अजित पवार यांच्या विमान अपघाताबद्दल रोहित पवार यांचा खळबळजनक दावा, ते विमान मुद्द्यामच…
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर मोठी खळबळ उडाली. त्यामध्येच रोहित पवार यांनी थेट मोठा संशय व्यक्त करत नुकताच भाष्य केले. रोहित पवार यांनी केलेल्या भाष्यानंतर खळबळ उडाली आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने मोठी खळबळ उडाली. अजित पवार यांच्या निधनानंतर अनेक दावे केली जात आहेत. आमदार रोहित पवार यांनी आता नुकताच अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत मोठा संशय व्यक्त केला. अजित पवार यांचा विमान अपघात कसा झाला आणि नक्की काय काय घडले हे रोहित पवार यांनी सांगितले. काही गोष्टी ठरवून केल्याचे रोहित पवार यांनी म्हटले. अजित पवार यांच्या निधनानंतर संपूर्ण पवार कुटुंब एकत्र आले आहे. मात्र, आता रोहित पवार यांच्याकडून गंभीर आरोप करण्यात आले. रोहित पवार म्हणाले की, फ्लाइट उड्डाणाला परवानगी कशी दिली आणि इतक्या मोठ्या प्रमाणात मुंबईहून बारामतीकडे जाण्याकरिता फ्युल टँक इतका जास्त का भरला? यासोबतच पायलटवर देखील संशय व्यक्त करण्यात आला. रोहित पवार यांनी मोठा दावा केला आणि पायलटने मुद्द्याम विमान आदळल्याचे म्हटले.
रोहित पवार यांनी पहिल्यांदाच हा मोठा दावा केला. रोहित पवार स्पष्ट शब्दात म्हटले की, आम्हाला वाटते की, पायलटने मुद्द्यात अजित पवार यांचे विमान जमिनीवर आदळले आहे. रोहित पवार यांच्या या दाव्याने आता मोठी खळबळ उडाली आहे. खरोखरच अजित पवार यांचे विमान जमिनीवर आदळले गेले का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अजित पवार यांच्या विमान अपघाताचे काही व्हिडीओ पुढे आली.
रोहित पवार यांनी पुढे म्हटले की, ब्लॅकबॉक्स जळल्याचे सांगत आहे. 1100 डिग्री सेल्सिअसला एक तास ब्लॅक बॉक्स पडला असेल तरच थोडं डॅमेज होते. जर सहा हजार मीटर खोलीपर्यंत पाण्याचं प्रेशर असेल तर ब्लॅक बॉक्स टिकू शकतो. त्या ठिकाणी बरेचशे कागद कमी जळले. स्फोटाचा धक्का काही सेकंदाचा असतो. त्यामुळे कागद जळत नाही, असेही रोहित पवार यांनी म्हटले.
रोहित पवार यांच्याकडून सतत अजित पवार यांच्या विमान अपघाताबद्दल संशय व्यक्त केला जात आहे. आता त्यांनी स्पष्ट शब्दात म्हटले आहे की, मुद्द्याम विमान जमिनीवर आदळण्यात आले. अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर आता अनेक गंभीर प्रश्न निर्माण होत आहेत.
