AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! भोंदू खरात प्रकरणात रोहित पवारांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट, म्हणाले; पैसे घेऊन….

Rohit Pawar Ashok Kharat : राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी भोंदू अशोक खरात प्रकरणात आतापर्यंतचा सर्वात मोठा गौप्यस्फोट केला आहे. यामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे.

मोठी बातमी! भोंदू खरात प्रकरणात रोहित पवारांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट, म्हणाले; पैसे घेऊन....
Kharat and PawarImage Credit source: Google
| Updated on: May 10, 2026 | 5:37 PM
Share

भोंदू अशोक खरात प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रात गाजले आहे. या प्रकरणात अजूनही नवनवे खुलासे होत आहेत. अशोक खरातने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे समोर आले आहे. तसेच त्याने भोंदुगिरी करून कोट्यवधी रुपयांची संपत्ती जमवली आहे. त्याचबरोबर त्यांने काही आर्थिक घोटाळेही केल्याचे समोर आले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे अशोक खरातचे काही राजकीय नेत्यांसोबत संबंध असल्याचेही समोर आलेले आहे. तसेच इतरही नामांकित व्यक्ती खरातच्या संपर्कात होते हेही समोर आलेले आहे. अशातच आता राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणात आतापर्यंतचा सर्वात मोठा गौप्यस्फोट केला आहे. यामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. रोहित पवार यांनी काय म्हटलं ते जाणून घेऊयात.

रोहित पवार यांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट

राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी भोंदू खरात प्रकरणात आतापर्यंतचा सर्वात मोठा गौप्यस्फोट केला आहे. रोहित पवार यांनी म्हटले की, ‘भोंदू खरात प्रकरणात अनेक मोठे नेते, अधिकारी, व्यावसायिक अडकले असून त्या प्रकरणातील 1% सत्य देखील समोर आलेले नाही. समोर जे काही आले आहे ते केवळ छोटे मासे आहेत. यामध्ये अनेक मोठे मासे देखील असून महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात काळा अध्याय म्हणून हे प्रकरण नोंद होणार आहे.’

खरातवर कारवाई करण्याची मागणी

पुढे रोहित पवार यांनी म्हटले की, ‘या प्रकरणाच्या तपासातून सुटका करून घेण्यासाठी किंवा नाव बाजूला काढण्यासाठी एक मोठे आर्थिक रॅकेट काम करत असल्याची माहिती समजत आहे. मोठमोठ्या रकमा घेऊन अनेकांना यातून अलगद बाहेर काढले जात आहे. ज्यांना या प्रकरणातून बाहेर काढायचे आहे त्यांना भोंदू विरोधात फसवणूक केल्याची तक्रार करायला सांगितले जाते आणि या प्रकरणातून बाहेर काढले जाते अशी ही पद्धती असल्याची माहिती आहे. या माहितीची शहानिशा करून गृहमंत्री महोदयांनी योग्य ती कारवाई करावी, ही विनंती.’

चौकशी सुरू

सध्या भोंदू खरातची महिलांचे लैंगिक शोषण, भोंदूगिरी आणि आर्थिक गैर व्यवहार प्रकरणात कसून चौकशी सुरू आहे. यातून दररोज नवनवे खुलासे होताना पहायला मिळत आहे. त्यामुळे आगामी काळात आणखी काही बड्या लोकांची नावे समोर येण्याची शक्यता आहे.

Follow Us
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोप
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोपांनी खळबळ!
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटा
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटांच्या चर्चेत... पहिली प्रतिक्रिया समोर
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी धर्मांतरण प्रकरणी मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?
लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
Mayank Lohar | लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
धक्कादायक! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट
Shirdi | साईबाबांच्या नगरीत धक्कादायक खुलासा! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट पेढे...
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णय
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाची चर्चा
स्वार्थासाठी गेले, जनता हिशोब चुकता करणार! नाईकांचा खासदारांना इशारा
Vaibhav Naik | स्वार्थासाठी गेले, आता जनता हिशोब चुकता करणार! वैभव नाईकांचा फुटीर खासदारांना इशारा
विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट
Beed | विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट निर्णय घेतला; लवकरच...
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं!
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं! त्या वादाला आता नवं वळण!
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता बड्या नेत्याचं विधान चर्चेत