AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“महाराष्ट्रातील नेत्यांनी बेळगावमध्ये यायचं नाही”; कर्नाटकने थेट आदेशच काढले; ‘या’ खासदाराला प्रवेश नाकारला…

खासदार धैर्यशील माने यांना बेळगाव प्रवेश बंदी असल्याचे पत्र बेळगाव जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आले आहे. धैर्यशील माने तज्ज्ञ समितीचे अध्यक्षही आहेत.

महाराष्ट्रातील नेत्यांनी बेळगावमध्ये यायचं नाही; कर्नाटकने थेट आदेशच काढले; 'या' खासदाराला प्रवेश नाकारला...
| Updated on: Jan 17, 2023 | 2:40 PM
Share

कोल्हापूरः सीमालढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी बेळगावला जाणाऱ्या शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने यांना कर्नाटक सरकारने पु्न्हा एकदा प्रवेश नाकारला आहे. त्यामुळे धैर्यशील माने यांनी कर्नाटकची ही गोष्ट चुकीची असून संविधान विरोधी असल्याचे सांगितले आहे. सीमालढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी आज खासदार धैर्यशील माने बेळगावला जाणार होते मात्र रात्री उशिरा कर्नाटक प्रशासनाकडून धैर्यशील माने यांना बेळगाव जिल्हा बंदीचे आदेश जारी करण्यात आले आहेत.

जवळपास गेल्या महिन्याभरात दुसऱ्यांदा धैर्यशील माने यांना बेळगाव जिल्हा बंदी करण्यात आली आहे. त्यामुळे कर्नाटकच्या या दडपशाहीविरोधात निषेध व्यक्त केला जात आहे.

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये बेळगाव आणि सीमाभागातील पाच हुतात्म्यासोबतच या चळवळीत 108 हुतात्म्यांनी बलिदान दिले आहे.

त्यामुळे सीमाभागात मराठी बांधवांकडून दरवर्षी तिथे आदरांजली वाहण्यात येते. त्या कार्यक्रमानिमित्ताने धैर्यशील माने बेळगावला जाणार होते.

मात्र प्रवेश नाकारल्याने त्यांच्याकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. लोकप्रतिनिधींची ही अवस्था असेल तर सीमाभागाील जनतेची काय अवस्था असेल अशी भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

खासदार धैर्यशील माने यांना बेळगाव प्रवेश बंदी असल्याचे पत्र बेळगाव जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आले आहे. धैर्यशील माने तज्ज्ञ समितीचे अध्यक्षही आहेत.

त्यामुळे न्यायालयात सुरू असलेल्या लढ्यासाठी कर्नाटक शासनाची ही नोटीस आपल्याला फायदेशीर असल्याचेही त्यांनी सांगितले.

सीमालढ्यातील हुतात्म्यांना आज आदरांजली वाहण्यात येते, मात्र त्या कार्यक्रमालाही कर्नाटकने प्रवेश बंदी घातली आहे. सीमालढ्यातील हुतात्म्यांनाही आदरांजली वाहण्यासाठी जर कर्नाटक प्रशासनाला मान्य नसेल तर ही कर्नाटककडून ही दडपशाही गेल्या कित्येक वर्षापासून सुरुच आहे.

त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो असंही त्यांनी यावेळी सांगितले. आपण लोकांची लोकप्रतिनिधी असूनही आणि केंद्र सरकारचे काम करत असतानाही जर एकाद्या राज्याकडून ही अशा पद्धतीने जर वागणूक मिळत असेल तर ती चूक आहे असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्यावर भगतसिंग कोश्यारींनी व्यक्त केला आनंद
पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्यावर भगतसिंग कोश्यारींनी व्यक्त केला आनंद.
ना भगव्यावर प्रेम ना...त्या वादावर काँग्रेसच्या बड्या नेत्याने फटकारले
ना भगव्यावर प्रेम ना...त्या वादावर काँग्रेसच्या बड्या नेत्याने फटकारले.
पोस्टर लागले, तक्रारही दिली, तरीही सापडेना, आता तर कुटुंबीयही बेपत्ता
पोस्टर लागले, तक्रारही दिली, तरीही सापडेना, आता तर कुटुंबीयही बेपत्ता.
हिरव्या रंगाच्या वादात आता संजय राऊतांची उडी
हिरव्या रंगाच्या वादात आता संजय राऊतांची उडी.
मुंब्रा हिरवा करू... वादाला इम्तियाज जलील यांच्याकडून पुन्हा फोडणी
मुंब्रा हिरवा करू... वादाला इम्तियाज जलील यांच्याकडून पुन्हा फोडणी.
शिवाजी पार्कात प्रजासत्ताक दिनाचा दिमाखदार सोहळा पार पडला
शिवाजी पार्कात प्रजासत्ताक दिनाचा दिमाखदार सोहळा पार पडला.
सत्ता, संघर्ष, राजकारणापेक्षा देश महत्वाचा; एकनाथ शिंदे
सत्ता, संघर्ष, राजकारणापेक्षा देश महत्वाचा; एकनाथ शिंदे.
राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ध्वजवंदन
राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ध्वजवंदन.
विकसित भारताचा संकल्प दृढ होवो; पंतप्रधानांकडून देशवासीयांना शुभेच्छा
विकसित भारताचा संकल्प दृढ होवो; पंतप्रधानांकडून देशवासीयांना शुभेच्छा.
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस.