AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Manoj Jarange: मंडप नाही, सावली नाही… रखरखत्या उन्हात बसणार, उष्माघाताने मेलो तर सरकारच जबाबदार… मनोज जरांगेंचा निर्वाणीचा इशारा

Manoj Jarange: उष्माघातामुळे बळी गेला तर सरकार जबाबदार असेल, फडणवीस जबाबदार असेल असे विधान मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे.

Manoj Jarange: मंडप नाही, सावली नाही... रखरखत्या उन्हात बसणार, उष्माघाताने मेलो तर सरकारच जबाबदार... मनोज जरांगेंचा निर्वाणीचा इशारा
manoj-jarange-patilImage Credit source: Tv9 Network
| Updated on: May 28, 2026 | 10:54 AM
Share

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला निर्वाणीचा इशारा दिला आहे. जरांगे यांनी आरक्षणासाठी आरपारच्या लढाईची घोषणा केली आहे. यावेळचं उपोषण अत्यंत कठोर होणार आहे. देशात असं उपोषण झालं नसेल असं उपोषण करणार आहे. 30 तारखेला उपोषण सुरू होईल. मंडप टाकणार नाही. सावलीत बसणार नाही. थेट रणरणत्या उन्हात बसणार आहे. मी उष्माघाताने मेलो तर त्याला सरकारच जबाबदार असेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार असीतल, असा इशाराच जरांगे यांनी दिला आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटीत आज पत्रकार परिषद घेतली. भाजपचे नेते प्रसाद लाड हे जरांगेंना भेटायला आले होते. पण त्यानंतरही सरकार दरबारी आरक्षणासाठी काहीच हालचाली झाल्या नाहीत. त्यामुळे मनोज जरांगे हे अस्वस्थ झाले आहेत. त्यांच्या बोलण्यातून उद्वेग आणि संताप दिसत होता. त्यातूनच त्यांनी सरकारला निर्वाणीचा इशारा दिला आहे. मी येत्या 30 तारखेला उपोषणा बसणार आहे. आमरण उपोषण असणार आहे. देशात झालं नसेल असं उपोषण होणार आहे. मागच्यावेळी उपोषण करताना मंडप टाकला होता. यावेळी मंडप टाकला जाणार नाही. मी सावलीत बसून उपोषण करणार नाही. असाच जाऊन बसणार आहे. मे महिन्याच्या रणरणत्या उन्हात मी बसणार आहे. मेलो तर मेलो. कुणीही समाजबांधवांनी अंतरवलीकडे येऊ नका, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.

येऊन काय फायदा?

या सरकारला अनेकदा वेळ दिला. कितीदा मुदत दिली. सरकार काही करत नाही. 16 तारखेपासून वेळ दिला. काहीच झालं नाही. 29 ऑगस्टला मुंबईत आलो होतो. तेव्हापासून वेळ दिला. त्यानंतरही काहीच झालं नाही. आता सरकारचे मंत्री अंतरवलीत येऊन काय करणार आहे?, असा सवाल त्यांनी केला.

किती वेळ लागतो?

मराठा कुणबी मंत्रालय स्थापन करायला किती वेळ लागतो? पश्चिम महाराष्ट्रात ओबीसी सदन नाही. तुम्हाला फक्त मराठ्यांचीच मते हवी आहेत का? बाकी गरीबांच्या समस्यांशी काही देणंघेणं नाही का? असा सवाल त्यांनी केला आहे.

अंतरवलीत येऊ नका…

मी तुमच्या लेकरांसाठी लढत आहे. लढत राहणार आहे. तुम्ही माझे आहात. पण तुम्ही अंतरवली सराटीत येऊ नका. तुमचा उद्रेक होऊ देऊ नका. तुम्ही शांत राहा. आपल्याला आपलं हक्काचं आरक्षण शांततेने घ्यायचं आहे. आपण लढून कष्ट करणारी औलाद आहोत. आपण लढून साम्राज्य उभी करणारी औलाद आहोत. त्यामुळे निर्धास्त राहा. आपण देणारे आहोत. आज आपल्यावर वेळ आली आहे, तर सर्वच विरोध करत आहेत. आपण देणारे आणि मिळवणारे आहोत, हे विरोधक विसरले आहेत, असं त्यांनी सांगितलं.

Follow Us
राज्याच्या मंत्रिमंडळात मोठा फेरबदल? बड्या मंत्र्याची जागी मुंडेंना
राज्याच्या मंत्रिमंडळात मोठा फेरबदल? बड्या मंत्र्याची जागा घेणार धनंजय मुंडे?
मोठी बातमी! शिंदे महत्त्वाचा संदेश घेऊन दिल्लीत? राजकीय घडामोडींना वेग
मोठी बातमी! शिंदे महत्त्वाचा संदेश घेऊन दिल्लीत? राजकीय घडामोडींना वेग
फक्त एक अट, तर देवेंद्र फडणवीसही उद्धव ठाकरेंसोबत रामरक्षा म्हणतील,
फक्त एक अट, तर देवेंद्र फडणवीसही उद्धव ठाकरेंसोबत रामरक्षा म्हणतील, 'त्या' विधानाची सर्वत्र चर्चा
केद्रातील मंत्रीमंडळ विस्ताराबाबत सर्वात मोठी अपडेट! ताकाद वाढली मग
केद्रातील मंत्रीमंडळ विस्ताराबाबत सर्वात मोठी अपडेट! ताकाद वाढली मग शिवसेनेचा कोणत्या पदावार दावा? शिंदेंनी दिलं थेट उत्तर
पुण्यात खळबळ! पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीशी कनेक्शन, एकाच वेळी 60
पुण्यात खळबळ! पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीशी कनेक्शन, एकाच वेळी 60 हून अधिक...
सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षपदावरून पाठवलेल्या नोटीसमध्ये मोठा ट्विस्ट!
सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षपदावरून पाठवलेल्या नोटीसमध्ये मोठा ट्विस्ट! पत्रात मोठी विसंगती; 18 फेब्रुवारीशी काय कनेक्शन?
केंद्रातील मंत्रीमंडळ विस्ताराच्या पर्श्वभूमीवर मोठ्या हालचाली! दिल्ली
केंद्रातील मंत्रीमंडळ विस्ताराच्या पर्श्वभूमीवर मोठ्या हालचाली! दिल्ली दौऱ्याआधीच एकनाथ शिंदेंनी...
राजकीय हालचालींना वेग! NCP तील मंत्र्यांची तातडीची बैठक, काय घडणार?
राजकीय हालचालींना वेग! NCP तील मंत्र्यांची तातडीची बैठक, पुढे काय घडणार?
सिया केतन प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर! थेट पंतप्रधानांना पत्र
सिया केतन प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर! थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलं पत्र
फक्त चर्चा की सत्य, राष्ट्रवादी पक्ष लवकरच फुटणार? बड्या नेत्याच्या
NCP | फक्त चर्चा की सत्य, राष्ट्रवादी पक्ष लवकरच फुटणार? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