले. मात्र एकमेकांना खर्च करण्याच्या कारणावरून वादाला सुरुवात झाली. त्या नंतर झालेल्या हाणामारीत अनिल जोडपे (वय 40) यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. पोलिस आता आरोपी मित्राचा शोध घेत आहेत.
जळगावच्या पाचोरा तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका तोंडावर असतानाच राजकीय हालचालींना वेग आला आहे. ग्रामीण भागात भाजपला मोठा धक्का बसला असून भाजपचे अनेक कार्यकर्ते शिवसेना शिंदे गटात दाखल झाले आहेत. शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश पार पडला. या प्रवेशामुळे ग्रामीण भागातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता असून आगामी निवडणुकांत याचे पडसाद उमटण्याची चिन्हे आहेत.
जालना जिल्ह्यात येत्या 30 जानेवारीपर्यंत जमावबंदीचे आदेश जिल्हादंडाधिकारी यांनी जारी केले आहेत. पुढील 9 दिवसाच्या कालावधीमध्ये प्रजासत्ताक दिन, बाळासाहेब ठाकरे यांची जयंती, आणि मुस्लिम धर्मीयांचा सण असल्याने विविध कार्यक्रम मिरवणुका होणार आहेत. शिवाय मराठा,ओबीसी आणि धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागण्यांवरून आंदोलन होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी जिल्हाप्रशासनाने खबरदारी म्हणून जमावबंदीचा आदेश जारी केला आहे.
हातकणंगले जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचा आज अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज तहसील कार्यालयावर मोठ्या शक्ती प्रदर्शन करत उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज भरला. भाजपचे आमदार राहुल प्रकाश आवाडे यांची कन्या सानिका राहुल आवाडे यांनी भाजपाकडून कोरोचीमधून जिल्हापरिषद निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला. यावेळी आमदार राहुल प्रकाश आवाडे माजी आमदार सुरेश हाळवणकर माजी आमदार प्रकाश आवाडे यांच्यासह त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मनसेने महायुतीला पाठिंबा दिला तर त्यांचं स्वागतच आहे. आमचं निर्विवाद बहुमत, महायुतीला कुणी पाठिंबा देत असेल तर त्याचं स्वागत आहे. महापौर बसण्याचा निर्णय वरिष्ठ निर्णय घेतील असे भाजप नगरसेवक दीपेश म्हात्रे म्हणाले.
गेल्या काही दिवसांपासून सोन्या आणि चांदीचे भाव चांगलेच वाढले आहेत. चांदीच्या भावात गेल्या 24 तासात 15 हजार रुपयांची वाढ झाली आहे. खामगाव येथील प्रसिद्ध चांदीच्या बाजारपेठेत आज चांदी 3 लाख 35 हजार रुपये प्रति किलो आहे. खामगाव येथील चांदीच्या बाजारपेठेत ग्राहक नसल्याने शुकशुकाट.
शिवसेना उबाठा गटाचे सात ही नगरसेवक उद्धव ठाकरेंच्या भेटीला निघाले आहेत. आम्ही सगळे एकत्र आहोत ,आम्हाला सत्ता स्थापनेसाठी फोन येत आहेत. मात्र वरिष्ठांच्या भूमिके नंतरच निर्णय घेणार. सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करणार असे उबाठाचे गटनेते उमेश बोरगावकर यांनी म्हटले आहे.
सातारा जिल्ह्यामध्ये घड्याळ आणि तुतारी हे दोन्ही एकत्र जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक लढत आहेत. बहुतांशी ठिकाणी चांगली लढत पाहायला मिळणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शिवसेनेसोबत जी बैठक निवडणुकीच्या अनुषंगाने पार पडली होती यामध्ये ज्या ठिकाणी शक्य आहे त्या भागात एकत्र निवडणूक लढवली जाणार आहे. लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी काही उमेदवार धडपड करत आहे याचे जिवंत उदाहरण सातारा जिल्ह्यात तुम्हाला पाहायला मिळेल. ही निवडणूक जिंकण्यासाठी अनेक हातकण्डे वापरले जात आहेत त्यामुळे एकत्र विचार करून या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्र आलो असे आमदार शशिकांत शिंदे यांनी म्हटले आहे.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र राठोड यांनी शिवबंधन सोडत उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र केला. नैतिक जबाबदारी घेत राजेंद्र राठोड यांचा राजीनामा. उबाठाला जिल्हा परिषद निवडणूक पार्श्वभूमीवर दुसरा झटका. चार दिवसापूर्वी पैठणचे दत्ता गोर्डे यांनी उबाठाला जय महाराष्ट्र केला होता. राजेंद्र राठोड यांच्या कन्या यांना शिंदे यांच्या शिवसेनेकडून अब्दुल सत्तार यांनी जिल्हा परिषदेला उमेदवारी दिल्याने राजीनामा.
