Maharashtra News LIVE : विजय वडेट्टीवार यांची सरकारवर जोरदार टीका, जनता हैराण झाली असून..
Maharashtra News LIVE Updates: अपक्ष उमेदवार गोकुळ गीते हे विधान परिषद निवडणूक लढण्यावर ठाम आहेत. यामुळे महायुतीला मोठा झटका बसला आहे. कारण महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यास गोकुळ गीते यांनी नकार दिला आहे.

LIVE NEWS & UPDATES
-
जळगावच्या अमळनेर तालुक्यातील मंगरूळ येथे तिहेरी अपघातात जण सहा ठार झाल्याची घटना
कार , एस टी आणि मोटरसायकल अशा तीन वाहनांमध्ये अपघात झाल्याची माहिती. अमळनेर धुळे रस्त्यावर मंगरूळच्या पुढे हॉटेल वृंदावन जवळ अपघात झाल्याची घटना. या अपघातात दुचाकीस्वार स्वार जागीच तसेच चार चाकीतील महिला आणि पुरुष अशा एकूण सहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. गावकरी , पोलीस आणि एस टी कर्मचारी यांच्या मदतीने त्याला बाहेर काढण्यात आले.
-
संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी यंदा तीन बैलजोड्या
जगद्गुरू संत तुकाराम महाराज संस्थांच्या वतीने संत तुकाराम महाराजांच्या 341 व्या देहू ते पंढरपूर पालखी सोहळ्याची तयारी सुरू केली आहे. यंदाच्या पालखी रथ सेवेसाठी खिल्लार जातीच्या तीन बैलजोड्या संस्थान स्वतः खरेदी करणार आहे. पालखी रथासाठी ताकदवान व उंच बैलजोड्याची निवड केली जाते,गेल्यावर्षी संस्थानच्या वती
-
-
देशातील जनता हैराण आहे- विजय वडेट्टीवार
देशातील जनता हैराण झाली आहे, १२ वाजले आहेत, असे मोठे विधान नुकताच विजय वडेट्टीवार यांनी केले. यादरम्यान त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली.
-
केज तालुक्यातील पवारवाडीत आर्थिक व्यवहारातून एका व्यक्तीला तिघांकडून मारहाण
केज तालुक्यातील पवारवाडी येथे कैलास पवार नामक व्यक्तीला आर्थिक व्यवहारातून तीन जणांनी लाठ्या-काठ्यांनी मारहाण केली. तुझ्या वडिलांसोबत चा आमचा व्यवहार मिटवून टाक असे म्हणत मारहाण केल्याची केज पोलीसांकडे तक्रार. जखमी व्यक्तीवर केज उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत.
-
शक्तीपीठ महामार्गावर शेतकऱ्याची अनोखी मागणी; बॅनरची राज्यभर चर्चा
धाराशिव जिल्ह्यातील चिखली येथील शेतकरी धनु तांबे यांनी शक्तीपीठ राष्ट्रीय महामार्गाबाबत एक अनोखी मागणी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. महामार्गासाठी आपली 2 एकर जमीन मोफत देण्याची तयारी दर्शवत, त्या बदल्यात आपल्या जमिनीतून जाणाऱ्या महामार्गावर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
-
-
पतीचा खून करून प्रेयसी-प्रियकराचा एकमेकांना कॉल ; म्हणाले ‘कार्यक्रम ओके’
हत्येनंतर अपघाताचा बनाव रचून रस्त्याच्या कडेला टाकला होता मृतदेह, नेकनूर पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा अवघ्या पाच दिवसांत लावला. बीड तालुक्यातील लिंबागणेश येथे प्रियंका सोनवणे हिने आपल्या प्रियकराच्या मदतीने पती किरण सोनवणे यांची गळा आवळून हत्या केली. हत्येनंतर हा प्रकार केवळ अपघात दिसावा म्हणून आरोपींनी मृतदेह दुचाकीखाली दाबून रस्त्याच्या कडेला टाकला होता.
