AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मनोज जरांगे पाटील बॅकफुटवर, मुंबईला न येता भांबेरीवरुन परतले अंतरवाली सराटीत

Manoj Jarange Patil | मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत जाण्याचा निर्णय स्थगित केला. त्यानंतर मनोज जरांगे अंतरवलीमध्ये दाखल झाले. त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. मराठा समाजातील कार्यकर्त्यांना तत्काळ आपल्या गावाला जाण्याचे आवाहन केले. यावेळी डॉक्टरांनी त्यांच्या प्रकृतीची तपासणी केली.

मनोज जरांगे पाटील बॅकफुटवर, मुंबईला न येता भांबेरीवरुन परतले अंतरवाली सराटीत
| Updated on: Feb 26, 2024 | 9:37 AM
Share

संजय सरोदे, अंतरवाली सराटी, जालना, दि. 26 फेब्रुवारी 2024 | मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी रविवारी भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यावेळी त्यांनी शिवराळ भाषाही वापरली. त्यानंतर समाजातील लोकांनी व्यासपीठावर येऊन त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. परंतु संतापलेले मनोज जरांगे पाटील ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील सागर बंगल्याकडे जाण्याचा निर्णय घेतला आणि ते निघाले. त्यानंतर रात्री भांबेरी येथे मुक्काम केला. सकाळी पुन्हा ते मुंबईकडे निघणार होते. परंतु अचानक त्यांनी हा निर्णय रद्द केला. ते पुन्हा अंतरवाली सराटीत दाखल झाले. उपोषणस्थळी पोहचल्यावर डॉक्टरांनी त्यांची वैद्यकीय तपासणी केली.

जरांगे म्हणाले, तुम्ही येऊ नका…

मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत येण्याचा निर्णय घेतला होता. मी एकटा जातो तुम्ही कोणी येऊ नका, असे आवाहन त्यांनी केले होते. त्यानंतर त्यांच्या समर्थनार्थ भांबेरी गावामध्ये मराठा आंदोलक दाखल होऊ लागले होते. राज्याच्या विविध जिल्ह्यातून मराठा आंदोलक भांबेरी गावामध्ये येत होते. मनोज जरांगे पाटील यांनी आम्हाला येऊ नका असे आवाहन केले असले तरी आम्ही त्यांना एकटे सोडणार नाही, असे आंदोलक म्हणत होते. सोमवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास मनोज जरांगे पुन्हा माध्यमाशी बोलायला लागले. यावेळी त्यांनी मुंबईला जाण्याचा निर्णय स्थगित केला. आपण अंतरवाली सराटीत जात असून त्या ठिकाणी निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मनोज जरांगे अंतरवलीमध्ये दाखल

मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत जाण्याचा निर्णय स्थगित केला. त्यानंतर मनोज जरांगे अंतरवलीमध्ये दाखल झाले. त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. मराठा समाजातील कार्यकर्त्यांना तत्काळ आपल्या गावाला जाण्याचे आवाहन केले. यावेळी डॉक्टरांनी त्यांच्या प्रकृतीची तपासणी केली.

अंबड तालुक्यात संचारबंदी

बीड- सोलापूर- जालना या महामार्गावर तसेच अंबड तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात मराठा समाज जमा होण्याची शक्यता आहे. यामुळे जालनाचे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी सोमवार दिनांक 26 फेब्रुवारी मध्यरात्री एक वाजल्यापासून अंबड तालुक्यामध्ये संचारबंदी लागू केली आहे.

जरांगे यांच्या सहकाऱ्यांना घेतले ताब्यात

जरांगे यांचा सगळ्यात जवळचा सहकारी आणि विश्वासू श्रीराम कुरणकर यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून कुरणकर हा जरांगे सोबत काम करत होता.

हा देश कोण्या एका धर्माचा नाही, जलील यांच्या विधानानंतर शिरसाट आक्रमक
हा देश कोण्या एका धर्माचा नाही, जलील यांच्या विधानानंतर शिरसाट आक्रमक.
पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्यावर भगतसिंग कोश्यारींनी व्यक्त केला आनंद
पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्यावर भगतसिंग कोश्यारींनी व्यक्त केला आनंद.
ना भगव्यावर प्रेम ना...त्या वादावर काँग्रेसच्या बड्या नेत्याने फटकारले
ना भगव्यावर प्रेम ना...त्या वादावर काँग्रेसच्या बड्या नेत्याने फटकारले.
पोस्टर लागले, तक्रारही दिली, तरीही सापडेना, आता तर कुटुंबीयही बेपत्ता
पोस्टर लागले, तक्रारही दिली, तरीही सापडेना, आता तर कुटुंबीयही बेपत्ता.
हिरव्या रंगाच्या वादात आता संजय राऊतांची उडी
हिरव्या रंगाच्या वादात आता संजय राऊतांची उडी.
मुंब्रा हिरवा करू... वादाला इम्तियाज जलील यांच्याकडून पुन्हा फोडणी
मुंब्रा हिरवा करू... वादाला इम्तियाज जलील यांच्याकडून पुन्हा फोडणी.
शिवाजी पार्कात प्रजासत्ताक दिनाचा दिमाखदार सोहळा पार पडला
शिवाजी पार्कात प्रजासत्ताक दिनाचा दिमाखदार सोहळा पार पडला.
सत्ता, संघर्ष, राजकारणापेक्षा देश महत्वाचा; एकनाथ शिंदे
सत्ता, संघर्ष, राजकारणापेक्षा देश महत्वाचा; एकनाथ शिंदे.
राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ध्वजवंदन
राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ध्वजवंदन.
विकसित भारताचा संकल्प दृढ होवो; पंतप्रधानांकडून देशवासीयांना शुभेच्छा
विकसित भारताचा संकल्प दृढ होवो; पंतप्रधानांकडून देशवासीयांना शुभेच्छा.