ठाणे : भिवंडी येथील खारबाव मालोडी परिसरातील टोलनाका मनसे कार्यकर्त्यांनी अखेर फोडला आहे. काल मनसेचे अविनाश जाधव यांनी टोल वसुली बंद करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर टोल वसुली बंद करण्यात आली होती. मात्र, संध्याकाळी पुन्हा टोलनाका सुरु केल्यामुळे मनसैनिक आक्रमक झाले. यातच त्यांनी मोलाडी परिसरातील टोलनाक्याची तोडफोड केली. (MNS activists carrying MNS flag raised slogans and broke toll naka in Bhiwandi)