Maharashtra News LIVE : भाजपाचा वन पार्टी वन इलेक्शनमध्ये रस- संजय राऊत
Maharashtra News LIVE : वसई-विरार शहरात झालेल्या पूरपरिस्थिचा फटका शहरातील नागरिकांसह मुक्या जनावरांनाही बसला. वसईतील दत्तानी परिसरात पुराच्या पाण्यात वाहून आलेल्या तीन गायी मृतावस्थेत आढळून आल्या. यासह देश विदेश, महाराष्ट्र, राजकारण, मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींचे अपडेट्स वाचण्यासाठी दिवसभर फॉलो करा हा ब्लॉग.

LIVE NEWS & UPDATES
-
संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी काही वेळात दिवे घाटाची चढाई करून, घाटाच्या वरच्या टप्प्यात दाखल होणार
त्याआधी सकाळपासूनचं पालखीसोबत आलेल्या इतर दिंड्या दिवे घाटात दाखलं झाल्यात. त्यांच्या सोबत आलेल्या लाखो वारकऱ्यांच्या गर्दीने दिवे घाटाचा परिसर गजबजला. माऊली, माऊलीच्या नामघोषात, भक्तिमय वातावरणात घाटाचा परिसर निघाला न्हाऊन. अवघड टप्पा पार केल्यानंतर वारकऱ्यांच्यात पाहायला मिळतोय उस्ताह
-
समाज कल्याण विभागाचे अनुदानित ट्रॅक्टर थेट सांगलीत भाडेतत्त्वावर देण्याचा उद्योग समोर
नांदेड व जालना समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना देण्यात येणारे ट्रॅक्टर मध्ये घोटाळा झाल्याचा प्रकार सांगलीच्या मिरजेमध्ये समोर आला आहे. स्वाभिमानी स्वराज्य संघटनेकडून हा घोटाळा समोर आणण्यात आला असून मिरज तालुक्यातल्या एरंडोली येथे एका एजंटकडे 11 ट्रॅक्टर आढळून आले आहेत.14 ट्रक्टर विक्री करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
-
-
देवेंद्र फडणवीस केंद्रात केले की, बावनकुळे यांच्या हातात सूत्रे येतील- संजय राऊत
संजय राऊत यांनी मोठा दावा केला. संजय राऊत यांनी म्हटले की, 2029 नंतर मोदींचे सरकार राहणार नाही. देवेंद्र फडणवीस केंद्रात केले की, बावनकुळे यांच्या हातात सूत्रे येतील, असा मोठा दावा नुकताच संजय राऊत यांनी केले.
-
ठाण्यात झाड कोसळून महिला गंभीर जखमी
ठाण्यातील ब्रह्माळा तलाव परिसरात ६ जुलै रोजी सकाळी ८ च्या सुमारास झाड अंगावर कोसळून उथळसर येथील रहिवासी दीपा सुधीर चौधरी (वय ५७) या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्या पायाला, नाकाला आणि मणक्याला गंभीर दुखापत झाली असून ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत उपचारावर सुमारे ६ ते साडेसहा लाख रुपये खर्च झाला आहे.
-
संजय राऊतांचा भाजपावर गंभीर आरोप
वन पार्टी वन इलेक्शनमध्ये भाजपाचा अधिक रस असल्याचा गंभीर आरोप नुकताच संजय राऊत यांनी केला. महिला आरक्षणाच्या नावाखाली देश ताब्यात घ्यायचा का? असा प्रश्नही यादरम्यान संजय राऊत यांनी उपस्थित केला.
-
-
जुलै महिना निम्मा उलटला तरी जळगाव जिल्ह्यात अजूनही टँकरने पाणीपुरवठा सुरूच
जुलै महिना निम्मा उलटला तरी जळगाव जिल्ह्यात ३८ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. जिल्ह्यात भुसावळ, जामनेर, पारोळा, एरंडोल व अमळनेरमध्ये या तालुक्यांमध्ये पाण्याची टंचाई कायम आहे. जिल्ह्यात सध्या ३८ टँकरव्दारे पाणीपुरवठा होत असून जामनेर तालुक्यात सर्वाधिक २५ टँकर कार्यरत आहेत. अधिग्रहित विहिरींची संख्या ६४ गेली असून टँकर आणि अधिग्रहित विहिरींच्या माध्यमातून पाणी पुरवठा सुरू आहे.