उमरगा शिवसेनेचे माजी खासदार रवींद्र गायकवाड यांची पत्नी जिल्हा परिषदेच्या आखाड्यात. तर माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या मुलीचा पंचायत समितीचा उमेदवारी अर्ज दाखल. शिवसेनेचे माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची मुलगी आकांक्षा चौगुलेची पंचायत समितीच्या आखाड्यातून राजकीय कारकिर्दीला सुरुवात. उमरगा तालुक्यातील केसरजवळगा गणातून पंचायत समितीसाठी निवडणूक उमेदवारी अर्ज दाखल. तर माजी खासदार रवींद्र गायकवाड यांच्या पत्नी कदेर जिल्हा परिषद गटातून निवडणुकीच्या आखाड्यात.
दादर माहीम विधानसभेमध्ये एक टोळी सक्रिय झाली आहे. शिवसेनेला या प्रभागातून हद्दपार करायची या टोळीने सुपारी घेतली आहे. जे चॅट्स सध्या वायरल होत आहेत, त्यामध्ये अक्षता नामक महिलेचा उल्लेख आहे. मग या अक्षता त्याच आहेत का? हा आमचा त्यांना प्रश्न आहे आणि त्यांना मिरची का लागली ? हा सुद्धा माझा त्यांना प्रश्न आहे असा सवाल समाधान सरवणकर यांनी केलाय.
“खूप मोठ्या गुंतवणूकीसंदर्भात दावोसमध्ये चर्चा सुरू आहे. आता पर्यंत कधी आली नाही एवढी मोठी गुंतवणूक होणार आहे. पुढील चार वर्ष स्थिर सरकार आहे. उद्योजकांना त्रास होणार नाही यासाठी आम्ही काम करतो आहोत. जामनेर MIDC मध्ये कोका कोला कंपनी येते आहे. पुण्यापेक्षा मोठी प्रायोरिटी नाशिकला आहे. मुंबई कनेक्टिव्हिटी वाढते आहे. कुंभाच्या निमित्ताने रोड आणि रेल्वे कनेक्टिव्हिटी होणार आहे. मुंबईहून नाशिक AC लोकल सुरू करणार” असं मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलं.
ठाणे महानगरपालिका निवडणूक आयोगाची महापौर पदासाठी उद्या आरक्षण सोडत जाहीर होणार आहे. मात्र आरक्षण सोडत जाहीर होण्याआधीच ठाण्यामध्ये गटनेतेपदासाठी खलबतं सुरू आहे.
शिवसेना शिंदे गटाची आज ठाण्यातील टेंभी नाका येथे शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांची बैठक होणार असून याच बैठकीत गटनेता निवडला जाण्याची शक्यता आहे. खासदार नरेश म्हस्के, मंत्री प्रताप सरनाईक, रवींद्र फाटक, शहराध्यक्ष हेमंत पवार यांच्या उपस्थितीत बैठक पार पडणार आहे.
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष – चिन्हाची सुनावणी पुन्हा लांबणीवर पडली आहे.याप्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी होणार होती. मात्र ती लांबणीवर पडली आहे. आता याप्रकरणी पुढील सुनावणी शुक्रवारी होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
पुण्यात कोयता गँगची दहशत असून मध्यरात्री तिघांनी कोयत्याने 35 पेक्षा अधिक वाहनं फोडली . पुण्यातील तळजाई परिसरातील घटना, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मध्यरात्री तिघांनी कोयते हातात घेत गाड्यांचे तोडफोड केली. तसेच नागरिकांच्या घराच्या दरवाजांवर देखील कोयत्याने वार केले.
जळगावच्या सराफ बाजारामध्ये सोन्याच्या आणि चांदीच्या दरामध्ये आज विक्रमी वाढ झाली आहे. गेल्या 24 तासात सोन्याच्या दरामध्ये तब्बल 7 हजार 500 रुपयांची तर चांदीच्या दरामध्ये तब्बल दहा हजार रुपयांची वाढ झाली आहे. सोन्याचे दर जीएसटी सह 1 लाख 59 हजार 650 रुपयांवर झाले आहेत. तर चांदी ही 3 लाख 32 हजार 650 रुपयांच्या ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचले आहेत.
छत्रपती संभाजीनगर – जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी प्रशासन कार्यालयांवर उमेदवारांची तुफान गर्दी झाली.
