AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मराठा आंदोलकांनी घातलेल्या घेरावानंतर सुप्रिया सुळे यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, युवा मुलांच्या मनात..

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील हे आझाद मैदानावर आंदोलनासाठी बसले आहेत. मात्र, आंदोलक हे मुंबईमध्ये काही भागात ठिय्या करताना दिसत आहेत. सुप्रिया सुळे या जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी काल गेल्या असताना त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

मराठा आंदोलकांनी घातलेल्या घेरावानंतर सुप्रिया सुळे यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, युवा मुलांच्या मनात..
Supriya Sule
| Updated on: Sep 01, 2025 | 11:24 AM
Share

खासदार सुप्रिया सुळे यांनी काल मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. मात्र, भेटीनंतर बाहेर पडताना त्यांना एक वाईट अनुभव आला. मराठा समाजाचा आंदोलनकर्त्यांनी त्यांची गाडी अडवली आणि घोषणाबाजी केली. यासोबतच मराठा समाजाचे खरे वाटोळे शरद पवारांनीच केल्याचे काही आंदोलकांनी म्हटले. ज्यावेळी सुप्रिया सुळे यांना गाडीमध्येही आंदोलक बसू देत नव्हते. हेच नाही तर विरोधात घोषणाबाजी करत थेट त्यांच्या गाडीवर पाण्याच्या बॉटल्स देखील फेकण्यात आल्या. आता यावर सुप्रिया सुळे यांनी पुण्यातून पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

सुप्रिया सुळे यांनी म्हटले की, इतके मोठे आंदोलन सुरू आहे, एखादी अशी गोष्ट घडने ठिक आहे. तरूण मुले आहेत, त्यांच्या काही भावना असतात. माझी नैतिक जबाबदारी असल्याने मी काल तिथे गेले. युवा मुलांच्या मनात काही भावना असतात. पाटलांची तब्येत खराब झाली होती, मी तिथे केले. थोडक्यात चर्चा झाली. माझी राज्याच्या सरकारला आणि मुंबई महापालिकेला विनंती आहे की, आंदोलनाच्या ठिकाणच्या स्वच्छेतेकडे लक्ष दिले पाहिजे.

पाऊस प्रचंड आहे, काही ठिकाणी लाईट नाहीये, आंदोलकांची गैरसोय होत आहे. सुप्रिया सुळे यांनी पुढे म्हटले की, 2018 मध्ये फडणवीसांनी जो मार्ग आरक्षणाचा सांगितला होता त्याची अंमलबजावणी करा. आम्हाला छोटे छोटे पक्ष म्हणून हिणवले जात होते, अडीचशे आमदार तीनशे खासदार असलेला पक्ष परत शरद पवारांकडेच वळतो म्हणजे कमाल आहे. सलग अकरा वर्षे भाजपचे सरकार आहे.

या सगळ्यांचा केंद्रबिंदू ज्यांचे आमदार खासदार जास्त आहेत हे सगळे महायुतीकडेच आहे. अपेक्षा सगळे शरद पवार यांच्याकडे आहे ही गंमत आहे. आंदोलनाला जबाबदार आत्ताच सरकार आहे, आंदोलन हाताच्या बाहेर नाही, सरकारला विनम्र विनंती करते की सर्वपक्षीय बैठक बोलवा सगळ्यांशी चर्चा करा जर हा निर्णय घ्यायचा असेल तर कॅबिनेट बोलवा. अधिवेशन बोलावा, 24 तासात हे सगळं मान्य करून टाका मुख्यमंत्र्यांना विनंती आहे.

आंदोलनाला रसद पुरवणाऱ्यांची यादी तातडीने जाहीर करा. गृहखात्याला माहिती आहे तर आम्हाला पण कळू द्या. गृहखाते नाही तर सरकार फेल ठरले आहे, जबाबदारी सगळी घ्यायची असते. कायदा सुव्यवस्था सरकार करत आहे का आणि काल जरांगे पाटील यांनी याबाबत आंदोलकांना सांगितले आहे. सरकारकडून अजून कोणीही गेले नाही ,पोलिस कोणी गेले नाही, अतिशय अस्वच्छता आहे, सरकार ऐकत नसेल पण काही अधिकारी काम करत आहेत.मुंबईकरांना वेठीस धरले जाते तर चर्चेला बसा. भुजबळ साहेब यांना का उतरावे लागते आहे,न्यायासाठी उतरवा लागत आहे, हे सरकारचे अपयश आहे, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले.

Follow Us
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?.
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह..
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह...
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी.
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला.
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?.
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?.
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप.
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?.
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले.
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा.