AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सरकारला पडला लाडक्या बहिणींचा विसर, 2100 रुपयांचं काय झालं ? राष्ट्रवादीच्या नेत्याचा सवाल

महाराष्ट्रातील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत महिलांना आश्वासित केलेले 2100 रुपये मानधन अद्याप मिळालेले नाही. निवडणूकपूर्व आश्वासनांची आठवण करून देत विरोधी पक्ष नेते आता सरकारवर निशाणा साधत आहेत. सरकार मार्च महिन्यातील अर्थसंकल्पात याबाबत निर्णय घेण्याची शक्यता वर्तवत आहे, पण महिलांना अद्याप खात्री नाही. अर्ज फेटाळण्याच्या भीतीनेही महिलांमध्ये असंतोष आहे.

सरकारला पडला लाडक्या बहिणींचा विसर, 2100 रुपयांचं काय झालं ? राष्ट्रवादीच्या नेत्याचा सवाल
| Updated on: Jan 22, 2025 | 9:27 AM
Share

महायुतीच्या सरकारने जुलै महिन्यात जाहीर केलेली ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ अनेक अर्थांनी गाजत्ये. त्या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या 21 ते 65 वयोगटातील महिलांना दरमहा 1500 रुपये सरकारतर्फे देण्यात येतात. एवढेच नव्हे तर विधानसभा निवडणुकीत महायुतीचं सराकर पुन्हा आलं तर लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ असं आश्वासन अनेक नेत्यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान दिलं होतं. नोव्हेंबर महिन्यात निवडणुकीचे निकाल लागले, महायुतील घवघवीत यश मिळालं, डिसेंबरमध्ये तर शपथविधी होऊन आता सरकारही व्यवस्थित कार्यरत आहे, मात्र महायुतीसाठी गेमचेंजर ठरलेल्या लाडकी बहीण योजनेतील 2100 रुपयांच्या आश्वासनाचा सरकारला विसर पडलाय की काय असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार असा सवाल महिला विचारत असून एकेकाळी याच योजनेवरून सरकारला धारेवर धरणाऱ्या विरोधकांनी आता याच मुद्यावरून सरकारला पुन्हा घेरल आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील नेते, राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही याच मुद्यावरून ट्विट करत सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. ‘ निवडणुका होऊन दोन महिने लोटले. आता शासनाला लाडक्या बहिणींचा विसर पडला आहे. त्यांच्या मानधनात वाढ करण्यासाठी कोणतीही हालचाल होताना दिसत नाही ‘ असे म्हणत देशमुख यांनी महायुती सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्रही लिहीलं आहे. छाननीच्या आडून लाडक्या बहीणींचे अर्ज रद्द करू नये अशी मागणीही त्यांनी केली आहे.

काय आहे अनिल देशमुख यांचं ट्विट ?

X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनिल देशमुख यांनी एक ट्विट करत सरकारला लाडकी बहीण योजनेवरून काही प्रश्न विचारले आहेत. ” राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने लाडक्या बहिणींना 2100 रुपये मानधन देण्याचे आश्वासन दिले होते. निवडणुका होऊन दोन महिने लोटले. आता शासनाला लाडक्या बहिणींचा विसर पडला आहे. त्यांच्या मानधनात वाढ करण्यासाठी कोणतीही हालचाल होताना दिसत नाही.

लाडक्या बहिणींना दिलेले आश्वासन शासनाने तत्काळ पूर्ण करावे. छाननीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात लाडक्या बहिणींचे अर्ज बाद करण्यात येणार आहेत. असे झाल्यास आम्ही राज्यात मोठे आंदोलन उभे करू!” असा इशाराचा अनिल देशमुख यांनी दिला आहे.

2100 रुपये कधी मिळणार ?

काही दिवसांपूर्वी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या संदर्भात एक महत्वाचं वक्तव्य केलं होतं. मार्च महिन्यानंतरच लाडक्या बहिणींचा हप्ता 1500 रुपयांवरून 2100 रुपये होणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळतील, असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही बजेटमध्ये यावर विचार केला जाईल, असे सांगितले. त्यामुळे मार्च महिन्यातील अर्थसंकल्पात योजनेत सुधारणा होण्याची शक्यता आहे. त्यानंतर महिलांना 2100 रुपये मिळणार का हे स्पष्ट होईल.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.