AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘त्या लोकांशी माझा संघर्ष’; मंत्री होताच जयकुमार गोरे यांचा टार्गेट फिक्स? पाहा कुणावर साधला निशाणा

"ज्या लोकांनी आमच्या भागाला दुष्काळी ठेवला त्या लोकांशी माझा संघर्ष आहे. मग ते रामराजे असतील किंवा शरद पवार असतील. माझ्या भागातील शेतकऱ्यासाठी कुणालाही अंगावर घ्यायला लागलं तरी घेऊ", असं मोठं वक्तव्य नवनिर्वाचित मंत्री जयकुमार गोरे यांनी केलं.

'त्या लोकांशी माझा संघर्ष'; मंत्री होताच जयकुमार गोरे यांचा टार्गेट फिक्स? पाहा कुणावर साधला निशाणा
मंत्री जयकुमार गोरे
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Dec 22, 2024 | 10:10 PM
Share

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी आज पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रामराजे निंबाळकर यांच्यावर टीका केली. “ग्रामविकास खातं हे राज्यातील एक मोठं खातं आहे. मता त्याची जबाबदारी मिळाली, ती प्रामाणिकपणे पार पाडण्याचा संकल्प केला आहे. मी कोणतीही अपेक्षा ठेवून काम केलं नाही. माझ्या तालुक्यातील पाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे आणि शेतकरी संपन्न झाला पाहिजे या भावनेने काम केलं. माण खटावचा दुष्काळ हटवू शकतो तर हे खातही चांगल्या प्रकारे सांभाळू शकतो. मुख्यमंत्र्यांना अपेक्षित असणारे काम मी नक्की करेन”, अशी पहिली प्रतिक्रिया जयकुमार गोरे यांनी दिली. “पक्ष नेतृत्व कोणाला काय जबाबदारी द्यायची ते ठरवेल. मुख्यमंत्री कुठला पालकमंत्री कोणाला करायचं हे ठरवतील. मुख्यमंत्र्यांना माहित आहे कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद भारतीय जनता पक्षाकडे असावं”, अशीदेखील प्रतिक्रिया गोरे यांनी दिली. तसेच “महाराष्ट्रात सर्वात कमी पाऊस पडणारा माझा मतदारसंघ आहे. येणाऱ्या चार वर्षाच्या आत माझा माण खटाव दुष्काळ मुक्त असेल”, असा दावा जयकुमार गोरे यांनी केला

जयकुमार गोरे शरद पवर यांच्याबद्दल काय म्हणाले?

“शरद पवार यांना या जिल्ह्याने खूप प्रेम दिले. शरद पवारांनी जिल्ह्याला परत काय दिलं हे शोधून देखील सापडत नाही. मसवड आणि माण खटावमध्ये एमआयडीसी मंजूर केलेली आहे. ती साडेआठ हजार एकरामध्ये असेल. मी माझ्या मतदारसंघाच्या आणि जिल्ह्याच्या विकासाला आडवा येणाऱ्या लोकांना नेहमीच अंगावर घेतो”, असं जयकुमार गोरे म्हणाले.

जयकुमार गोरे रामराजे निंबाळकर यांच्याबद्दल काय म्हणाले?

“रामराजे निंबाळकर यांनी 19 वर्षे कृष्णा खोरे सांभाळल्यानंतर स्वतःचा तालुका दुष्काळमुक्त केला आणि आमच्या तालुक्याला पाणी द्यायचा प्रयत्न केला नाही. अशा नेतृत्वाशी आमचा संघर्ष होता. ज्या लोकांनी आमच्या भागाला दुष्काळी ठेवला त्या लोकांशी माझा संघर्ष आहे. मग ते रामराजे असतील किंवा शरद पवार असतील. माझ्या भागातील शेतकऱ्यासाठी कुणालाही अंगावर घ्यायला लागलं तरी घेऊ”, असं जयकुमार गोरे म्हणाले. “कार्यकर्त्यांनी 15 ते 17 वर्षे संघर्ष केलाय. कार्यकर्त्यांना भेटण्याची इच्छा उद्या पूर्ण होईल”, असंही जयकुमार गोरे यावेळी म्हणाले.

Follow Us
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही..
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही...
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी..
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्....
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?.
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात....
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात.....
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार.
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत....
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत.....
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण.
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात...
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात....
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत.