
जालना जिल्ह्यातील उटवद शिवारात असलेल्या आनंद भारत गॅस एजन्सीच्या गोडाऊनवर चोरट्यांनी धाडसी दरोडा टाकत तब्बल ११० गॅस सिलिंडर लंपास केले आहेत. यामध्ये ९६ घरगुती सिलिंडर, १२ व्यावसायिक सिलिंडर आणि ५ किलोचे २ व्यावसायिक सिलिंडर अशा एकूण साडेचार लाख रुपयांच्या मुद्देमालाचा समावेश आहे. गॅस सिलिंडरच्या टंचाईच्या काळात इतक्या मोठ्या प्रमाणावर चोरी झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
महाराष्ट्र विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने दिल्लीला रवाना झाल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. या दौऱ्यात शिंदे भाजपच्या केंद्रीय नेत्यांची भेट घेणार असून, सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या खटल्याचा आढावा घेणार असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, मागील काही निवडणुकांमध्ये मित्रपक्षाकडून अपेक्षित सहकार्य न मिळाल्याने शिवसेनेचे उमेदवार पराभूत झाल्याचा एक विशेष अहवाल शिंदेंनी तयार केला असून, तो भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसमोर ठेवला जाण्याची शक्यता आहे. या दौऱ्यामुळे महायुतीमधील अंतर्गत घडामोडींना वेग आला आहे.
अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीने विविध प्रलंबित मागण्यांसाठी मुंबईत मंत्रालयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. ‘आदिवासींचे आरक्षण बंजारा समाजाला देऊ नये’ आणि ‘पंडित दीनदयाल उपाध्याय योजनेची ४० हजारांची मर्यादा रद्द करून ती ग्रामीण भागात सरसकट लागू करावी’, या प्रमुख मागण्यांसाठी हजारो आदिवासी बांधव रेल्वे आणि महामार्गाद्वारे मुंबईकडे कूच करणार आहेत. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांना घेराव घालण्याचा इशारा कार्यकर्त्यांनी दिला आहे. मागण्या मान्य न झाल्यास मराठवाडा आणि मुंबईला जाणारे पाणी रोखण्याचा तसेच धरण फोडण्याचा आक्रमक पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे.
नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर रविवारी इंडिगोच्या विमानातून इंधन गळती झाल्याची खळबळजनक घटना घडली. नागपूरहून गोव्याला जाण्यासाठी सज्ज असलेल्या ‘6E 6049’ या विमानाच्या ‘नोज व्हील’मधून अचानक इंधन गळू लागल्याचे तांत्रिक पथकाच्या लक्षात आले. सुदैवाने, विमान धावपट्टीवर असतानाच ही बाब निदर्शनास आल्याने तात्काळ उड्डाण थांबवून मोठी दुर्घटना टाळण्यात आली. सर्व प्रवासी सुरक्षित असून, तांत्रिक तपासणी आणि दुरुस्ती होईपर्यंत हे विमान नागपूर विमानतळावरच ‘ग्राऊंडेड’ करण्यात आले आहे.
नाशिकमधील त्र्यंबक रोडवरील नाईस संकुल परिसरात पुरवठा विभाग आणि सातपूर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत गॅस सिलिंडरचा संशयास्पद साठा उघडकीस आणला आहे. या कारवाईत विनापरवाना ५०० पेक्षा अधिक HP घरगुती आणि कमर्शियल गॅस सिलिंडरने भरलेले दोन ट्रक आणि रिक्षा ताब्यात घेण्यात आली आहे. रस्त्यावर इतक्या मोठ्या प्रमाणात सिलिंडरचा साठा असल्याने काळाबाजाराचा दाट संशय व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी पोलिसांनी ट्रकचालक आणि व्यवस्थापकाला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाच्या सखोल चौकशीतून गॅस वितरणातील मोठे रॅकेट समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
जालना जिल्ह्यातील भोकरदन आणि घनसावंगी शहरात पुरवठा विभागाने अवैध गॅस वापरांविरोधात धडक मोहीम राबवत एकूण २७ ठिकाणी धाडी टाकल्या. या कारवाईत हॉटेल, रेस्टॉरंट आणि व्यावसायिक प्रतिष्ठानांमध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा वापर होत असल्याचे उघड झाले आहे. भोकरदनमधून ८ तर घनसावंगीमधून ७ असे एकूण १५ सिलिंडर जप्त करण्यात आले आहेत. जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत संबंधित व्यावसायिकांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली असून, घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर करणाऱ्यांविरोधात प्रशासनाने आता कडक पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे.
