Maharashtra News LIVE : ऑपरेशन टायगर, 60 वा वर्धापन दिन-ठाकरे, शिंदे काय बोलणार?
Maharashtra News LIVE : ऑपरेशन टायगरने उद्धव सेनेला मोठा हादरा बसला. 9 पैकी 6 खासदारांनी स्वतंत्र गटासाठी हातघाईची लढाई केली. आज शिवसेनेचा 60 वा वर्धापन दिन आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे आजच्या मेळाव्यातून काय बोलणार याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

LIVE NEWS & UPDATES
-
आत ऑपरेशन चौदा ,चौदा आमदार फुटण्याच आमदार बांगर यांचे संकेत
संजय राऊत पागल आहेत त्यांच्या नादी लागू नये, तुझ्यात लय गुर्मी आहे तू लय बोलतोस इथून पुढे खासदार होऊन दाखव. आमदार संतोष बांगर यांनी राऊत यांच्या तुडवा ह्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
-
धुळे जिल्ह्यातील पाऊस लांबला जिल्ह्यातील लघु प्रकल्पांमध्ये अवघा 25% जलसाठा
धुळे जिल्ह्यातील पाऊस लांबला जिल्ह्यातील लघु प्रकल्पांमध्ये अवघा 25% जलसाठा शिल्लक राहिला आहे. धुळे जिल्ह्यात पाणी पुरवठा करणारे 45 लघु प्रकल्प आहेत. वाढलेल्या तापमानामुळे आणि बाष्पीभवनामुळे लघु प्रकल्पामधील साठा जलद गतीने कमी झाला. लवकर पाऊस न पडल्यास ग्रामीण भागामध्ये टंचाई निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
-
-
सीए अंतिम परीक्षेत डोंबिवलीचा झेंडा उंचावला; सोहन मांजरेकर देशात तिसरा
डोंबिवलीच्या सोहन मांजरेकरची सीए अंतिम परीक्षेत देशात तिसरी रँक; 78.83 टक्के गुणांसह घवघवीत यश.यापूर्वी सीए इंटरमिजिएटमध्ये देशात सहावी रँक; शिस्तबद्ध अभ्यास, योग्य नियोजन आणि सातत्यामुळे यश संपादन. सोहनच्या यशाने डोंबिवलीत जल्लोषाचे वातावरण; कुटुंबीय, मित्रमंडळींकडून
-
हिंगोली-खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या हार्दिक अभिनंदनाचे पोस्टर झळके
शिवसेना आमदार संतोष बांगर आणि त्यांच्या भावजई नगराध्यक्षा रेखाताई बांगर यांनी शहरातल्या चौका चौकात लावले पोस्टर. नागेश पाटील आष्टीकर यांनी हिंगोली जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने योग्य निर्णय घेतल्याबद्दल हार्दिक अभिनंदन असे आशयाचे आमदार बांगर यांनी हिंगोली शहरात लावले पोस्टर
-
शेतातील विजेच्या खांब्यांवरून तार चोरून नेल्याच्या घटनांमध्ये वाढ
पाऊस नसल्याने आधीच शेतकरी चिंतेत असतांना तार चोरल्या गेल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या..जवळपास दोन डीपीवरील पंधरा ते वीस पोलांवरून तार चोरून नेल्याने शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यासाठी मोठी समस्या उभी झाली आहे. वारंवारच्या घटनेमुळे शेतकऱ्यांकडून नाराजी व्यक्त केली जात पोलिसांकडून चोरट्यांना अटक करण्याची मागणी केली जात आहे
-
-
बेस्ट बंदचा प्रवाशांना फटका
दादर रेल्वे स्थानकाच्या बाहेर प्रवाशांची मोठी गर्दी.. आज बेस्ट बंदची हाक दिली आहे नंतर प्रवासांची टॅक्सीने जाण्यासाठी मोठी लाईन. दादर रेल्वे स्थानकाच्या बाहेर टॅक्सी साठी प्रवाशांची मोठी लाईन..
-
कल्याण स्टेशनसमोर खुलेआम ‘ओपन बार’; मद्यपींच्या हैदोसाचा व्हिडीओ व्हायरल
कल्याण पश्चिम रेल्वे स्थानकासमोरील परिसरात रात्रीच्या वेळी खुलेआम मद्यपान सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. रात्री सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास मद्यपींचा ‘दारू दरबार’ भरत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रेल्वे स्थानकासारख्या गर्दीच्या आणि संवेदनशील ठिकाणी नियमांचे उघड उल्लंघन होत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. घरी परतणाऱ्या महिला प्रवाशांना मद्यपींच्या गर्दीतून मार्ग काढावा लागत असून सुरक्षिततेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे.