-
परभणी – लग्नाचे आमिष दाखवून पीडितेवर दहा महिने अत्याचार
परभणी – लग्नाचे आमिष दाखवून पीडितेवर दहा महिने अत्याचार करण्यात आला. सेलू पोलीस स्टेशनं हद्दीतील ही घटना आहे. आरोपीने पीडितेला लग्न केल्याचं भासवून अत्याचार केले. आरोपीच्या कुटुंबातील दोन व्यक्तींकडून जातीवाचक शिवीगाळ करत धमकावल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले. आरोपी गणेश इंगोले याच्यासह कुटुंबातील अन्य दोन व्यक्ती विरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
-
मुंबई-नाशिक महामार्गावर जुन्या कसारा घाटात संरक्षक भिंत कोसळली
मुंबई-नाशिक महामार्गावर जुन्या कसारा घाटात संरक्षक भिंत कोसळली आहे. जव्हार फाट्यात भिंत कोसळल्यानंतर रस्त्याच्या कडेला भेगा पडल्या. मात्र पावसाने विश्रांती घेतल्यामुळे, मोठा धोका टळला. सुरक्षिततेच्या कारणास्तव रस्त्याल बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत.
-
मुंबईत हृदयाचा थरकाप उडवणारी बातमी, एकतर्फी प्रेमातून तरूणाने केली 12 वीच्या विद्यार्थिनीची हत्या
मुंबईच्या कांदिवलीमधून हृदय हेलावून टाकणारी बातमी समोर आली आहे. एकेरी प्रेमातून एका वेड्या आशिकाने 12वीच्या अल्पवयीन विद्यार्थिनीची निर्घृण हत्या केली. तिच्या चाकूने चेहऱ्यावर 16 पेक्षा जास्त वार करण्यात आले.
हा प्रकार कांदिवली पूर्वेतील दामूनगर सातारा कॅम्पजवळच्या जंगल परिसरात घडला. तेथे 12वीची विद्यार्थिनीचा मृतदेह आढळून आला. आरोपीने तिच्या चेहऱ्यावर चाकूने 16 पेक्षा जास्त वार केल्याचं पोस्टमार्टममध्ये समोर आलं.
-
मोशी येथील भीषण दुर्घटनेनंतर बचावकार्य चौथ्या दिवशी सुरू
मोशी येथील पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कचरा डेपोमध्ये घडलेल्या भीषण दुर्घटनेनंतर बचावकार्य चौथ्या दिवशी युद्धपातळीवर सुरू आहे. तब्बल 65 तास झाले तरी मदत कार्य सुरू आहे. अद्याप 7 ते 8 जण बेपत्ता असल्याने त्यांच्या नातेवाईकांच्या नजरा बचाव पथकांकडे लागल्या आहेत.
आता अत्याधुनिक कटरच्या मशनरीने दुसऱ्या मजल्याचा स्लॅब पाडण्यात आलाय. आता पहिल्या मजल्याचा स्लॅबचं पाडकाम सुरु करण्यात आलंय. या स्लॅब खालीच अडकलेले आठ कामगार असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
-
गंगापूर धरण ७० टक्के भरले, तरीही नाशिककरांची पाणीकपात कायम
नाशिक – गंगापूर धरण ७० टक्के भरले, तरीही नाशिककरांची पाणीकपात कायम आहे. महापालिकेकडून पाणीकपात रद्द करण्यास अद्याप नकार देण्यात आला आहे. आज शहराचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद असून रविवारी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. पुढील पावसाचा आढावा घेतल्यानंतरच पाणीकपातीबाबत निर्णय घेण्यात येईल.
मोशी येथील पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कचरा डेपोमध्ये घडलेल्या भीषण दुर्घटनेनंतर बचावकार्य चौथ्या दिवशी युद्धपातळीवर सुरू आहे. तब्बल 65 तास झाले तरी मदत कार्य सुरू आहे. बेपत्ता नागरिकांच्या नातेवाईकांच्या नजरा बचाव पथकांकडे लागल्या आहेत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज मुरबाड दौऱ्यावर असून विविध कार्यक्रमांना उपस्थिती लावणार आहेत. मुरबाडमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सुनेत्रा पवार यांच्या हस्ते गौरव होणार आहे. इगतपुरी तालुक्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे प्रमुख धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. सध्या दारणा धरणात 53.67 टक्के, मुकणे धरणात 34.63 टक्के, भावली धरणात 89 टक्के, भाम धरणात 50 टक्के, वाकी धरणात 23 टक्के, वालदेवी धरणात 72 टक्के आणि मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या वैतरणा धरणात 50 टक्के पाणीसाठा झाला आहे. यासह राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडी आणि अपडेट इथं वाचा.