तब्बल २७ लाख २ हजार रुपयांना गंडा ‘सेबी’कडे नोंदणी असल्याचा बनाव करून विश्वास संपादन. बनावट लेटरहेड आणि स्टेटमेंटद्वारे गुंतवणूकदारांची फसवणूक. सरकारवाडा पोलिसांत दोघांविरुद्ध गुन्हा दाखल. रोहित आणि सिद्धार्थ जांभूळकर यांच्यावर आरोप. इतर गुंतवणूकदारांनाही लाखोंचा फटका बसल्याचा संशय
मृतदेह सापडलेल्या ठिकाणी सिरींज आणि चाकू आढळल्याचा युक्तिवाद. संशयित डॉ. नीलेश जेजुरकर आणि महिला डॉक्टरच्या अटकपूर्व जामीनावर आज सुनावणी. पती मानसोपचारतज्ज्ञ असल्याने आत्महत्येस प्रवृत्त केलं, सरकारी पक्षाचा आरोप. दोघे घरात असताना आत्महत्या कशी? फिर्यादी पक्षाचा सवाल. तपास अपूर्ण असल्याने जामीन देऊ नये, सरकारी वकिलांची मागणी. बचाव पक्षाकडून आरोप फेटाळले, ही आत्महत्या असल्याचा दावा
नागपूरसह मध्य भारतातून तिरुपती बालाजी दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी आता रेल्वेची नियमित सेवा. हिसार ते तिरुपती रेल्वे आता रोज धावणार. हिसार ते तिरुपती रेल्वे नियमित केल्याने या निर्णयामुळे विदर्भातून तिरुपती जाणाऱ्या भाविकांना नियमित रेल्वे उपलब्ध असणार आहे
कोणत्याही प्रकाराची निविदा न काढता हा खर्च करण्यात आला.. आता स्थायी समितीची कार्योतर मंजुरी घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा काँग्रेस नगरसेवकांचा आरोप. कार्यक्रमासाठी स्टेज उभारणी, मंडप, पाणी, चहा, भोजन व्यवस्था यावर मोठ्या प्रमाणात खर्च.. फुल सजावटीसाठी अडीच लाख, माणसासाठी 2 लाख 57 हजार , रेड कार्पेटसाठी 51 हजार, एलइडी वॉलसाठी 32 हजार तर 1500 लोकांच्या भोजनासाठी 4 लाख 44 हजार खर्च दाखविण्यात आला आहे..
अनधिकृत शाळांची नेमकी माहिती नसल्याने दरवर्षी विद्यार्थी आणि पालकांची फसवणूक होते. यंदा बहुतेक खासगी शाळची पूर्व प्राथमिक वर्गाची प्रवेश प्रक्रिया पूर्ण. झाली तरी अनधिकृत शाळांची यादी जाहीर करण्यात आलेली नाही मुंबई महानगरमधील अनधिकृत शाळांची यादी शैक्षणिक वर्ष सुरु होनापूर्वी आहीर करण्यात यावी, अशी मागणी पालक संघटनांकडून करण्यात येत आहे
ठाणे महापालिकेतील रखडलेल्या 1773 पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. पुढच्या महिन्यापासून भरती प्रक्रियेला सुरुवात होण्याची चिन्हे आहेत. सार्वत्रिक निवडणूक लागल्याने या भरती प्रक्रियेला ब्रेक लागला होता. तांत्रिक कारणामुळे तब्बल सहा महिन्यापासून रखडलेल्या ठाणे महानगरपालिकेतील 1773 पदांच्या भरतीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. ठाणे महापालिकेतील क आणि ड वर्गातील 1773 पदांसाठी ऑगस्ट 2025 रोजी जाहिरात काढण्यात आली होती. यामध्ये सर्वाधिक पदे ही आरोग्य विभाग आणि अग्निशमन विभागासाठी असून यामध्ये इतर पदांचा देखील समावेश आहे.
