AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mood Of Maharashtra : राज्यातील सर्वात विश्वासार्ह नेता कोण? फडणवीस, शिंदे, पवार की ठाकरे? महाराष्ट्राची पसंती कोणाला? वाचा सर्व्हे

महायुतीचं सरकार राज्यात येऊन एक वर्ष पूर्ण झालं आहे, यानिमित्तानं जनता सरकारच्या कामावर समाधानी आहे का? महाराष्ट्रातील जनतेची सर्वाधिक पसंती राज्यातील कोणत्या नेत्याला आहे? या संदर्भात एक सर्व्हे करण्यात आला आहे.

Mood Of Maharashtra : राज्यातील सर्वात विश्वासार्ह नेता कोण? फडणवीस, शिंदे, पवार की ठाकरे? महाराष्ट्राची पसंती कोणाला? वाचा सर्व्हे
महाराष्ट्रातील सर्वात विश्वार्ह नेता कोण?Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Dec 05, 2025 | 9:45 PM
Share

लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं होतं, परंतु त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत मात्र महाविकास आघाडीचा सपाटून पराभव झाला. महाराष्ट्रात महायुतीला मोठं यश मिळालं, तब्बल 232 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले, तर महाविकास आघाडीला अवघ्या 50 जागांवर समाधान मानावं लागलं होतं. दरम्यान राज्यात महायुतीचं सरकार येऊन आता एक वर्षाचा काळ पूर्ण झाला आहे. या काळात महाराष्ट्राच्या जनतेचा मूड कसा आहे? जनता सरकारच्या कामगिरीवर समाधानी आहे का? महाराष्ट्राच्या जनतेची सर्वाधिक पसंती कोणत्या नेत्याला आहे? कोण राज्यातील सर्वाधिक विश्वासार्ह नेता आहे, हे यानिमित्तानं जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सी व्होटर (C Voter) कडून या संदर्भात सर्व्हे करण्यात आला आहे. जाणून घेऊयात महाराष्ट्राच्या जनतेची सर्वाधिक पसंती कोणत्या नेत्याला आहे? आणि कोण राज्यातील सर्वाधिक विश्वासार्ह नेता ठरला आहे त्याबद्दल.

या सर्व्हेमध्ये सर्वात विश्वासार्ह नेता म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रथम स्थान पटकावलं आहे, राज्यातील तब्बल 35 टक्के जनतेनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास असल्याचं म्हटलं आहे. तर त्यानंतर दुसऱ्या क्रमाकांवर आहेत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 17.8 टक्के लोकांनी एकनाथ शिंदे हे सर्वाधिक विश्वासार्ह नेता असल्याचं म्हटलं आहे. यामध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहेत, ते म्हणजे शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे 14. 4  टक्के लोकांनी उद्धव ठाकरे यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे. तर चौथ्या क्रमाकांवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार हे असून, 11.2 टक्के लोकांनी त्यांच्या बाजूनं कौल दिला आहे. या सर्व्हेमध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे यांना 4.2 टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे.

दुसरीकडे या सर्व्हेमध्ये असाही प्रश्न विचारण्यात आला होता की सध्या महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रश्न कोणता वाटतो? तर सर्वाधिक लोकांनी शेतकऱ्यांचा प्रश्न महत्त्वाचा असल्याचं म्हटलं आहे, तर दुसऱ्या क्रमांकावर वाढत असलेली बेरोजगारी हा मुद्दा आहे.  तस तिसऱ्या क्रमांकावर भ्रष्टाचाराचा मुद्दा आहे.

Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.