-
खासदार संजय देशमुख यांच्या घरासमोर सलग तिसऱ्या दिवशी पोलीस बंदोबस्त कायम
ऑपरेशन टायगर अंतर्गत ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 खासदार शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा असतांना या सहा खासदारांना Y दर्जाची सुरक्षा देण्यात आलीये. मात्र यवतमाळ -वाशिमचे खासदार संजय देशमुख यांच्या विरोधात मतदारसंघात प्रचंड रोष बघायला मिळतोय त्यामुळं कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हनुन त्यांच्या दिग्रस येथील घरासमोर सलग तिसऱ्या दिवशीही पोलिसांचा बंदोबस्त कायम आहे.
-
मान्सून लांबल्याने चाऱ्याचे गंभीर संकट
राज्यात जून महिना सुरू होऊन अनेक दिवस उलटले तरी अद्याप पावसाला सुरवात झालेली नाही. वाढत्या उष्णतेमुळे शेतकऱ्यांसमोर आता चाऱ्याचे गंभीर संकट उभे राहिले आहे. हिरवा चारा उपलब्ध नसल्याने जनावरांच्या खाद्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांना आपल्या जनावरांना हिरव्या चाऱ्याऐवजी वाळलेला सुका चारा टाकण्याची वेळ आली आहे. त्यामुळे जनावरांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात असून. एकीकडे चाऱ्याची कमतरता तर दुसरीकडे वाढलेला खर्च यामुळे दूध व्यवसाय करणारे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. वेळेवर पाऊस न झाल्यास आगामी काळात चारा टंचाई आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. याचा थेट परिणाम पशुधन आणि दूध उत्पादनावर होणार असल्याचे शेतकरी सांगत आहेत. त्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत असल्याचे दिसत आहे.
-
गोंदियाच्या मोरगाव अर्जुनी तालुक्यातील पिंपळगाव खांबी येथे मानवी वस्तीत शिरला बिबट्या…
गोंदियाच्या मोरगाव अर्जुनी तालुक्यातील पिंपळगाव-खांबी येथे पहाटे काही नागरिकांना गावातील शाळेच्या आवारात बिबट दिसून आला. बिबट दिसताच नागरिकांनी आरडाओरडा केल्याने तो तेथून लांजेवार यांच्या घरात शिरल्याचे निदर्शनास आले. घरातील सदस्यांनी प्रसंगावधान राखत सर्व दरवाजे बंद करून बाहेर निघाले. बिबट्याची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरताच ग्रामस्थांनी लांजेवार यांच्या घराकडे मोठी गर्दी केली. मात्र गर्दीचा फायदा घेत बिबट पुन्हा तेथून बोरकर यांच्या घराजवळील शौचालय परिसरात दिसून आला. यावेळी वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि रेस्क्यू मोहीम सुरू करण्यात आली. यानंतर बिबट मेश्राम यांच्या घराजवळील एका पडक्या घराच्या परिसरात दिसून आला. वनविभागाने त्या ठिकाणी रेस्क्यूसाठी प्रयत्न केले, मात्र बिबट पुन्हा तेथून निसटण्यात यशस्वी झाला. त्यामुळे काही काळ गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. 3 तासांच्या प्रयत्नानंतर बिबट्याचे यशस्वी रेस्क्यू करण्यात आले.
-
व्हीआयपी आणि सर्वसामान्य भाविक एकाच रांगेत
इतिहासात पहिल्यांदाच तुळजाभवानी मंदिरात सर्वसामान्यांनी व्हीआयपी एकाच रांगेत आहेत. तुळजाभवानी मंदिरात व्हीआयपी कल्चरला आळा बसला. ५०० रुपये, २०० रुपये देणगी दर्शन व धर्मदर्शन रांगा भुयारी मार्गात एकत्र दिसले. सर्व भाविकांना आता एकाच ठिकाणाहून सिंहाच्या गाभाऱ्यातून देवीचे दर्शन होणार आहे. देणगीदार व सामान्य रांगेतील भाविकांमधील फरक संपुष्टात आला आहे. सिंहासन पूजा व अभिषेक पूजा सुरू असतानाही देणगी दर्शन अखंड सुरु राहणार आहे.
-
उद्धव ठाकरे शिवसेनेच्या वर्धापन दिन कार्यक्रमाकडे धाराशिवच्या शिवसैनिकांची पाठ?
धाराशिव जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मुंबईतील वर्धापन दिन कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या पक्षांतराच्या चर्चांमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. दरवर्षी मोठ्या संख्येने मुंबईकडे रवाना होणारे शिवसैनिक यंदा तुलनेने कमी उत्साह आहे. जिल्ह्यातील राजकीय घडामोडींमुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील कार्यकर्ते दिशाहीन झाल्याची चर्चा आहे.
-
शिंदे गटाच्या मेळाव्यात फुटीर खासदार?
आज दोन्ही शिवसेनेचा वर्धापन दिन आहे आणि दोन्ही शिवसेनेचे मेळावे मुंबईत होणार आहेत. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा वर्धापन मेळावा गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये पार पडणार आहे.शिंदे गटाचा आजचा मेळावा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. कारण उद्धव ठाकरे गटातून बाहेर पडलेले 6 खासदार आज या मेळाव्याला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. दुसरीकडे नेस्को सेंटरवर मेळाव्याची जोरदार तयारी सुरू आहे. संपूर्ण गोरेगाव परिसरात, विशेषतः नेस्कोला जाणाऱ्या रस्त्यावर बॅनर आणि झेंडे लावण्यात आले आहेत..
-
राजाभाऊ वाजे यांच्या स्वागताची जोरदार तयारी
ठाकरेंचे खासदार राजाभाऊ वाजे यांचे नाशिकरोड रेल्वे स्थानकावर जोरदार स्वागत होणार आहे. इतर खासदार पक्ष सोडून गेले तरी वाजे मात्र ठाकरेंसोबत कायम असल्याने कार्यकर्त्यांकडून स्वागत करण्यात येणार आहे. ढोल ताशांच्या गजरात घोषणाबाजी देत राजाभाऊ वाजे यांचे स्वागत होणार आहे.
-
शिवसेना वर्धापनदिनी बॅनरवॉर
ठाकरेंच्या शिवसेनेचा वर्धापनदिनी मुंबई ठिक ठिकाणी गद्दार बदलले पण विचार नाही या आशयाचा बॅनरबाजी करण्यात आली तर शिंदे शिवेसनेकडून जनता शिवसेना, मनात शिवसेना असे बॅनर झळकले आहेत. ऑपरेशन टायगरमुळे मुंबईत बॅनरवॉर रंगले आहे.
Maharashtra News LIVE : ऑपरेशन टायगरने उद्धव सेनेला पुन्हा मोठे खिंडार पाडले. 6 खासदारांनी स्वतंत्र गटासाठी लोकसभा अध्यक्षांकडे अर्ज दाखल केला आहे. तर काल फुटीर खासदारांनी व्हिप झुगारला. ते पक्षाच्या बैठकीला गैरहजर राहिले. आज शिवसेनेचा 60 वा वर्धापन दिन आहे. उद्धव सेना षण्मुखानंद सभागृहात तर शिंदे सेना नेस्को येथे वर्धापन दिन साजरा करेल. त्यानिमित्ताने मुंबईतील प्रमुख चौकात दोन्ही सेनेची बॅनरबाजी रंगली आहे. आजच्या कार्यक्रमातून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे काय बोलणार, कुणावर काय निशाणा साधणार याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
खासदार पाठोपाठ आमदाराही फुटणार असा दावा शिंदे सेनेच आमदार बच्चू कडू यांनी केला आहे. तर त्यापाठोपाठ मुंबई महापालिकेतील नगरसेवकही फुटणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे उद्धव सेनेपुढे येत्या काळातही मोठे आवाहन असणार आहे. तर उद्या 20 तारखेला मनसेचा मेळावा होईल. राज ठाकरे उद्या राज्यातील घडामोडींवर आणि उद्धव सेना फुटीवर काय फटकारे मारतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेच्या जागेसाठी मतदान झाले. आता तीन दिवसानंतर निकाल जाहीर होईल. राज्यासह देशावर पावसाने डोळे वटारल्याने दुष्काळाची चाहुल तर लागणार नाही ना, अशी भीती व्यक्त होत आहे. मान्सून अद्यापही राज्यात सक्रिय झालेला नाही. राज्यातील अनेक धरणात पाणी तळाला गेलेले आहे. पाणी कपात सुरू आहे. तर मुंबईत बेस्ट कर्मचारी संपावर आहेत. यासह राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडी आणि अपडेट इथं वाचा.