ओमराजे निंबाळकर यांनी साथ सोडताच ठाकरेंच्या शिवसेनेला पहिला मोठा धक्का, थेट धाराशिवच्या..
शिवसेना ठाकरे गटातील 6 खासदारांनी बंडखोरी केली. थेट वेगळ्या गटाचे पत्रही लोकसभा अध्यक्षांना दिले. राज्यात मोठा राजकीय भूकंप आला. खासदार ओमराजे निंबाळकर हे देखील ठाकरेंची साथ सोडून शिंदेंचा हात पकडणार असल्याचे स्पष्ट आहे. यादरम्यान मोठी बातमी पुढे येत आहे.

शिवसेना ठाकरे गटाला राम राम करून थेट 6 खासदार शिवसेना शिंदे गटात सहभागी होणार आहेत. काल दिल्लीमध्ये याबाबतच्या अनेक घडामोडीही घडताना दिसल्या. थेट लोकसभा अध्यक्षांना या खासदारांनी पत्र लिहिले. स्वतंत्र गट स्थापन करण्याबाबत खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र दिले. हा उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का आहे. शिवसेना ठाकरे गटाला खासदार फुटीची भनक लागताच त्यांनी तात्काळ पक्षाकडून सर्व खासदारांना व्हिप जारी केले आणि बैठक बोलावली. मात्र, पक्षाच्या व्हिपला देखील दाद न देता हे खासदार उपस्थित राहिली नाही. त्यामुळे स्पष्ट झाले की, शिवसेना ठाकरे गटाचे 6 खासदार फुटले आहेत. शिवसेना ठाकरे गटाला हा दुसऱ्यांदा मोठा धक्का एकनाथ शिंदे यांनी दिली. या सर्व खासदारांना अज्ञातस्थळी ठेवण्यात आल्याची माहिती मिळतंय. यादरम्यानच या 6 खासदारांवर कायदेशीर कारवाई होणार असल्याचे ठाकरे गटाने स्पष्ट केले.
धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर देखील ठाकरे गटाला सोडून थेट शिवसेना शिंदे गटात सामील होणार आहेत. लोकसभेच्या अध्यक्षांना स्वतंत्र गट स्थापन करण्याबाबत दिलेल्या पत्रात ओमराजे निंबाळकर यांचेही नाव आहे. ओमराजे निंबाळकर शिवसेना ठाकरे गटाला सोडून जात असल्याने एकच खळबळ उडाली. ओमराजे निंबाळकर यांनी यावर काहीच भाष्य केले नाही, त्यांनी म्हटले की, 20 जून रोजी मी यावर स्पष्ट बोलेल, आता नाही.
पक्षाने व्हिप जारी करूनही ओमराजे निंबाळकर बैठकीला उपस्थित नव्हते. ओमराजे निंबाळकर शिवसेना ठाकरे गटाला सोडून जात असल्याने मोठे खिंडार धाराशिवमध्ये पडल्याचे दिसतंय. त्यामध्येच आता उद्धव ठाकरे शिवसेनेच्या वर्धापन दिन कार्यक्रमाकडे धाराशिवच्या शिवसैनिकांची पाठ फिरवल्याचे चित्र आहे. धाराशिव जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मुंबईतील वर्धापन दिन कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. खासदार ओमराजे निंबाळकर शिवसेना ठाकरे गटात असताना मोठ्या संख्येने धाराशिवचे शिवसैनिक या मेळाव्याकरिता जात.
खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या पक्षांतराच्या चर्चांमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला. दरवर्षी मोठ्या संख्येने मुंबईकडे रवाना होणारे शिवसैनिक यंदा तुलनेने फार कमी आहेत. जिल्ह्यातील राजकीय घडामोडींमुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील कार्यकर्ते दिशाहीन झाल्याचे दिसत आहेत. 20 जून रोजी ओमराजे निंबाळकर आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनीही यंदा मुंबईतील मेळाव्याकडे जाणे टाळले आहे.