अर्ज भरण्यासाठी मोठ्या प्रमाणात उमेदवार आणि समर्थक जमा झाल्याने परिसरात प्रचंड गोंधळ निर्माण झाला. गर्दी आवरण्यासाठी पोलिसांची चांगलीच दमछाक झाल्याचे चित्र होते.
महायुतीची अधिकृत युती जाहीर झाल्यानंतर अनेक इच्छुकांनी एकाचवेळी उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे गर्दीत लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून आले.
जळगावमधील भाजपचे सर्व नवनियुक्त नगरसेवक मंत्री गिरीश महाजन यांच्या भेटीसाठी नाशिकला रवाना झाले आहेत. महापालिकेत भाजपचा गटनेता कोण? हे गुलदस्त्यात : नावाची घोषणा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून नाशिकमध्ये होणार आहे. जळगावचे भाजपचे आमदार सुरेश भोळे यांच्यासह सर्व 46 नगरसेवक नाशिकला रवाना झाले आहेत.
सर्व नगरसेवक नाशिकला पोहोचल्यानंतर तेथे मंत्री गिरीश महाजन महापालिकेतील गटनेत्याच्या नावाची घोषणा करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
कल्याण–डोंबिवलीतील 53 नगरसेवक कोकण भवनच्या दिशेने रवाना झाले आहेत. शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे 53 नगरसेवक डोंबिवलीतून बसने मुंबईतील कोकण भवनकडे रवाना झाले आहेत. आज कोकण भवनमध्ये गट स्थापन करण्याच्या प्रक्रियेसाठी सर्वांचा एकत्र प्रवास सुरू आहे. तर गटनेतेपद कोणाकडे असणार याबाबत अंतिम निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार असल्याची माहिती आहे.
शिवसेनेचा अधिकृत गट स्थापन करण्यासाठी काल बैठक देखील पार पडली होती. आमदार राजेश मोरे यांची नगरसेवकांच्या प्रवासाबाबत अधिकृत माहिती दिली आहे.
छत्रपती संभाजीनगर- जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने खुलताबाद तालुक्यात राजकीय समीकरणांनी वेगळं वळण घेतलं आहे. भाजपचे आमदार प्रशांत बंब आणि दादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सतीश चव्हाण यांच्या महायुतीला रोखण्यासाठी काँग्रेस, उद्धवसेना आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांनी एकत्र येत जोरदार लढत देण्याची तयारी चालवली आहे.
खुलताबादमधील ३ जिल्हा परिषद गटांपैकी ‘गदाणा’ हा गट उद्धवसेनेला, तर ‘वेरूळ’ आणि ‘बाजारसावंगी’ हे दोन गट काँग्रेसला सोडण्याचं जवळपास निश्चित झालं आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी चंद्रपूरमधल्या दोन्ही नेत्यांशी फोनवरून चर्चा केल्याची माहिती समोर येत आहे. चंद्रपूरमधील वाद दिल्लीत मिटण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. दोन्ही नेत्यांनी सामंजस्याची भूमिका घ्यावी, अन्यथा दोन्ही नेत्यांना दिल्लीत पाचारण करण्यात येईल, अशी भूमिका हर्षवर्धन सपकाळ यांनी घेतली आहे.
मुंबईच्या महापौरपदासाठी इतिहासात पहिल्यांदाच शिवसेना म्हणवून घेणाऱ्यांना, बाळासाहेब ठाकरेंचा फोटो लावणाऱ्यांना दिल्लीत जाऊन गुजराती नेत्यांच्या पायाशी बसावं लागतंय, याच्यापेक्षा दुसरी अपमानास्पद गोष्ट मला दिसत नाही, अशी टीका संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंवर केली. महापौरपदासाठी शिंदेंना कुणी धूप घालत नाही, असंही ते म्हणाले.
ज्या गोष्टी तुम्ही मुंबईत बसून करू शकता, त्यासाठी अशाप्रकारे पंचतारांकित पिकनिक करायची गरज नाही. मुंबईमध्ये 9 लाख रोजगार निर्माण होणार, हे कुठून होणार आहे? गौतम अदानी 5 हजार रोजगार देऊ शकत नाहीयेत. मग हा एवढा मोठा आकडा आला कुठून? जनतेला फसवू नका, अशा शब्दांत राऊतांनी टीका केली.
एक हजार कोटींची गुंतवणूक खरंच आली असेल, तर तसं सांगा. आकडे कशाला फुगवून सांगत आहात. गेल्या पाच वर्षांत तुम्ही किती वेळा दावोसला गेलात ते सांगा. प्रत्येक वर्षाला जाता. हे आकडे जर पाहिले, तर जवळपास 75 लाख कोटींच्या वर जातात. ही गुंतवणूक कुठे आहे ते दाखवा. तुमच्या दौऱ्यांवर किती खर्च होतोय, तेसुद्धा दाखवा, असं संजय राऊत म्हणाले.