-
नवनीत राणा यांच्याकडून राष्ट्रवादीच्या प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम
भारतीय जनता पार्टीची मी प्रामाणिक निष्ठावान कार्यकर्ता आहे. मी कोणत्याही पदासाठी आपली विचारधारा बदलणार नाही. मी सदैव भारतीय जनता पार्टीचे कार्य प्रामाणिकपणे करत राहीन, अशी पोस्ट लिहित नवनीत राणा यांनी राष्ट्रवादीच्या प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. आदरणीय सुनेत्रा वहिनी, अजितदादा पवार आणि पार्थदादा पवार यांनी मला राज्यसभेवर पाठवण्याबाबत इच्छा व्यक्त केली होती. मात्र राज्यसभेच्या उमेदवारीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याची अट मला मान्य नव्हती, असं त्यांनी स्पष्ट केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून मी सुनेत्रा वहिनी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राज्यसभेची जागा भारतीय जनता पक्षाला सोडण्याची विनंती केली होती. परंतु काही कारणास्तव हे शक्य झाले नाही. तरी देखील माझ्यावर विश्वास ठेवून मला राज्यसभेची संधी देण्याचा विचार केल्याबद्दल मी सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांचे आणि पार्थ दादा पवार यांचे आभारी आहे, असं त्यांनी म्हटलंय.
-
छत्रपती संभाजीनगर- बँक निवडणुकीतील उमेदवारी अर्जांवरील आक्षेपांची सुनावणी पूर्ण
छत्रपती संभाजीनगर- बँक निवडणुकीतील उमेदवारी अर्जांवरील आक्षेपांची सुनावणी पूर्ण असून आज पात्र आणि अपात्र उमेदवारांची अंतिम यादी जाहीर होणार आहे. या निकालाकडे जिल्ह्याच्या राजकीय आणि सहकार क्षेत्राचे लक्ष लागून आहे. काँग्रेसचे खासदार कल्याण काळे, आमदार संजना जाधव, आमदार रमेश बोरनारे, अब्दुल सत्तार यांचा मुलगा समीर सत्तार, मंत्री संजय शिरसाट, हर्षदा शिरसाट यांच्यासह अन्य उमेदवारांच्या अर्जांवर आक्षेप घेण्यात आले होते.
-
वसंत देशमुखांची उमेदवारी जाहीर करताना पक्षाने विचारातच घेतलं नाही- अभिजीत पाटील
“वसंत देशमुखांची उमेदवारी जाहीर करताना पक्षाने विचारातच घेतलं नाही. माहिती न होताच पक्षाने देशमुखांना उमेदवारी दिली. मोहिते पाटलांनी अकलुजच्या बैठकीलाही मला बोलवलं नाही. पक्ष उमेदवार देणार हेच माहिती नव्हतं. अर्ज भरतानाही माहिती नव्हती. पंढरपुरच्या सभापतीपदाच्या निवडीवेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष असलेल्या वसंत देशमुखांनीच तुतारीचा उमेदवार पाडून भाजपचा उमेदवार निवडून आणला. मग आता आम्ही त्यांना मतं का द्यायचं? विरोधी उमेदवार असलेले राजेंद्र राऊत हे भेटून गेले, तीन वेळा फोन आला. मात्र पक्षाच्या वसंत देशमुखांचा साधा एकही फोन नाही, भेटही नाही. आता मला माझा पर्याय काढावा लागेल,” अशा शब्दांत आमदार अभिजीत पाटील यांनी नाराजी व्यक्त केली.
-
ट्रेनमधून उतरा आणि थेट मेट्रोत चढा; जोगेश्वरी टर्मिनसवर प्रवाशांना सुविधा
मुंबई : जोगेश्वरी टर्मिनसला मुंबई मेट्रो नेटवर्कशी जोडण्याच्या दृष्टीनेही पश्चिम रेल्वेने तयारी केली आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये लांब पल्ल्याच्या रेल्वे प्रवाशांना थेट लोकल सोबतच मेट्रो सेवा उपलब्ध होणार आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ही योजना सध्या अंतिम टप्प्यात असून, ती पूर्ण झाल्यावर या टर्मिनसला मेट्रो मार्ग क्रमांक ६ आणि ७अ सोबत थेट जोडणे शक्य होणार आहे.
-
नाशिक – अपक्ष उमेदवार गोकुळ गीते निवडणूक लढण्यावर ठाम
नाशिक – अपक्ष उमेदवार गोकुळ गीते निवडणूक लढण्यावर ठाम आहेत. महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यास त्यांनी नकार दिला आहे. मंत्री उदय सामंत आणि गिरीश महाजन यांच्या भेटीनंतर गोकुळ गीते यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मतदारांचा कौल माझ्याकडे असल्याने मी पाठिंबा दिल्यास मतदारांचा घात होईल, असं ते म्हणाले.
-
फसव्या संदेशांबाबत सतर्क राहा; नागरिकांना आवाहन
मुंबई : लोकअदालतीच्या नावावर दंड भरण्यासाठी मोबाईलवर एसएमएस, व्हॉट्सअॅप संदेश किंवा पेमेंटसाठी ऑनलाईन लिंक पाठवली जात नाही. त्यामुळे नागरिकांनी अशा प्रकारच्या कोणत्याही फसव्या संदेशांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन मुंबई शहर जिल्हा विधि सेवा प्राधिकरणातर्फे करण्यात आले आहे.
