AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मराठवाड्यात 22 लाख शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका; 53 जणांचा मृत्यू अन्…, नुकसानीच्या पंचनाम्याचा अहवाल समोर

१ जून ते ६ सप्टेंबर दरम्यान मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत नैसर्गिक आपत्तीमुळे ५३ जणांना आपला जीव गमावावा लागला आहे. शिवाय १६ जण जखमी झाले.

मराठवाड्यात 22 लाख शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका; 53 जणांचा मृत्यू अन्..., नुकसानीच्या पंचनाम्याचा अहवाल समोर
| Updated on: Sep 11, 2024 | 8:31 AM
Share

Marathwada Rain Affected Area : गेल्या काही दिवसांपासून मराठवा़ड्यात सतत पाऊस कोसळत होता. यामुळे अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाल्याचे पाहायला मिळाले. हिंगोली, जालना, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, नांदेड, परभणी या भागात मुसळधार पाऊस झाला होता. यामुळे अनेक जिल्ह्यात पूरस्थिती पाहायला मिळत होती. आता मराठवाड्यात सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. यानुसार १८ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील खरीप पिकांसह फळबागांना फटका बसला आहे. तर या विभागात ३९.६५ टक्के नुकसानीचे पंचनामे झाले आहेत. यानुसार ७ लाख २० हजार हेक्टरवरील पंचनामे झाले असून, ११ लाख हेक्टरवरील नुकसानीचे पंचनामे अद्याप शिल्लक आहेत.

मराठवाड्यात 1 ते 3 सप्टेंबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टीचा फटका खरीप पिकांसह फळबागांना बसला. यामध्ये 18 लाख हेक्टर क्षेत्र पेक्षा अधिक पिकांचं अतोनात नुकसान झालं होतं. त्यानंतर प्रशासनाकडून तात्काळ पंचनामे करण्याला सुरुवात झाली. सद्यस्थितीला मराठवाड्यात 7 लाख 20 हजार हेक्टर वरील पंचनामे पूर्ण झाले आहेत. तर उर्वरित 11 लाख हेक्टरवरील पंचनामे अद्यापही बाकी आहेत, असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे ही टक्केवारी 39 टक्क्यांवर पोहोचली.

पिकांसह फळबागांचा प्रचंड नुकसान

मराठवाड्यातील 22 लाख 48 हजार 445 शेतकऱ्यांचं 18 लाख हेक्टर पेक्षाही अधिक क्षेत्रावरील खरीप पिकांसह फळबागांचा प्रचंड नुकसान झालं होतं. यामध्ये 17 लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र हे जिरायत तर 27 हजार हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्र फळबागांचा होतं.

प्रशासनाच्या प्राथमिक माहितीनुसार, मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील ७ लाख १५ हजार ९५८ शेतकऱ्यांच्या ६ लाख ६६ हजार ८५८.६५ हेक्टरवरील शेतीपिकांचे पंचनामे आतापर्यंत पूर्ण झालेले आहेत. या पंचनाम्याची टक्केवारी ३९.६५ टक्के असून या पंचनाम्यात परभणीत सर्वाधिक ८५.५ टक्के पंचनामे पूर्ण झालेले आहेत. त्यापाठोपाठ हिंगोलीत ६७.३८ टक्के, लातूरमध्ये ३३.८२ टक्के, बीडमध्ये २३.७८ टक्के, छत्रपती संभाजीनगरमध्ये २०.५३ टक्के, जालन्यात १५.४३ टक्के, नांदेडमध्ये १३.२६ टक्के तर धाराशिवमध्ये सर्वात कमी केवळ १.२५ टक्के पंचनामे झाल्याचे दिसत आहेत.

घरांची अंशतः पडझड

तसेच १ जून ते ६ सप्टेंबर दरम्यान मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत नैसर्गिक आपत्तीमुळे ५३ जणांना आपला जीव गमावावा लागला आहे. शिवाय १६ जण जखमी झाले. सुमारे १२६९ जनावरांना आपला जीव गमवावा लागला. तसेच १४ पक्क्या व कच्च्या घरांची पूर्णतः पडझड झाली असून ३८४ पक्क्या घरांची अंशतः तर २४२३ कच्च्या घरांची अंशतः पडझड झाली आहे. त्यासोबतच २७ झोपड्या पडझड वा नष्ट झाल्या असून १८२ गोठ्यांचेही या नैसर्गिक आपत्तीत नुकसान झाल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. दरम्यान नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाल्यानंतर सरकारकडून कधी मदत मिळणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागलं आहे.

गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल..
गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल...
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास.
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ.
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर.
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल.
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले.
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक.
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही.
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात...
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात....
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल.