AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Manoj Jarange Patil : आजपासून पाणी त्याग, कडक उपोषण, मनोज जरांगे निर्णयावर ठाम, मुंबईत काय घडतंय ?

आझाद मैदानावर मराठा आरक्षण आंदोलनासाठी आणखी एका दिवसाची परवानगी मिळावी यासाठी मनोज जरांगे यांचा मुंबई पोलिसांना अर्ज दिला होता. मुंबई पोलिसांनी त्यांना काही अटींसह आंदोलन आणखी एक दिवस सुरू ठेवण्याची परवानगी दिली.निवृत्त उच्च न्यायालयाचे न्यायाधीश संदीप शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाची भेट घेतल्यानंतरही जरांगे त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत.

Manoj Jarange Patil : आजपासून पाणी त्याग, कडक उपोषण, मनोज जरांगे निर्णयावर ठाम, मुंबईत काय घडतंय ?
मनोज जरांगे आजपासून करणार पाणी त्यागImage Credit source: social media
| Updated on: Sep 01, 2025 | 8:43 AM
Share

ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही मागणी लावून धरत आझाद मैदानात मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू आहे. शुक्रवारपासून आंदोलन करणाऱ्या जरांगेंच्या उपोषणाचा आज चौथा दिवस असून तो अत्यंत महत्वाचा ठरणार आहे. कारण मनोज जरांगे यांनी आजपासून कडक उपोषणाचा करण्याचा निर्णय घेतला असून आता ते पाणीही पिणार नाहीत. आरक्षणाच्या मागणीवर ठाम असलेल्या जरांगे यांनी नरमाईची भूमिका घेण्यास नकार दिला आहे. ाजपासून ते जलत्याग करणार आहेत.

काल रात्री 12 वाजता जरांगे यांची वैद्यकीय तपासणी पार पडली. वैद्यकीय पथकाने त्यांचे रक्त तपासले तसेच त्यांचा रक्तदाबही (ब्लडप्रेशर) तपासण्यात आला. आजपासून जरांगे पाणी देखील सोडणार आहेत, मात्र उपोषणमुळे जरांगेच्या शरीरातील पाणी आधीच कमी झाले असून त्यांनी पाणी पीत रहावं, पाणी सोडू नये व ors घेत राहावे असा सल्ला डॉक्टर यांनी दिला आहे.

आरक्षण उपसमितीच्या सदस्यांची होणार बैठक

दरम्यान जरांगे यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज पुन्हा राज्य सरकार आज बैठक घेण्याची शक्यता आहे. आरक्षण उपसमितीच्या सदस्यांची आज पुन्हा बैठक होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री आणि विखे पाटील यांच्यात काल रात्री उशूरा बैठक होऊन चर्चा झाली. आरक्षण उपसमितीची आज बैठक झाल्यानंतर कोणकोणत्या मागण्या घेऊन जरांगे यांच्याकडे जायचं यावर या बैठकीत चर्चा होणार आहे. या बैठकीत काय निर्णय होतो हे पाहण महत्वाचं असून सर्वांचे लक्ष त्याकडे लागलं आहे.

वाहतुकीचे अपडेट्स काय ?

आज आंदोलनाच्या चौथ्या दिवशी मराठा आंदोलकांसाठी जेवणाची शिदोरी घेऊन काही मराठा बांधव सीएसएमटी स्थानकावरून आझाद मैदानाजवळ आले आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा चौथा दिवस असून अद्याप मुंबईत वाहतूक सुरळीत आहे. आदोलनस्थळाच्या दिशेने अनेक गाड्यांचा ओघ असला तरी सकाळी नेहमीप्रमाणे होणारी वाहतूक कोंडी यावेळी टळली. ईस्टर्न फ्री वे महामार्गावर येण्या-जाण्यासाठी वाहतूक सुरळीत आहे. दरम्यान मराठा आंदोलनाच्या गाड्या मोठ्या प्रमाणात मुंबईच्या दिशेने रवाना झाल्या आहेत. मुंबईतील काही भागात वाहतूक कोंडी झाली पण ईस्टर्न फ्री वे पूर्णपणे मोकळा होता. गेल्या तीन दिवसांपासून सकाळी होणारी कोंडी आज दिसली नाही. मुंबईत येणारा व जाणारा दोन्ही मार्ग वाहतुकीसाठी सुरळीत आहे.

मराठा बांधवानी चर्चगेट रेल्वेस्थानकावर घेतला आश्रय

दरम्यान मराठा आरक्षणासाठी मराठवाड्याच्या नांदेड वरून आलेल्या मराठा बांधवानी चर्चगेट रेल्वेस्थानकावर आश्रय घेतला. रात्रभर हे आंदोलक रेल्वे स्थानकात चटई टाकून स्थानकाच्या पॅसेजमध्ये एका लाईन मध्ये झोपले होते. गावाकडून आलेले जेवण, झोपायला रेल्वे स्थानकाच्या सहारा घेवून राहणारे मराठा आंदोलक मराठा आरक्षणावर ठाम आहेत.

आझाद मैदानावर टाकली खडी

मनोज जरांगे यांच्या उपोषण स्थळी पावसामुळे चिखल असल्याने उपाययोजना करण्यात आल्या आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वाहनातून जरांगे पाटलांच्या उपोषण स्थळावर खडी कच टाकण्यात आली. पावसामुळे चिखल असल्याने आंदोलकांसाठी उपाययोजनांसंदर्भात प्रश्न उपस्थित केला जात होता. अखेर आंदोलनस्थळाजवळ पाच ट्रॅक कचखडी करून उपलब्ध देण्यात आली. स्वयंसेवकांच्या माध्यमातून खडी कच पसरवण्यात आली आहे.

Follow Us
LPG गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्री भुजबळ यांची मोठी घोषणा
LPG गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्री भुजबळ यांची मोठी घोषणा.
अवैध गॅस वापरावर धडक कारवाई; सिलेंडर जप्त, हॉटेल चालकावर गुन्हा दाखल
अवैध गॅस वापरावर धडक कारवाई; सिलेंडर जप्त, हॉटेल चालकावर गुन्हा दाखल.
चाळीतून थेट 2 BKHच्या फ्लॅटमध्ये, बीडीडी चाळीतील रहिवाशांना....
चाळीतून थेट 2 BKHच्या फ्लॅटमध्ये, बीडीडी चाळीतील रहिवाशांना.....
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या...
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या....
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना.
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ.
संजय राऊत यांचा इंधनावरून खळबळजनक दावा, म्हणाले, देशात फक्त एक महिना..
संजय राऊत यांचा इंधनावरून खळबळजनक दावा, म्हणाले, देशात फक्त एक महिना...
एलपीजी पुरवठ्याची संपूर्ण यंत्रणा कोलमडली, सरकार कबूल का करत नाही?
एलपीजी पुरवठ्याची संपूर्ण यंत्रणा कोलमडली, सरकार कबूल का करत नाही?.
महानगर गॅसची २०% कपात; मुंबईतील हॉटेल्स आणि उद्योगांवर परिणाम
महानगर गॅसची २०% कपात; मुंबईतील हॉटेल्स आणि उद्योगांवर परिणाम.
माणसं मारण्यात मजा येते म्हणणाऱ्या राष्ट्राशी करार, राऊतांचा मोदी....
माणसं मारण्यात मजा येते म्हणणाऱ्या राष्ट्राशी करार, राऊतांचा मोदी.....