-
‘एलएलएम सीईटी’चे हॉल तिकीट उपलब्ध
मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०२६-२०२७ साठीच्या सेंटर बेस्ड ऑनलाइन एल.एल.एम. कॉमन एन्टरन्स टेस्ट २०२६ परीक्षेचे हॉल तिकीट उपलब्ध करून देण्यात आले आहे. ही परीक्षा शुक्रवार, १२ जून रोजी दुपारी २ ते ३ आणि आणि संध्याकाळी ५ ते ६ या दोन सत्रात ऑनलाइन घेतली जाणार आहे. या परीक्षेचे हॉल तिकीट विद्यार्थी विद्यापीठाच्या संकेत स्थळावरून डाऊनलोड करू शकतात.
-
विद्यापीठ स्पर्धा परीक्षा संपन्न; नागरी सेवा परीक्षेसाठी १२८ विद्यार्थ्यांनी नोंदणी
मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या डॉ. आंबेडकर सेंटर ऑफ एक्सेलेंस केंद्रामार्फत राबविण्यात येणाऱ्या मोफत मार्गदर्शन योजनेअंतर्गत विविध स्पर्धा परीक्षांसाठी आयोजित प्रवेश परीक्षा नुकत्याच यशस्वीरीत्या पार पडल्या. यातील नागरी सेवा परीक्षेसाठी १२८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, ७९ विद्यार्थी परीक्षेला उपस्थित होते.
-
ज्वेलर्स व्यावसायिक देवकृष्णा सागर यांच्या कुटुंबाची ८ लाखांची फसवणूक
मुंबई : कफ परेड येथील ज्वेलर्स व्यावसायिक देवकृष्णा सागर यांच्या कुटुंबाची सायबर भामट्यांनी ८ लाखांची फसवणूक केली. महानगर गॅसचे बिल अपडेट करण्याच्या नावाखाली व्हॉट्सअॅपवर एपीके फाइल पाठवून ती इन्स्टॉल करण्यास भाग पाडण्यात आले. त्यानंतर मोबाईलवरील कॉल व मेसेज फॉरवर्ड करून बँक खात्यातून ८ लाखांची रक्कम लंपास करण्यात आली. याप्रकरणी सायबर पोलिसांकडे तक्रार करण्यात आली आहे.
-
सायन-प्रतीक्षानगरवासीय ‘बेस्ट’ विरोधात आक्रमक
मुंबई : सायन-प्रतीक्षानगर परिसरातील बेस्टचा वीज पुरवठा गेल्या वर्षभरापासून वारंवार खंडित होत असल्यामुळे स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत. उन्हाळा संपत आला तरी या समस्येतून नागरिकांची सुटका झालेली नाही. गेल्या तीन ते चार दिवसांपासून तर सतत वीज पुरवठा खंडित होत असून, नागरिक आता वीज पुरवठा नीटनेटका व्हावा, याकरिता आंदोलन करणार आहेत.
गोकुळ गीते निवडणूक लढण्यावर ठाम आहेत. महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यास गोकुळ गीते यांनी नकार दिला आहे. मंत्री उदय सामंत आणि गिरीश महाजन यांच्या भेटीनंतर गोकुळ गीते यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नाशिकच्या ओझर विमानतळावर अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी महायुतीतील नेत्यांची भेट घेतली होती. मतदारांचा कौल माझ्याकडे असल्याने मी पाठिंबा दिल्यास मतदारांचा घात होईल असं ते म्हणाले. त्यामुळे महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यास स्पष्ट नकार दिल्याची गोकुळ गीते यांची माहिती आहे. तर दुसरीकडे आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पीओपी (प्लास्टर ऑफ पॅरिस) गणेशमूर्तीच्या विसर्जनाबाबत पर्यावरणपूरक आणि व्यवहार्य धोरण निश्चित करण्याची मागणी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी) आणि बृहन्मुंबई महापालिकेकडे केली. समितीने पीओपीच्या उंच मूर्तीवर तात्काळ सरसकट बंदी घालण्याऐवजी विसर्जनानंतर मूर्ती संकलित करणे, त्यांची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावणे आणि त्यावर पुनर्प्रक्रिया करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्याची मागणी केली आहे. यासह देश-विदेशातील, मनोरंजन, क्रीडा आणि इतर क्षेत्रातील अपडेट्स एका क्लिकवर जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग फॉलो करा.