
धुळे महानगरपालिकेच्या महापौर पदाच्या निवडणुकीला सुरुवात झाली आहे. पिठासीन अधिकारी भाग्यश्री विसपुते यांच्या उपस्थितीमध्ये महापौर निवडणूक प्रक्रिया सुरू. महापौर पदासाठी तिरंगी लढत आहे. भाजपा, राष्ट्रवादी अजित पवार, शिवसेना शिंदे गट, एम आय एम पक्षांचे सदस्य सभागृहात दाखल झाले आहेत.
नाशिक महानगरपालिकेच्या सत्तास्थापनेचा पेच अखेर सुटला आहे. भाजप आणि शिवसेनेच्या शिंदे गटाने एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. निवडणुकीत एकमेकांविरुद्ध लढलेले हे दोन्ही पक्ष आता सत्तेत सहभागी होणार आहे. सत्तेच्या या समीकरणात अजित पवारांच्या राष्ट्रवादीनेही भाजपला पाठिंबा दिला आहे. ठरलेल्या सूत्रानुसार, नाशिकच्या महापौरपदी भाजपच्या हिमगौरी आडके यांची वर्णी लागणार आहे. तर उपमहापौरपद शिंदे गटाच्या वाट्याला गेले असून विलास शिंदे या पदाची धुरा सांभाळणार आहेत.
मुंबई महानगरपालिकेच्या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या स्थायी समितीच्या सदस्य निवडीसाठी शिवसेना ठाकरे गटात वेगवान हालचाली पाहायला मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मातोश्री वर झालेल्या विशेष बैठकीत तीन अनुभवी नगरसेवकांच्या नावांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यामध्ये माजी महापौर विशाखा राऊत, माजी स्थायी समिती अध्यक्ष मिलिंद वैद्य आणि मिनाक्षी अनिल पाटणकर यांच्या नावांचा प्रामुख्याने विचार सुरू आहे. आगामी महापालिका निवडणुका आणि पक्षाची पालिकेतील पकड मजबूत ठेवण्याच्या दृष्टीने अभ्यासू आणि आक्रमक चेहऱ्यांना संधी देण्याचे संकेत ठाकरे गटाने दिले आहेत. या नावावर लवकरच अधिकृत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
धुळे महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी आज निवडणूक पार पडणार आहे. त्यामुळे शहरात राजकीय हालचालींना वेग आला आहे. ७४ पैकी ५० जागांसह स्पष्ट बहुमत असलेल्या भाजपने महापौर पदासाठी मायादेवी परदेशी, तर उपमहापौर पदासाठी ज्योत्स्ना प्रफुल्ल पाटील यांना रिंगणात उतरवले आहे. मात्र, महायुतीमधील मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना (शिंदे गट) यांनीही आपले उमेदवार उभे केल्याने येथे तिरंगी लढत पाहायला मिळत आहे. तसेच अनुचित प्रकार टाळण्यासाठी महापालिका परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
धाराशिव शहरासह कळंब, वाशी आणि भूम परिसरात गेल्या दोन दिवसांपासून गूढ आवाजांचे सत्र सुरू असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या आवाजांची तीव्रता इतकी मोठी होती की, अनेक ठिकाणी घरातील भांडी, खिडक्या आणि दरवाजे हादरल्याचे नागरिकांनी सांगितले. अचानक झालेल्या या प्रकारामुळे अनेकांना लातूर-किलारी भूकंपाच्या आठवणी ताज्या झाल्या. मात्र, या संदर्भात जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी स्पष्ट केले आहे की, नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीकडे भूकंपाची कोणतीही अधिकृत नोंद झालेली नाही. प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे. नागरिकांनी घाबरून न जाता अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
गडचिरोली जिल्हयातील भामरागड तालुक्यातील सॅन्ड्रा मांडरा परिसरात काल रात्री सी-६० पथक आणि माओवाद्यांमध्ये झालेल्या भीषण चकमकीत तीन माओवाद्यांना ठार मारण्यात पोलिसांना यश आले आहे. यामध्ये दोन पुरुष आणि एका महिला माओवाद्याचा समावेश असून, माओवाद्यांचे दोन तळ उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. मात्र, या चकमकीत सी-६० पथकाचे जवान दीपक मडावी यांना वीरमरण प्राप्त झाले. तर जोगा मडावी हे जवान जखमी झाले आहेत. यावेळी घटनास्थळावरून ए.के. ४७ आणि एस.एल.आर. सह मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीतील बालयोगी ऑडिटोरियममध्ये परीक्षा पे चर्चा २०२६ अंतर्गत विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना यशाचा कानमंत्र दिला. परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी मार्गदर्शन करताना पंतप्रधान म्हणाले की, विद्यार्थ्यांनी कोणत्या विषयाची तयारी कशी करायची याचे चोख नियोजन करणे आवश्यक आहे. प्रत्येक विषयाला किती वेळ द्यायचा हे आधीच ठरवल्यास अभ्यासाचा ताण येत नाही. वेळेचे व्यवस्थापन अतिशय महत्त्वाचे असून आज केलेली मेहनतच तुमचे भविष्य उज्ज्वल करेल अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला. आत्मविश्वासाने आणि योग्य नियोजनाने परीक्षेला सामोरे जाण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘परीक्षा पे चर्चा २०२६ अंतर्गत नवी दिल्लीतील बालयोगी ऑडिटोरियममध्ये देशभरातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. परीक्षेचा ताण, भीती आणि पालकांच्या अपेक्षांचे ओझे कमी करण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमात पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली. परीक्षा हा आयुष्याचा अंत नसून ती केवळ एक पायरी आहे, असा मंत्र मोदींनी विद्यार्थ्यांना दिला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना तणावमुक्त राहून आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जाण्याचा सल्ला दिला.
