AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आदिवासी विभागाच्या आश्रमशाळा सुरु करण्याचा निर्णय घाईगर्दीत, खासदार हिना गावित यांचा आरोप

आदिवासी विकास विभाग आणि मंत्री के.सी. पाडवी आपली जबाबदारी झटकत असल्याची टिका हिना गावित यांनी केली आहे. | Heena Gavit K C Padavi

आदिवासी विभागाच्या आश्रमशाळा सुरु करण्याचा निर्णय घाईगर्दीत, खासदार हिना गावित यांचा आरोप
| Updated on: Nov 24, 2020 | 2:20 PM
Share

नंदुरबार: राज्यातील आदिवासी विकास विभागाच्या आश्रम शाळा 1 डिसेंबरपासून सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. कोरोना विषयक खबरदारीच्या उपाययोजना केल्याशिवाय सरकार आणि आदिवासी विकास विभाग घाईगर्दीत निर्णय घेत आदिवासी आश्रमशाळा सुरू करत असल्याचा आरोप भाजप खासदार डॉ.हिना गावीत यांनी केला आहे. ( MP Heena Gavit criticize state govt and Tribal Development Minister K. C. Padavi)

आश्रमशाळा सुरू करण्याची काही करू नये. आदिवासी विकास विभागाच्या शाळा निवासी स्वरूपाचे असल्याने या ठिकाणी शाळा सुरू केल्यावर विद्यार्थ्यांच्या आरोग्यासंदर्भात काय काळजी घेतली जाणार आहे. हे अजूनही गुलदस्त्यात असल्याचा आरोप खासदार डॉ. हिना गावित यांनी केला आहे.

राज्यभरातील बऱ्याच आदिवासी जिल्ह्यातील शासकीय आश्रम शाळेचे वस्तीगृह आणि शाळा विलीनीकरण कक्ष म्हणून वापरण्यात आले आहेत. आदिवासी विकास विभागाकडून विद्यार्थ्यांची सर्वस्वी जबाबदारी पालकांची राहील, असं प्रतिज्ञापत्र शाळा सुरू करण्यापूर्वी भरून घेतले जात आहे. आदिवासी विकास विभाग आणि मंत्री के.सी. पाडवी आपली जबाबदारी झटकत असल्याची टिका हिना गावित ( Heena Gavit) यांनी केली आहे.

विविध ठिकाणी आश्रमशाळांमधील शिक्षकांच्या कोरोना टेस्ट करण्यात आल्या त्यामध्ये 30 शिक्षक पॉझिटिव्ह आले आहेत. आश्रमशाळांचे शिक्षक आणि त्यांच्या कुटुंबीयांची टेस्ट करावी, अशी मागणी हिना गावित यांनी केली आहे. शिक्षक रोज येजा करत असल्याने कोरोना वाढण्याची भीती आहे. नंदुरबारमध्ये कोरोनाची स्थिती चांगली पण आश्रमशाळा सुरु केल्यास गाव खेड्यापर्यंत कोरोना संसर्ग वाढेल, अशी भीती गावित यांनी व्यक्त केली. शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांना आश्रमशाळेवर राहणं बंधनकारक करावे, ही मागणी देखील त्यांनी केली आहे. ( MP Heena Gavit criticize state govt and Tribal Development Minister K C Padavi)

1 डिसेंबरपासून आश्रमशाळा सुरु: आदिवासी विकासमंत्री 

आदिवासी विकास विभागाच्या आश्रम शाळा 1 डिसेंबरनंतर सुरू होतील. हा निर्णय घेण्यात आला असला तरी शासकीय आश्रम शाळा सुरू करताना कोरोना परिस्थिती लक्षात घेऊनच पुढील निर्णय घेण्यात येईल, असे राज्याचे आदिवासी विकासमंत्री के. सी. पाडवी ( K.C.Padavi) यांनी सांगितले.

शाळा सुरु करताना कोरोनासंदर्भात कोणत्या उपायोजना करण्यात आल्या आहेत याचाही आढावा घेतला जाईल. त्यानंतर शासकीय आश्रमशाळा सुरु करण्यात येतील,” असे पाडवी म्हणाले. तसेच, यावेळी शाळा सुरु करण्यासाठी कुठल्याही प्रकारची घाई केली जाणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

संबंधित बातम्या:

यवतमाळमध्ये कोरोनाच्या सावटाखाली शाळा सुरु; विद्यार्थ्यांना पालकांचे संमतीपत्रक बंधनकारक

कोरोना परिस्थिती लक्षात घेऊनच आदिवासी विकास विभागाच्या आश्रम शाळा सुरु होणार; के.सी. पाडवींची माहिती

( MP Heena Gavit criticize state govt and Tribal Development Minister K C Padavi)

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.