AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सरकारला पडला लाडक्या बहिणींचा विसर, 2100 रुपयांचं काय झालं ? राष्ट्रवादीच्या नेत्याचा सवाल

महाराष्ट्रातील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत महिलांना आश्वासित केलेले 2100 रुपये मानधन अद्याप मिळालेले नाही. निवडणूकपूर्व आश्वासनांची आठवण करून देत विरोधी पक्ष नेते आता सरकारवर निशाणा साधत आहेत. सरकार मार्च महिन्यातील अर्थसंकल्पात याबाबत निर्णय घेण्याची शक्यता वर्तवत आहे, पण महिलांना अद्याप खात्री नाही. अर्ज फेटाळण्याच्या भीतीनेही महिलांमध्ये असंतोष आहे.

सरकारला पडला लाडक्या बहिणींचा विसर, 2100 रुपयांचं काय झालं ? राष्ट्रवादीच्या नेत्याचा सवाल
| Updated on: Jan 22, 2025 | 9:27 AM
Share

महायुतीच्या सरकारने जुलै महिन्यात जाहीर केलेली ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ अनेक अर्थांनी गाजत्ये. त्या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या 21 ते 65 वयोगटातील महिलांना दरमहा 1500 रुपये सरकारतर्फे देण्यात येतात. एवढेच नव्हे तर विधानसभा निवडणुकीत महायुतीचं सराकर पुन्हा आलं तर लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ असं आश्वासन अनेक नेत्यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान दिलं होतं. नोव्हेंबर महिन्यात निवडणुकीचे निकाल लागले, महायुतील घवघवीत यश मिळालं, डिसेंबरमध्ये तर शपथविधी होऊन आता सरकारही व्यवस्थित कार्यरत आहे, मात्र महायुतीसाठी गेमचेंजर ठरलेल्या लाडकी बहीण योजनेतील 2100 रुपयांच्या आश्वासनाचा सरकारला विसर पडलाय की काय असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार असा सवाल महिला विचारत असून एकेकाळी याच योजनेवरून सरकारला धारेवर धरणाऱ्या विरोधकांनी आता याच मुद्यावरून सरकारला पुन्हा घेरल आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील नेते, राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही याच मुद्यावरून ट्विट करत सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. ‘ निवडणुका होऊन दोन महिने लोटले. आता शासनाला लाडक्या बहिणींचा विसर पडला आहे. त्यांच्या मानधनात वाढ करण्यासाठी कोणतीही हालचाल होताना दिसत नाही ‘ असे म्हणत देशमुख यांनी महायुती सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्रही लिहीलं आहे. छाननीच्या आडून लाडक्या बहीणींचे अर्ज रद्द करू नये अशी मागणीही त्यांनी केली आहे.

काय आहे अनिल देशमुख यांचं ट्विट ?

X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनिल देशमुख यांनी एक ट्विट करत सरकारला लाडकी बहीण योजनेवरून काही प्रश्न विचारले आहेत. ” राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने लाडक्या बहिणींना 2100 रुपये मानधन देण्याचे आश्वासन दिले होते. निवडणुका होऊन दोन महिने लोटले. आता शासनाला लाडक्या बहिणींचा विसर पडला आहे. त्यांच्या मानधनात वाढ करण्यासाठी कोणतीही हालचाल होताना दिसत नाही.

लाडक्या बहिणींना दिलेले आश्वासन शासनाने तत्काळ पूर्ण करावे. छाननीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात लाडक्या बहिणींचे अर्ज बाद करण्यात येणार आहेत. असे झाल्यास आम्ही राज्यात मोठे आंदोलन उभे करू!” असा इशाराचा अनिल देशमुख यांनी दिला आहे.

2100 रुपये कधी मिळणार ?

काही दिवसांपूर्वी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या संदर्भात एक महत्वाचं वक्तव्य केलं होतं. मार्च महिन्यानंतरच लाडक्या बहिणींचा हप्ता 1500 रुपयांवरून 2100 रुपये होणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळतील, असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही बजेटमध्ये यावर विचार केला जाईल, असे सांगितले. त्यामुळे मार्च महिन्यातील अर्थसंकल्पात योजनेत सुधारणा होण्याची शक्यता आहे. त्यानंतर महिलांना 2100 रुपये मिळणार का हे स्पष्ट होईल.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.