महायुती कडून श्रीचंद तेजवानी; तर काँग्रेस कडून संजय शिरभाते महापौर पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात. उपमहापौर पदासाठी युवा स्वाभिमान कडून सचिन भेंडे तर काँग्रेस कडून लुधना तनवीर निवडणुकीच्या रिंगणात, पहिल्या सव्वा वर्षात भाजपचे श्रीचंद तेजवानी तर दुसऱ्या सव्वा वर्षासाठी भाजपचे आशिष अतकरे यांची नावे. रवी राणांच्या युवा स्वाभिमान पार्टी सोबतच अजित पवारांची राष्ट्रवादी ही सत्तेमध्ये सहभागी. अमरावती महानगरपालिकेला आज लाभणार सतरावे महापौर आणि उपमहापौर. तब्बल चार वर्षानंतर आज अमरावती महानगरपालिकेमध्ये बसणार महापौर
१२० कोटींच्या नवीन तर १०७ कोटींच्या जुन्या मलवाहिका बदलणार. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या अमृत २ अभियानांतर्गत मलनिस्सारण प्रकल्पांना राज्य शासनाची प्रशासकीय मंजुरी. प्रकल्पांना मंजुरी मिळाल्याने सिंहस्थापूर्वी गोदावरी नदीप्रदूषणमुक्तीच्या प्रयत्नांना मिळणार बळ
महापौर–उपमहापौर पदावर विराजमान , पण गाडी-चालक-सुरक्षा नाही. महापौर–उपमहापौर निवड होऊन तीन दिवस उलटून मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने प्रशासनावर नाराजी इतर महापालिका तत्पर; KDMC प्रशासन मात्र मागेमहापौर–उपमहापौरयाच्या नाराजी नंतर आयुक्तांच्या हस्तक्षेपानंतर 19 कर्मचाऱ्यांची तात्पुरती व्यवस्था
काँग्रेस नवनिर्वाचित नगरसेवकांचा सपकाळ यांच्या हस्ते सत्कार करत महत्त्वाची बैठकय बैठकीत कल्याण डोंबिवली महानगरपालिका संदर्भातील सर्व नियुक्त्यांचे अधिकार प्रदेशाध्यक्षांना देण्याचा ठराव. मुंबईच्या टिळक भवनात ठराव; मंजूर जिल्हा व प्रदेश अध्यक्ष सह इतर पदाधिकाऱ्यांची होती उपस्थिती
मात्र काही नेत्यांना आपल्या राजकीय अस्तित्वाला धोका निर्माण होईल असं वाटत असल्याने डावपेच. खासदार निलेश लंके यांची नाव न घेता राष्ट्रवादी विलीनीकरण विरोध करणाऱ्या नेत्यांवर टीका. पुणे महानगरपालिकेत चॉईसने उमेदवारांना चिन्ह दिली. जिल्हा परिषद निवडणुकीत घड्याळ चिन्हावरील उमेदवारांचा जयंत पाटील मी प्रचार केला , वरिष्ठ पातळीवर सर्व काही ठरलं होतं
छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या महापौर पदासाठी नामनिर्देशन भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे.आज दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज घेता येणार असून, सायंकाळी ६ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे.दरम्यान, भाजपने गोविंद केंद्रे यांची गटनेतेपदी निवड केली असून, काल भाजपच्या सर्व नगरसेवकांनी विभागीय आयुक्त कार्यालयात जाऊन गट नोंदणी पूर्ण केली आहे. भाजपचा महापौर कोण होणार, याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नसली तरी पक्षांतर्गत हालचालींना वेग आला आहे. सध्या समीर राजूरकर, अनिल मकरिये, महेश माळवतकर आणि शिवाजी दांडगे ही चार नावे चर्चेत आहेत.
