AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्धव ठाकरेंना अरविंद केजरीवाल, सिबू सोरेन यांच्यासारखं जमलं नाही ? गुलाबराव म्हणाले ठाकरेंना प्लॅन जमला नाही…

मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हंटलंय, उद्धव ठाकरे यांनी राजीनामा द्यायला नको होता, एकनाथ शिंदे यांना परत बोलवायला पाहिजे होते.

उद्धव ठाकरेंना अरविंद केजरीवाल, सिबू सोरेन यांच्यासारखं जमलं नाही ? गुलाबराव म्हणाले ठाकरेंना प्लॅन जमला नाही...
Image Credit source: Social Media
Kiran Balasaheb Tajne
Kiran Balasaheb Tajne | Updated on: Oct 09, 2022 | 6:04 PM
Share

अनिल केऱ्हाळे, प्रतिनिधी, टीव्ही 9 मराठी, जळगाव : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राजीनामा द्यायला नको होता असे शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी म्हंटलंय. गुलाबराव पाटलांचं हे विधान अनेकांच्या भुवया उंचवणारे असले तरी त्यांनी उद्धव ठाकरे यांना विनाशकाले विपरीत बुद्धी असे म्हणत टीका केली आहे. गुलाबराव पाटील यांनी यापूर्वी देखील उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना लक्ष करत शिंदे गटाची बाजू लावून मांडण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे. त्यातच पुन्हा एकदा गुलाबराव पाटील यांनी शिवसेना नाव आणि चिन्ह गोठवलं गेल्याने उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. मात्र, यावेळी टीका करण्याबरोबरच गुलाबराव पाटील यांनी भुवया उंचवणारे विधान केले आहे. त्यात त्यांनी अरविंद केजरीवाल आणि शिबू सोरेन यांचाही संदर्भ दिला आहे.

मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हंटलंय, उद्धव ठाकरे यांनी राजीनामा द्यायला नको होता, एकनाथ शिंदे यांना परत बोलवायला पाहिजे होते.

पण त्यांनी आमदारांना बोलावलं, त्यांना बोलवण्यापेक्षा एकनाथ शिंदेंना बोलवायला पाहिजे होते. मात्र उद्धव ठाकरेंनी ते केले नाही.

उद्धव ठाकरेंना प्लॅन करता आले नाही, त्यात मुलाला बोलायला आमच्या अंगावर सोडलं ते राजकारणी होऊच शकत नाही असेही पाटील म्हणाले.

दरम्यान अरविंद केजरीवाल, सिबू सोरेन यांच्या बाबतीत पण प्रॉब्लेम झाला होता, त्यांचेही आमदार गेले होते पण त्यांनी आमदारांना परत आणलं.

मंत्री, आमदार, जिल्हा परिषद सदस्य, नाराज होतात, त्यांची समजूत काढायची असते, नेत्यांचं काम असतं समजावण्याचे पण त्यांना ते जमलं नाही.

एकूणच मंत्री गुलाबराव पाटील यांचे हे विधान अनेकांच्या भुवया उंचवणारे असून शिंदे गटाच्या आमदाराने हे विधान केल्याने त्याची चर्चा होऊ लागली आहे.

Follow Us
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ...
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ....
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य...
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य....
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट..
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट...