AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिवा ते सीएसएमटी जलद लोकल सुरु होणार? श्रीकांत शिंदेंचे रेल्वे प्रशासनाला पत्र

कसाऱ्याहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकलमधून पडून 4 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेनंतर दिवा ते सीएसएमटी जलद लोकल सुरु करावी अशी मागणी होत आहे. यावर खासदार श्रीकांत शिंदे प्रतिक्रिया दिली आहे.

दिवा ते सीएसएमटी जलद लोकल सुरु होणार? श्रीकांत शिंदेंचे रेल्वे प्रशासनाला पत्र
Diva to CSMT local
| Updated on: Jun 09, 2025 | 11:05 PM
Share

कसाऱ्याहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकलमधून पडून 4 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. मुंब्रा स्थानकाजवळ सकाळी नऊ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. यात अनेक प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. खासदार श्रीकांत शिंदेंनी या जखमींची रुग्णालयात जाऊन विचारपूस केली. या दुर्घटनेनंतर दिवा ते सीएसएमटी जलद लोकल सुरु करावी अशी मागणी होत आहे. यावर खासदार श्रीकांत शिंदे प्रतिक्रिया दिली आहे. नेमकं काय म्हणाले ते जाणून घेऊयात.

दिवा ते सीएसएमटी जलद लोकल सुरु करण्याची मागणी

खासदार श्रीकांत शिंदे यांनी या घटनेनंतर दिवा ते सीएसएमटी जलद लोकल सुरु करण्याची मागणी केली आहे. याबाबत त्यांनी रेल्वे प्रशासनाला पत्रही लिहिले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रवाशांकडूनही दिवा ते सीएसएमटी जलद लोकल सुरु करण्याची मागणी केली जात आहे, त्यामुळे आता यावर रेल्वे प्रशासन काय निर्णय घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

याबाबत बोलताना खासदार शिंदे म्हणाले की, ‘दिवा-सीएसटी लोकल चालू करण्याची मागणी केली जात आहे. ही मागणी प्रतिनिधी म्हणून मी सुद्धा काही वर्षांपासून करत आहे. इथे जलदगती लोकलच्या थांब्याची मागणी पूर्ण करण्यात आली आहे. पण या मार्गिकेवर जास्तीत जास्त लोकल फेऱ्या वाढवायला हव्यात. पाचवी-सहावी मार्गिका मुंबईपर्यंत जाईल, तेव्हा ते शक्य होईल.

लोकल गाड्यांची संख्या वाढवणं गरजेचं – श्रीकांत शिंदे

पुढे बोलताना श्रीकांत शिंदे यांनी म्हटले की, ‘कर्जत-कल्याण भागात मोठ्या प्रमाणावर लोक राहायला गेले आहेत. या मार्गावर मोठ्या प्रमाणावर लोकलची संख्या वाढवणं गरजेचं आहे. तशी मागणीही वारंवार केली जात आहे. पाचवी-सहावी मार्गिका सुरू झाल्यानंतर लोकलच्या संख्येत वाढ झाली. पण सीएसटीपर्यंत ही पाचवी व सहावी मार्गिका जायला हवी. त्यावर रेल्वे प्रशासनाचं काम चालू आहे. त्यानंतर लोकल गाड्या वाढू शकतात. त्याशिवाय कल्याणच्या पुढे तिसरी व चौथी मार्गिका टाकण्यासाठी जमीन अधिग्रहण वगैरे प्रक्रिया चालू आहे.’

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.