AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मनोज जरांगेंचा युटर्न कोणाच्या पथ्यावर? कोणाला फायदा कोणाला तोटा जाणून घ्या

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मोठा निर्णय घेतला. आपण निवडणुकीतून माघार घेत असल्याचं त्यांनी जाहीर केलं.

मनोज जरांगेंचा युटर्न कोणाच्या पथ्यावर? कोणाला फायदा कोणाला तोटा जाणून घ्या
MANOJ JARANGE PATIL
| Updated on: Nov 04, 2024 | 6:20 PM
Share

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मोठा निर्णय घेतला. आपण निवडणुकीतून माघार घेत असल्याचं त्यांनी जाहीर केलं. तसेच ज्यांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत, त्यांनी आपले अर्ज मागे घ्यावेत असं आवाहनही केलं.मनोज जरांगे पाटील यांनी अचानक घेतलेल्या या युटर्नमुळे महाविकास आघाडीच्या तुलनेत महायुतीचंच टेन्शन अधिक वाढल्याचं दिसून येत आहे. निवडणुकीतून माघार घेत असल्याची घोषणा करताना मनोज जरांगे पाटील यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं की, आम्ही मुस्लिम आणि दलित समाजामधील उमेदवारांची यादी मागितली होती. मात्र ती आम्हाला प्राप्त झाली नाही. एकट्या जातीच्या बळावर कुठलीही निवडणूक लढवता येत नाही. त्यामुळे आम्ही निवडणुकीतून माघार घेत आहोत.

पुढे बोलताना ते म्हणाले की राजकारण आमचा काही खानदानी धंदा नाही, त्यामुळे आम्ही कुठल्याही पक्षाला पाठिंबा दिलेला नाही. ज्यांनी चारशे पारचा नारा दिला होता त्यांची काय अवस्था झाली ते संपूर्ण देशानं बघितलं आहे. आम्ही जरी माघार घेतली असली तरी मतदार म्हणून मराठा समाजाचा दबदबा कायम राहील यामध्ये काहीही शंका नाही, असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या माघारीचा फायदा कोणाला?

मनोज जरांगे पाटील यांचा सर्वाधिक प्रभाव हा मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रावर आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी आरक्षणाच्या मुद्द्यावरून जरांगे पाटील यांनी भाजपला टार्गेट केलं होतं. याचा मोठा फटका हा भाजपला बसला. मराठवाड्यात लोकसभेच्या एकूण आठ जागा आहेत, त्यातील तब्बल सहा जागांवर महायुतीच्या उमेदवारांचा पराभव झाला. तसेच पश्चिम महाराष्ट्रात देखील जरांगे फॅक्टर चालल्याचं पहायला मिळालं. सोलापूर, माढा, अहमदनगर यासारख्या मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांचा पराभव झाला.

दरम्यान जर जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार दिले असते तर मराठा, मुस्लिम आणि दलित मतांचं विभाजन झालं असतं. त्याचा सर्वाधिक फटका हा महाविकास आघाडीला बसला असता. मात्र जरांगे पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेतल्यानं आता मुस्लिम आणि दलित मतदान हे महाविकास आघाडीलाच होण्याची शक्यता आहे. याचा फटका हा महायुतीला बसू शकतो.

नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.