AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra ZP Election Results 2026 : जिल्हा परिषद निकाल, दुपारी 12.40 पर्यंत कुठला पक्ष किती जागांवर आघाडीवर? जाणून घ्या

Maharashtra ZP Election Results 2026 : जिल्हा परिषद निवडणुकीचे निकाल येत आहेत. आतापर्यंत जी मतमोजणी झालीय, त्यानुसार कुठला पक्ष किती जागांवर आघाडीवर आहे जाणून घ्या.

Maharashtra ZP Election Results 2026 : जिल्हा परिषद निकाल, दुपारी 12.40 पर्यंत कुठला पक्ष किती जागांवर आघाडीवर? जाणून घ्या
ZP Election Results 2026
| Updated on: Feb 09, 2026 | 1:09 PM
Share

आज जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे निकाल येत आहेत. एकूण 12 जिल्हा परिषदांसाठी शनिवारी मतदान झालं होतं. पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, छत्रपती संभाजी नगर, सांगली, रायगड, लातूर, रत्नागिरी, धाराशिव, परभणी आणि सिंधुदुर्ग या जिल्हा परिषदांसाठी निवडणूक झालेली. 12 जिल्हा परिषदांमध्ये एकूण 461 जागांसाठी निवडणूक झाली. सध्या मतमोजणीचा जो कल आहे, त्यानुसार भाजप 7, एकनाथ शिंदे शिवसेना 2 आणि राष्ट्रवादी अजितदादा पवार यांचा पक्ष 1 जिल्हा परिषदेमध्ये आघाडीवर आहे. काँग्रेस दोन जिल्हा परिषदांमध्ये आघाडीवर आहे. यात कोल्हापूर आणि दुसरा लातूर आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे गटाला खातही उघडता आलेलं नाही.

नगर परिषद, महापालिकांप्रमाणे जिल्हा परिषद निवडणुकीतही महायुती सुसाट आहे. भाजप नंबर एकचा पक्ष ठरताना दिसतोय. त्याखालोखाल एकनाथ शिंदे यांची शिवसेना दुसऱ्या स्थानी आहे. महाविकास आघाडीत फक्त काँग्रेसचं अस्तित्व दिसतय. शरद पवार आणि उद्धव ठाकरे गट अपयशी ठरला आहे.

कुठला पक्ष किती जागांवर आघाडीवर?

12 जिल्हा परिषदांमध्ये एकूण 461 जागांसाठी निवडणूक झाली. दुपारी 12.40 पर्यंत जे निकाल आलेत, त्यानुसार भाजप 170 जागांवर, एकनाथ शिंदे शिवसेना 98 जागी, राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट 92 जागी आघाडीवर आहे. काँग्रेस 37, उद्धव ठाकरे शिवसेना 24, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष 16 आणि इतर 24 जागांवर आघाडीवर आहेत.

कोल्हापुर जिल्हा परिषदेचा निकाल काय?

कोल्हापूर जिल्हा परिषदेत 68 पैकी 19 जागांचे अधिकृत निकाल आले आहेत. सर्वाधिक 6 जागा काँग्रेसने जिंकल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपने प्रत्येकी 4 जागा जिंकल्या आहेत. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने 3 जागा आणि जनसुराज्यनेही दोन जागांवर विजय मिळाला आहे.