AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी होताच जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया, सुनेत्रा पवारांना काय दिला सल्ला?

आज सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आता मनोज जरांगे पाटील यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी होताच जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया, सुनेत्रा पवारांना काय दिला सल्ला?
मनोज जरांगे पाटीलImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jan 31, 2026 | 6:17 PM
Share

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, सुनेत्रा पवार यांनी आज उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. राजभवनामध्ये उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा सोहळा पार पडला. राज्यपालांनी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ दिली, त्यापूर्वी राष्ट्रवादी पक्षाच्या आमदारांच्या बैठकीमध्ये त्यांची गटनेता म्हणून देखील निवड करण्यात आली आहे, दरम्यान सुनेत्रा पवार यांची उपमुख्यमंत्रिपदी निवड झाल्यानंतर आता मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची पहिली  प्रतिक्रिया समोर आली आहे.  सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्या, हा त्यांच्या पक्षाचा विषय आहे. पहिल्या महिला उपमुख्यमंत्री झाल्या, हा चांगला विषय आहे.   राजकीय डावपेच मी सांगू शकत नाही, मात्र अजित पवार यांच्या जागेवर त्यांचाच माणूस हवा होता, असं यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले मनोज जरांगे पाटील? 

सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्या, हा त्यांच्या पक्षाचा विषय आहे. पहिल्या महिला उपमुख्यमंत्री झाल्या, हा चांगला विषय आहे.   राजकीय डावपेच मी सांगू शकत नाही. त्यांनी आता सर्वांना सोबत घेऊन चालावं,  आता गिधाड घिरट्या घालायला लागले आहेत, त्यांच्यावर आता लक्ष ठेवावे लागेल, अजितदादांसोबत न दिसणारे गिधाड आता दिसू लागले आहेत,  सुनेत्रा पवार यांनी अचानक जमलेल्या या ढेकणांवर लक्ष ठेवावे, असा सल्ला यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी सुनेत्रा पवार यांना दिला आहे. काही अडचणीमुळे सुनेत्रा पवार यांनी तातडीनं उपमुख्यमंत्रिपद स्विकारलं असावं,  पार्थ आणि जय पवार यांना दादांनी काही सल्ला दिला असेल तर त्याचं त्यांनी पालन करावं, असंही यावेळी जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान आज शरद पवार यांनी सकाळी पत्रकार परिषद घेऊन मोठं विधान केलं होतं, आपल्याला उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याबद्दल काहीही माहिती नाही, आपल्यासोबत कोणतीही चर्चा झाली नाही, असं शरद पवार यांनी म्हटलं होतं. त्यावर देखील मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हा त्यांचा डावपेच असू शकतो, मी सांगू शकत नाही. सर्वांना घेऊन चालावं. गिधाडं  आता घिरट्या घालायला लागले आहेत. त्यांच्यावर आता लक्ष ठेवावे लागेल. हे ढेकण आणि गिधाडं घात करू शकतात, सुनेत्रा पवार यांनी पवार कुटुंबाला सोबत घ्यावं, हे ढेकणं खूप रक्त पिऊ शकतात, त्यावेळी कुटुंबच तुमच्या कामाला येईल, असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

Follow Us
कुत्रे भुंकतात… वाघ शिकार करतो! शिंदेंचा ठाकरेंवर थेट हल्लाबोल!
कुत्रे भुंकतात… वाघ शिकार करतो! शिंदेंचा ठाकरेंवर थेट हल्लाबोल!
हिम्मत असेल तर समोर या! शिंदेंचं ठाकरेंना थेट खुलं आव्हान
Eknath Shinde | हिम्मत असेल तर समोर या! शिंदेंचं ठाकरेंना थेट खुलं आव्हान, ऑपरेशन तुडवावर जोरदार पलटवार
माझ्यावरील आरोप खरे असतील तर पक्षप्रमुख पद सोडायला तयार...
Uddhav Thackeray | माझ्यावरील आरोप खरे असतील तर पक्षप्रमुख पद सोडायला तयार; ठाकरेंचे मोठे विधान
ऑपरेशन टायगर नंतर; आधी ऑपरेशन कमळ करावं लागेल, ठाकरेंचा मोठा इशारा
Uddhav Thackeray On Operation Kamal | ऑपरेशन टायगर नंतर; आधी ऑपरेशन कमळ करावं लागेल, ठाकरेंचा मोठा इशारा
आज त्या मतदारांची माफी मागतो! उद्धव ठाकरे भावुक, नेमकं काय म्हाणाले...
Uddhav Thackeray | आज त्या मतदारांची माफी मागतो! उद्धव ठाकरे भावुक, नेमकं काय म्हाणाले....
तुमची पोरं पळवणारी टोळी आहे! ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर हल्लाबोल
तुमची पोरं पळवणारी टोळी आहे! वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर हल्लाबोल
आम्ही सत्तेसाठी जन्माला आलो नाही, सत्ता आमच्यासाठी जन्माला आली
Uddhav Thackeray | आम्ही सत्तेसाठी जन्माला आलो नाही, सत्ता आमच्यासाठी जन्माला आली; ठाकरेंची सिंहगर्जना
हा फक्त झटका आहे, महापालिकेत मोठा चटका देणार; गुलाबराव पाटलांचा इशारा
Gulabrao Patil | हा फक्त झटका आहे, महापालिकेत मोठा चटका देणार; गुलाबराव पाटलांचा थेट इशारा
2 दिवस थांबा... सगळं स्पष्ट होईल; शिंदेंच्या एका वाक्याने वाढला सस्पेन
2 दिवस थांबा... सगळं स्पष्ट होईल; श्रीकांत शिंदेंच्या एका वाक्याने वाढला सस्पेन्स
मराठा विद्यार्थ्यांनो खुशखबर! भरलेली शैक्षणिक फी परत मिळणार; सरकारची..
मोठी बातमी! मराठा विद्यार्थ्यांनो खुशखबर! भरलेली शैक्षणिक फी परत मिळणार; सरकारची मोठी घोषणा