मुंबईत महायुतीच्या नेत्यांकडून एकीचे दावे केले जात असतानाच धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीत मात्र भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील संघर्ष टोकाला पोहोचला आहे. आमदार तानाजी सावंत आणि आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांच्यातील वादामुळे जिल्ह्यात युतीची गणिते कोलमडण्याची चिन्हे आहेत. काल तानाजी सावंत यांनी बोलावलेल्या महत्त्वाच्या बैठकीकडे पालकमंत्री प्रताप सरनाईक आणि पक्षनिरीक्षक राजन साळवी यांनी पाठ फिरवल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. याच बैठकीनंतर सावंत गटाने स्वतंत्र उमेदवार उभे करण्याची रणनीती आखल्याची माहिती समोर येत असून, यामुळे स्थानिक पातळीवर महायुतीमध्ये उभी फूट पडल्याचे चित्र आहे.
नाशिक महानगरपालिका निवडणुकीत ७२ जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवल्यानंतर आता भाजपमध्ये महापौर पदासाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. भाजपचे संकटमोचक मानले जाणारे नेते गिरीश महाजन आज नाशिकमध्ये नवनियुक्त नगरसेवकांची एकत्रित बैठक घेणार आहेत. या बैठकीत निवडणुकीतील वातावरणाचा आढावा घेण्यासोबतच आगामी महापौर निवडीसाठी रणनीती आखली जाणार आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनाच्या दृष्टीने नाशिकचे महापौर पद भाजपसाठी अत्यंत महत्त्वाचे असून, अनेक दिग्गजांनी या पदासाठी आतापासूनच फिल्डिंग लावली आहे. २२ जानेवारीला मुंबईत होणाऱ्या आरक्षण सोडतीकडे सर्वांचे लक्ष लागले असून, त्यानंतरच महापौर पदाचा खरा चेहरा समोर येण्याची शक्यता आहे.
देवेंद्र फडणवीस दावोसमध्ये आहेत. आम्ही सध्या एकनाथ शिंदेंशी चर्चा सुरु आहे. आधी महापौर निवड होईल, त्यानंतर समित्यांचा निर्णय होईल, अशी माहिती अमित साटम यांनी दिली.
तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या एका अजब ठरावामुळे भाविकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. दानपेटीत चुकून पडलेली मौल्यवान वस्तू परत न करता ती दान समजली जाईल, असा नियम मंदिर प्रशासनाने लागू केला आहे. याचा फटका पिंपरी-चिंचवडमधील भाविक सुरज टिंगरे यांना बसला असून, त्यांची एक तोळ्याची सोन्याची अंगठी दानपेटीत पैसे टाकताना चुकून पडली होती. अंगठीचा फोटो आणि योग्य पुरावे दिल्यानंतरही, मंदिर संस्थानने आपला ठराव पुढे करत अंगठी देण्यास लेखी नकार दिला आहे. दोन महिन्यांपासून पाठपुरावा करूनही संस्थान आपल्या निर्णयावर ठाम असल्याने, देवीच्या दरबारात न्याय मिळेल की नाही, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर आता मातोश्री परिसरात बॅनरबाजीमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. ठाकरे गटाचे शाखाप्रमुख सुनील जाधव यांनी लावलेल्या एका बॅनरची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. या बॅनरवर बाप तो बाप होता है असे लिहित शिंदे गटाला थेट आव्हान देण्यात आले आहे. चिन्ह चोरले, पक्ष फोडला आणि सरकारी यंत्रणांचा वापर केला तरीही मुंबईत ठाकरे गट आणि मनसेने मिळून ७१ जागा जिंकल्या, तर शिंदे गटाला २९ जागांवर समाधान मानावे लागले, असा टोला या माध्यमातून लगावण्यात आला आहे. “सत्य परेशान हो सकता है, लेकिन मिट नही सकता” असा दावा या बॅनरद्वारे करण्यात आला आहे. यामुळे मुंबईतील शिवसेना विरुद्ध शिवसेना असा संघर्ष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
मीरा-भाईंदर निवडणूक निकालानंतर आता ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवरून राजकीय वातावरण तापू लागले आहे. प्रभाग क्रमांक २० मधील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पराभूत उमेदवार दृष्टी घाग यांनी ईव्हीएम मशिनवर जोरदार टीका करत थेट प्रशासनाला आव्हान दिले आहे. घाग यांनी परिसरात बॅनर लावून आपला संताप व्यक्त केला आहे. जर बॅलेट पेपरवर निवडणूक झाली, तरच तुम्हाला तुमची खरी जागा आणि लोकप्रियता समजेल, अशा शब्दात त्यांनी सत्ताधारी आणि प्रशासनावर निशाणा साधला आहे. या बॅनरबाजीमुळे शहरात नव्या राजकीय वादाला तोंड फुटले असून निकालावर शंका उपस्थित करणाऱ्यांची चर्चा रंगली आहे.
