AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘आता कोणत्याही पक्षात फिरा, पण मत देतांना…’, मनोज जरांगे यांचा मराठा समाजास मतदानापूर्वीची टीप

महाराष्ट्रातील मराठा समाजाला माझी विनंती आहे. आता तुम्ही संभ्रमात राहू नका. मतदान केंद्रावर जाताना फक्त जात मुलगा आणि मुलगी हे डोळ्यासमोर ठेवा. त्यानंतरच मतदान करा. आपल्याला जात मोठी केल्याशिवाय आणि आपली लेकरे मोठी होणार नाही.

'आता कोणत्याही पक्षात फिरा, पण मत देतांना...', मनोज जरांगे यांचा मराठा समाजास मतदानापूर्वीची टीप
मनोज जरांगे पाटील
| Updated on: Nov 17, 2024 | 10:01 AM
Share

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे मतदान २० नोव्हेंबर रोजी होणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या मैदानातून मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे यांनी माघार घेतली आहे. त्यानंतरही ते मराठा समाजाने कोणाला मतदान करावे? त्यासंदर्भात वक्तव्य करत आहे. मनोज जरांगे यांनी म्हटले की, मी जे लोकसभेला सांगितले तेच विधानसभेला सांगत आहे. माझा मराठा समाज बुद्धिजीवी आहे. तो थोडाही संभ्रमात राहत नाही. मराठा समाज बरोबर पाडणार आहे. आता तुम्ही कोणत्याही पक्षात फिरा. परंतु मतदान करताना लेकरांच्या आणि जातीच्या बाजूने पडले पाहिजे, हे लक्षात ठेवा, असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.

मतदान करताना हे लक्षात ठेवा

मनोज जरांगे म्हणाले, मराठा समाजामध्ये प्रचंड आक्रोश आहे. मराठा समाज दारिद्र्यात लोटला गेला आहे. त्यामुळे आता तो रस्त्यावर उतरला आहे. महाराष्ट्रातील मराठा समाजाला माझी विनंती आहे. आता तुम्ही संभ्रमात राहू नका. मतदान केंद्रावर जाताना फक्त जात मुलगा आणि मुलगी हे डोळ्यासमोर ठेवा. त्यानंतरच मतदान करा. आपल्याला जात मोठी केल्याशिवाय आणि आपली लेकरे मोठी होणार नाही. त्याशिवाय समाज घडवणार नाही.

मतदान करताना विचारपूर्वक…

मी मराठा समाजाला बंधन मुक्त केले आहे. ज्याला पाडायचे त्याला पाडा. ज्याला निवडून आणायचे त्याला निवडून आणा. मी माझा मराठा समाज कोणाच्याही दावणीला बांधलेला नाही. मी माझ्या समाजालाच मालक ठेवला आहे. समाजाला आरक्षण देण्यासाठी मी खंबीर आहे. फक्त राजकारण डोक्यातून काढून टाका. या राज्यात माझे मराठे शंभर टक्के मतदान करणार आहेत. मराठ्यांनी मतदान करताना विचारपूर्वक मतदान केले पाहिजे, असेच मी आवाहन करत असल्याचे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.

सर्व जातीवर अन्याय झाल्यानंतर लोक बदलाच्या शोधात असतात. आता राज्यात शेतकऱ्यांचे प्रश्न प्रलंबित आहे. गरीब मुस्लिम आणि धनगरांचे मराठ्यांचे प्रश्न आहेत. त्यामुळे फक्त एकट्यानेच खाऊन चालत नसते, असा टोला मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणास विरोध करणाऱ्यांना लगावला.

Follow Us
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.