दिल्लीत आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजपच्या केंद्रीय नेत्यांची भेट घेणार आहेत. सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष चिन्ह याबाबत सुरू असलेल्या खटल्याचाही आढावा घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. काल केंद्रीय अधिवेशनात सहभागी होणाऱ्या शिवसेना खासदारांची शिंदेंनी बैठक घेत पक्षाची नेमकी भूमिका काय असणार याबाबत मार्गदर्शन केलं. मात्र मुंबईतील आर्थसंकल्पीय अधिवेशन सोडून शिंदे तातडीने दिल्लीला गेल्याने विविध चर्चांना उधाण आलं आहे.
यात प्रामुख्याने मागील ३ निवडणुकांमध्ये मित्र पक्षाकडून विविध ठिकाणी न मिळालेले सहकार्य, त्यामुळे पक्षाचे अनेक उमेदवार पराभूत झाले याचा अहवालही पक्षांतर्गत बनवण्यात आल्याची माहिती आहे. हा अहवाल शिंदेंकडून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे ठेवला जाऊ शकतो अशी पक्षांतर्गत चर्चा आहे.
जालन्यातील उटवद शिवारातील एका गॅस एजन्सीच्या गोडाऊन मधून तब्बल 110 गॅस सिलेंडर चोरीला गेले आहे. उटवद शिवारातील आनंद भारत गॅस एजन्सीच्या गोडाऊन मधून 96 घरगुती गॅस सिलेंडरसह 12 व्यावसायिक वापराचे गॅस सिलिंडर आणि दोन पाच किलोचे व्यावसायिक गॅस सिलेंडर चोरीला गेले आहेत.या प्रकरणी सिद्धार्थ आढाव यांच्या फिर्यादीवरून मौजपुरी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मध्य रेल्वेवरील विनातिकीट प्रवाशांना रोखण्यासाठी वारंवार तिकीट तपासणी मोहीम राबवण्यात येत आहे. २०२५-२६ या आर्थिक वर्षात मध्य रेल्वेवरील ३८ लाख प्रकरणांमधून २२७ कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला. मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत यंदाच्या आर्थिक वर्षात विनातिकीट प्रवाशांची संख्या १० टक्क्यांनी वाढली आहे.
उन्हाळी सुट्ट्यांनिमित्त कोकण रेल्वेने मध्य रेल्वेशी समन्वय साधून मुंबई ते गोवा विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी)-मडगाव साप्ताहिक विशेष रेल्वेगाडी १६ एप्रिल ते ११ जून या कालावधीत, दर गुरुवारी रात्री १२.२० वाजता चालवली जाईल. त्याचप्रमाणे लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) मडगाव ही साप्ताहिक विशेष रेल्वेगाडी १७ एप्रिल ते १२ जून या कालावधीत दर शुक्रवारी धावणार आहे. रात्री १२.५५ वाजता ही गाडी एलटीटीहून सुटेल.
गुढीपाडवा सण जवळ येत असताना वाशी येथील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) फळ बाजारात हापूस आंब्याची आवक सुरू झाली आहे. परंतु कोकणातील हापूस मर्यादित प्रमाणात येत असल्याने दर गगनाला भिडले आहेत. परिणामी, यंदा गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आमरस-पुरीचा बेत महागात पडण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, सोमवारी बाजारात एकूण १६,८४५ आंब्याच्या दाखल झाल्या. त्यात कोकणातील पेट्या ६,३२५ पेट्या, तर इतर राज्यांतील १०,५२० पेट्यांची नोंद झाली.
अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा उद्योजक पती राज कुंद्रा यांना लक्ष्य करून तयार करण्यात आलेली एआय-निर्मित डीपफेक छायाचित्रे आणि चित्रफिती तात्काळ हटवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने जवळपास २८ संकेतस्थळांना दिले आहेत. त्यासाठी या संकेतस्थळांना आठवड्याची मुदत न्यायालयाने दिली आहे. या प्रकारामुळे शिल्पा हिच्या व्यक्तिमत्त्व हक्कांचे उल्लंघन झाले आहे, असे निरीक्षण न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांच्या एकलपीठाने नोंदवले.
केंद्र सरकारच्या अन्न मंत्रालयाने २०२५-२६ मध्ये (ऑक्टोबर ते सप्टेंबर) साखर निर्यातीसाठी अतिरिक्त ८७,५८७टनांचा कोटा मंजूर केला आहे. साखर कारखान्यांकडून आलेल्या मागण्यांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला, असे मंत्रालयाने सोमवारी जाहीर केले. यापूर्वी सरकारने या हंगामासाठी १५ लाख टन साखर निर्यातीला परवानगी दिली होती. त्यानंतर फेब्रुवारीमध्ये इच्छुक साखर कारखान्यांना अदलाबदल न करता येणाऱ्या स्वरूपात अतिरिक्त पाच लाख टनांचा कोटा देण्यात आला होता. त्यासाठी फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याची मुदत दिली होती.
सरलेल्या फेब्रुवारीमध्ये घाऊक महागाईचा भडका उडाला असून, ती ११ महिन्यांतील उच्चांकी पातळीवर पोहोचली. भाज्यांच्या किमतीत जरी या महिन्यांत घसरण झाली असली तरी खाद्य आणि बिगरखाद्य वस्तूंच्या किमतीत वाढ नोंदविण्यात आल्याचे सोमवारी जाहीर झालेल्या सरकारी मासिक आकडेवारीने स्पष्ट केले. घाऊक किंमत निर्देशांकावर आधारीत घाऊक महागाई दर फेब्रुवारीत २.१३ टक्के नोंदविण्यात आला. या निर्देशांकात झालेली ही सलग चौथ्या महिन्यातील वाढ आहे. या आधी जानेवारीत तो १.८१ टक्के तर गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये २.४५ टक्के पातळीवर होता.
सरलेल्या फेब्रुवारीमध्ये घाऊक महागाईचा भडका उडाला असून, ती 11 महिन्यांतील उच्चांकी पातळीवर पोहोचली आहे. भाज्यांच्या किंमतीत जरी या महिन्यांत घसरण झाली असली तरी खाद्य आणि बिगरखाद्य वस्तूंच्या किमतीत वाढ नोंदविण्यात आल्याचं सोमवारी जाहीर झालेल्या सरकारी मासिक आकडेवारीने स्पष्ट केलं. घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित घाऊक महागाई दर फेब्रुवारीत 2.13 टक्के नोंदविण्यात आला. या निर्देशांकात झालेली ही सलग चौथ्या महिन्यातील वाढ आहे. या आधी जानेवारीत तो 1.81 टक्के तर गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये 2.45 टक्के पातळीवर होता. तर दुसरीकडे मध्य रेल्वेवरील विनातिकीट प्रवाशांना रोखण्यासाठी वारंवार तिकीट तपासणी मोहीम राबवण्यात येत आहे. 2025-26 या आर्थिक वर्षात मध्य रेल्वेवरील 38 लाख प्रकरणांमधून 227 कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला. मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत यंदाच्या आर्थिक वर्षात विनातिकीट प्रवाशांची संख्या 10 टक्क्यांनी वाढली आहे. यासह महाराष्ट्र, देश विदेश, क्रीडा, मनोरंजन क्षेत्रातील प्रत्येक महत्वाच्या बातमीचे अपडेटस जाणून घेण्यासाठी दिवसभर टीव्ही9 मराठीचा हा ब्लॉग फॉलो करा.