AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मराठे पुन्हा आक्रमक होणार… मनोज जरांगे पाटलांचा आंदोलनाचा इशारा, सरकारकडे नेमकी मागणी काय?

Manoj Jarange : आता मराठे पुन्हा आक्रमक होण्याची शक्यता आहे. यावरूनच मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरण्याची भाषा केली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

मराठे पुन्हा आक्रमक होणार... मनोज जरांगे पाटलांचा आंदोलनाचा इशारा, सरकारकडे नेमकी मागणी काय?
Jarange Patil P rImage Credit source: Google
| Updated on: Apr 12, 2026 | 6:39 PM
Share

मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला आंदोलनाचा इशारा दिला आहे. मराठा आरक्षणाची घोषणा करताना सरकारने आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन दिले होते, मात्र अद्याप गुन्हे मागे घेतले गेलेले नाहीत, त्यामुळे आता मराठे पुन्हा आक्रमक होण्याची शक्यता आहे. यावरूनच मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरण्याची भाषा केली आहे. जरांगे पाटलांनी नेमकं काय म्हटलं याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

जरांगे पाटलांकडून आंदोलनाचा इशारा

मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले की, ‘सरकारने शब्द दिला होता की, सर्व गुन्हे मागे घेतले जातील. जो पर्यंत सर्व गुन्हे मागे घेतले जाणार नाही तो पर्यंत मी शांत बसणार नाही. सरकारने तसा शब्द दिलेला आहे. नाहीतर सर्वात मोठं आंदोलन उभं करून सर्व गुन्हे मागे घेण्यास भाग पाडू. दाखल गुन्ह्यांपैकी 60- 62 गुन्हे न्यायप्रविष्ट आहेत. त्याबाबत सरकारने अहवाल देऊन हे गुन्हे मागे घ्यायला हवे. 80 गुन्हे असे आहेत त्याबाबत विभागीय समितीने अहवाल देऊन हे गुन्हे मागे घ्यायला लावावेत. सरकार आणि फडणवीस जरी त्यांनी दिलेल्या शब्दापासून बदलले असले तरी त्यांना मी बदलू देणार नाही. कसे गुन्हे मागे घेत नाही मी बघतो, मी खंबीर आहे.’

मराठा उपसमितीवर टीका

मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्णन विखे पाटील यांच्याबाबत बोलताना जरांगे म्हणाले की, ‘जी उपसमिती मराठ्यांची स्थापन झालीये त्यांनी मराठ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला हवं, त्यांनी दिखावा करण्यासाठी थातुर मातूर बैठका घेऊ नयेत. मराठा समाजाला उप समितीच्या अध्यक्षकडून अपमानास्पद वागणूक चालू आहे, ती थांबली पाहिजे. त्यांना समज पाहिजे मराठा समाजाला न्याय मिळवून दिला पाहिजे.

पुढे बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, मराठे मराठ्यांच्या अंगावर घालण्यासाठी उपसमिती नाही. त्याचा अध्यक्ष त्यासाठी नाही, तुमचा माज जिरवण्यासाठी उपसमिती नाही. तुमची मस्ती मराठ्यांच्या डोक्यात घालायची आणि मराठ्यांच्या विरोधात मराठ्यांची झुजांयला लावायच यासाठी उप समिती नसते. ईसीबीसीच्या विद्यार्थ्यांचं काय? सारथीच्या विद्यार्थ्यांचं काय? आरोग्य विभागातील विद्यार्थ्यांचं काय? यासाठी उपसमिती असते.

समितीला मराठ्याचे प्रश्न सोडवाचे नाहीत

आम्हला वाटलं होतं 100% मराठ्यांच्या विद्यार्थ्यांना न्याय मिळेल, मात्र उपसमितीच्या अध्यक्षांनी उलट उफनायला सुरवात केलीय. मराठे मराठ्यांच्या अंगावर घालवण्याची चळवळ त्यांनी सुरू केली, त्यांना मराठ्यांचे प्रश्न सोडवायचे नाहीत. याने ते कधीच मोठे होणार नाहीत. त्यांच्या डोक्यात हवा शिरली असेल की, मराठे मराठ्यांच्या अंगावर घालले की मराठ्यांचे प्रश्न दाबले जातील. तुम्ही मराठ्या मराठ्यांमध्ये कलगी तुरा लावून जिंकणार नाहीत हे लक्षात ठेवा. तुम्ही खुप चिखलात चालला आहात.

Follow Us
आयटी कंपनीनंतर आता मुंबईच्या नामांकित बँकेत धर्मपरिवर्तन? पतीचा...
आयटी कंपनीनंतर आता मुंबईच्या नामांकित बँकेत धर्मपरिवर्तन? पतीचा....
शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी खूश खबर... अखेर कांदा प्रश्नावर तोडगा निघणार
शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी खूश खबर... अखेर कांदा प्रश्नावर तोडगा निघणार.
कोणाला सुगावा लागू नये म्हणून चक्क... कसून चौकशी केल्यानंतर तेजस शाह..
कोणाला सुगावा लागू नये म्हणून चक्क... कसून चौकशी केल्यानंतर तेजस शाह...
पंतप्रधान मोदींवर सपकाळांची जहरी टीका; पनोती वक्तव्याने महाराष्ट्रात..
पंतप्रधान मोदींवर सपकाळांची जहरी टीका; पनोती वक्तव्याने महाराष्ट्रात...
EDच्या कारवाईनंतर CPI(M) कार्यकर्ते आक्रमक; अधिकाऱ्यांच्या गाड्यांवर..
EDच्या कारवाईनंतर CPI(M) कार्यकर्ते आक्रमक; अधिकाऱ्यांच्या गाड्यांवर...
नीट पेपरफुटी प्रकरणी मोठी कारवाई, प्राध्यापक तेजस शाहच्या कॅबिनमध्ये..
नीट पेपरफुटी प्रकरणी मोठी कारवाई, प्राध्यापक तेजस शाहच्या कॅबिनमध्ये...
रवींद्र चव्हाणांची दिल्लीवारी; 48 नावांची यादी दिल्ली दरबारात!
रवींद्र चव्हाणांची दिल्लीवारी; 48 नावांची यादी दिल्ली दरबारात!.
मुंबईकरांचं रक्त विकण्याचा डाव; ठाकरे गटाच्या विरोधानंतर फेरविचार,
मुंबईकरांचं रक्त विकण्याचा डाव; ठाकरे गटाच्या विरोधानंतर फेरविचार,.
मोटेगावकरने ज्याच्यासाठी पेपर फोडला त्याच लेकाचा खळबळजनक गौप्यस्फोट;
मोटेगावकरने ज्याच्यासाठी पेपर फोडला त्याच लेकाचा खळबळजनक गौप्यस्फोट;.
मीरा रोडनंतर घाटकोपर पेटलं? किरीट सोमय्यांचा थेट इशारा, म्हणाले....
मीरा रोडनंतर घाटकोपर पेटलं? किरीट सोमय्यांचा थेट इशारा, म्हणाले.....