जळगावात आरटीओ कार्यालयात बनावट कागदपत्रे सादर करून मूळ मालकाच्या संमतीशिवाय महागडी चारचाकी गाडी स्वतःच्या नावावर करून घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी आरटीओ कार्यालयातील वरिष्ठ लिपिक यांच्या तक्रारीवरून पाच जणांविरुद्ध रामानंद नगर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवराज पाटील, अक्षय सोनवणे व आणखी तीन जण अशा एकूण 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरात दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पिंप्राळा परिसरातील सोनी नगर, आनंद मंगल सोसायटी निसर्ग कॉलनीसह या परिसरात दूषित पाणीपुरवठा येत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहे.गेल्या अनेक दिवसांपासून येणाऱ्या दूषित पाण्यामुळे उलटी जुलाब पोटदुखी या आजारांची भीती बळावली आहे. जळगाव महानगरपालिकेने त्वरित याकडे लक्ष देऊन दूषित पाण्याची समस्या सोडवावी अशी मागणी करण्यात येत आहे.
वानवडी परिसरातील गंगा सॅटेलाईट सोसायटीजवळील भैरोबा नाल्यावरील पुलावर आज सकाळी झालेल्या भीषण अपघातात चारचाकी गाडी अनियंत्रित होऊन थेट नाल्यात कोसळली. या दुर्घटनेत वाहनाचा चालक गंभीर जखमी झाला होता. मात्र, प्रसंगावधान राखत नायर आशिष कुमार यादव यांनी तत्काळ मदत करत चालकाचा जीव वाचवला. सकाळी दहाच्या सुमारास पुलावरून जात असताना आशिष कुमार यादव यांना रस्त्यावर मोठी गर्दी दिसली,चौकशी केल्यावर नाल्यात पडलेली चारचाकी पडल्याचे कळले. वाहनात हालचाल होत असल्याचे जाणवताच आत कोणी अडकले असावे, असा संशय आल्याने त्यांनी क्षणाचाही विलंब न करता नाल्यात उतरून पाहणी केली. कारमध्ये एक व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत अडकलेली दिसली होती.
वाढीव शिक्षक द्या या मागणीसाठी विद्यार्थी व पालक जिल्हा परिषद आवारात आले असता हिंगोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड विद्यार्थ्यांसह पालकावर संतापले. आमच्या शाळेला वाढीव शिक्षक द्या या मागणीसाठी सेनगाव तालुक्यातील हिवरखेडा येथील विद्यार्थी व पालक मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या दालनात आले असता मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड संतापल्याच्या व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध शस्त्रांविरुद्ध पोलिसांनी मोहीम तीव्र केली आहे. छत्रपती संभाजीनगर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने पाचोड परिसरात कारवाई करत गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसांसह एका तरुणाला अटक केली. जालन्यातील देशगव्हान येथील विशाल लहु पालवे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
सोलापूर महापौर पदासाठी भाजपकडून विनायक कोंड्याल आणि उपमहापौर पदासाठी ज्ञानेश्वरी देवकर यांचे अर्ज दाखल करण्यात आलेत. सोलापूर महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर निवडणुकीत शिवसेना शिंदे गट आणि एमआयएम पक्षाने उमेदवार दिले आहेत. शिवसेनेकडून महापौर आणि उपमहापौर पदासाठी प्रियदर्शन साठे यांना उमेदवारी तर एमआयएमकडून महापौर पदासाठी तौफिक हत्तुरे तरी उपमहापौर पदासाठी आसिफ शेख यांना उमेदवारी देण्यात आलीय.
अमरावती महानगरपालिकेच्या ठरला महापौर आणि उपमहापौर पदासाठी आज निवडणूक होत आहे. महायुती कडून श्रीचंद तेजवानी तर काँग्रेस कडून संजय शिरभाते महापौर पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. उपमहापौर पदासाठी युवा स्वाभिमान कडून सचिन भेंडे तर काँग्रेस कडून लुधना तनवीर निवडणुकीच्या रिंगणात आहेत. पहिल्या सव्वा वर्षात भाजपचे श्रीचंद तेजवानी तर दुसर्या सव्वा वर्षासाठी भाजपचे आशिष अतकरे यांची निवड झाली. रवी राणांच्या युवा स्वाभिमान पार्टी सोबतच अजित पवारांची राष्ट्रवादी ही सत्तेमध्ये सहभागी झाली आहे.
आज राज्यातील 8 महानगरपालिकांमध्ये महापौर आणि उपमहापौर निवड होणार आहे. काही महानगरपालिकेत गटनेता पदाची निवड झाली आहे. तर चंद्रपूरमध्ये काँग्रेसमधील वाद अजून संपलेला नाही. गटनेता पदाची नोंदणीच अजून रखडली आहे. मालेगावमध्ये एमआयएमच्या नेत्यांनी मंत्री दादा भुसे यांची भेट घेतल्याने चर्चा रंगली आहे. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी कार्यकर्ते तयारीला लागले आहेत. तर दोन्ही राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चा अजूनही शमलेल्या नाहीत. दोन्ही बाजूने वेगवेगळे दावे करण्यात येत आहेत. या वादात इतर पक्षांच्या नेत्यांनी पण उडी घेतल्याने अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांवर टीका करण्यात येत आहे. राज्यातील इतर प्रमुख घडामोडींची अपडेट इथं पाहा