जळगाव महानगरपालिका निवडणुकीतील विजयाचा निकाल आता हिंसक वळण घेताना दिसत आहे. शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. आमचा उमेदवार निवडणुकीत पडला याच रागातून आरोपींनी तुमची रक्ताची होळी करू अशी धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात दोन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वीच भंगाळे यांच्या गाडीची तोडफोड झाल्याची घटना ताजी असतानाच, आता थेट जिवे मारण्याची धमकी मिळाल्याने शहरात तणावाचे वातावरण असून पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
आगीत घरातील फर्निचर, संसार उपयोगी वस्तू व इतर साहित्य जळून खाक. मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास लागली होती आग, आगीचे कारण अद्याप अस्पष्ट. घरात कुणीही राहत नसल्यामुळे शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे. घरासमोरील नागरिकांच्या आग लागल्याचे लक्षात आल्यानंतर महापालिकेच्या अग्निशमन दलाला कळविण्यात आले
संगमवाडी ते येरवडा रस्त्यावर किरकोळ अपघातानंतर मोटार चालक महिलेने एकाला फरपटत नेले समाज माध्यमातुन या घटनेचे चित्रफीत प्रसारित झाल्यानंतर पोलिसांनी मोटार चालक महिलेला अटक केली या प्रकरणी मोटार चालक महिला मेरसेदे रासुलीफर शीला अटक करण्यात आली असून या घटनेत राम-लक्ष्मण राठोड हे जखमी झाले आहे.
पुणे महापालिकेचा नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला 43.12 टक्के मते मिळाली असून नोटाला मिळालेली मते महाराष्ट्र नवनिर्माण सेना वंचित बहुजन आघाडी तसेच आम आदमी पक्षापेक्षा अधिक असल्याचे निकालातील आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे शिवसेनेने एकही जागा जिंकली नसली तरी त्यांना सात टक्के मते मिळाली असून शहरातील चौथ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे
खेड तालुक्यातून 34 भोर 31 इंदापूर 30 दौंड 23 हवेली 17 बारामती 15 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. सर्वात कमी पाच उमेदवारी अर्ज जुन्नर तालुक्यातून दाखल झाले आहेत. पंचायत समिती साठी 305 उमेदवार अर्ज दाखल झाले आहेत यात खेड तालुक्यातून ५४ बारामती 49 भोर एकोणचाळीस मुळशी अडतीस शिरूर 21 दोन पुरंदर तालुक्यातील 15 अर्ज दाखल झालेत सर्वात कमी नऊ अर्ज जुन्नर दाखल झाल्या आहेत.
पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने हाती घेतलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील दुमजली उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले आहे. किरकोळ कामे राहिल्याने ती पूर्ण करून पुढील महिन्यात हा फुल वाहतुकीसाठी खुला करण्याच्या दृष्टीने प्राधिकरणाने तयारी सुरू केली आहे. त्यामुळे सेनापती बापट रस्त्यासह परिसरात होणारी वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणार आहे.
बंडखोरी टाळण्यासाठी कुठल्याही पक्षांकडून अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर नाही. आघाडी युतीवर पुण्यात संभ्रम कायम तर काँग्रेस वंचितच्या आघाडीची घोषणा. दोन्ही राष्ट्रवादीची अंतिम यादी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ठरवली मात्र सर्व तालुका अध्यक्षांना सूचना शेवटच्या क्षणाला एबी फॉर्म देण्यात येणार. भाजप शिवसेना युतीची चर्चा अद्याप अपूर्ण शिवसेनेने भाजपाकडे यादी पाठवली
पुणे ते दिल्ली सहा हजारात होणारा विमान प्रवास साचे तिकीट दर बारा ते पंधरा हजार रुपये. पुण्याहून दिल्ली गोवा जयपुर वाराणसी उदयपूर कडे जाणाऱ्या फ्लाइट्सना मागणी वाढली. पुण्यातून विदर्भ मराठवाड्यात जाणाऱ्या खाजगी बस तिकीट देखील वाढले. शनिवार रविवार सुट्टी आणि प्रजासत्तक दिन सोमवारी आल्याने तिकीट दरात वाढ