AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गावकऱ्यांनो चिंता सोडा, आता तुम्हाला लागोपाठ एसटी मिळणार, सरकारचा नवीन मास्टरप्लॅन काय?

एसटी महामंडळाच्या ताफ्यात ८,३०० नवीन बसेस दाखल होणार असून प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ७,०३५ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटीच्या या मोठ्या निर्णयाची माहिती दिली आहे.

गावकऱ्यांनो चिंता सोडा, आता तुम्हाला लागोपाठ एसटी मिळणार, सरकारचा नवीन मास्टरप्लॅन काय?
st bus
| Updated on: Feb 20, 2026 | 7:31 AM
Share

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) प्रशासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. एसटी महामंडळ लवकरच एक मोठा बदल करणार आहे. गेल्या काही वर्षांतील आर्थिक चणचण आणि बसेसची कमतरता यावर मात करण्यासाठी परिवहन मंत्री तसेच एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी एसटीला नवसंजीवनी देणारा कृती आराखडा जाहीर केला आहे. यानुसार एसटीच्या ताफ्यात ८,३०० नवीन बसेस दाखल होणार आहे. तसेच प्रवाशांच्या सुरक्षेसाठी १११ कोटी रुपयांचा डिजीटल प्रकल्प राबवण्यात येणार आहे.

नव्या बसेसचा ताफा: प्रवाशांची प्रतीक्षा संपणार

कोरोनापूर्व काळात एसटीकडे सुमारे १९,००० बसेस होत्या. मात्र निवृत्त होणाऱ्या बसेस आणि नवीन खरेदी अभावी ही संख्या १२,६०० पर्यंत खाली आली होती. आता शासनाने टप्प्याटप्प्याने बसेस वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर राजमाता जिजाऊ बसेस सुरु करण्यात येणार आहे. येत्या मार्च महिन्यापासून ३,००० नवीन ‘३x२’ आसन रचनेच्या ५५ आसनी बसेस ताफ्यात येतील. या बसेस प्रामुख्याने दोन शहरांदरम्यानच्या गर्दीच्या मार्गांवर धावतील.

तसेच ग्रामीण व दुर्गम भागात ५,००० साध्या बसेसची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. दुर्गम व आदिवासी भागासाठी १०० मिडी बसेसही दाखल केल्या जाणार आहेत. खाजगी ट्रॅव्हल्सशी स्पर्धा करण्यासाठी २०० अत्याधुनिक (Premium) बसेसची खरेदी केली जाणार आहे.

आर्थिक गणिताची जुळवाजुळव

सध्या एसटीला दररोज १ ते १.५ कोटी रुपयांची तूट सहन करावी लागत आहे. सध्या एसटीचा खर्च ३५ कोटी असून त्याचे उत्पन्न ३३.५ कोटी इतके आहे. मात्र, महिलांना तिकिटात ५० टक्के सवलत आणि ७५ वर्षांवरील ज्येष्ठांना मोफत प्रवास या योजनांमुळे प्रवाशांचा ओघ वाढला आहे. “बसेस वाढल्या की प्रवासी वाढतील आणि प्रवासी वाढले की उत्पन्न वाढून एसटी या वर्षाखेर आर्थिक गर्तेतून बाहेर येईल,” असा विश्वास मंत्री सरनाईक यांनी व्यक्त केला आहे.

सुरक्षेसाठी ७,०३५ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे

एसटी प्रवाशांच्या सुरक्षेसाठी १११ कोटी रुपये खर्चून डिजीटल सुरक्षा कवच तयार करण्यात येत आहे. राज्यातील ६३३ महत्त्वाच्या ठिकाणी (बसस्थानके, आगार, विभागीय कार्यालये, कार्यशाळा) एकूण ७,०३५ कॅमेरे बसवले जातील. यात पहिल्या टप्प्यात मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर विभागातील ६४ संवेदनशील ठिकाणी सीसीटीव्ही कार्यान्वित झाले आहेत. मुंबईत उभारलेल्या मध्यवर्ती नियंत्रण कक्षातून संपूर्ण राज्यातील हालचालींवर लक्ष ठेवले जाईल. टेलिकम्युनिकेशन इंडिया लिमिटेड ही संस्था या प्रकल्पाचे काम पाहत आहे.

दरम्यान सध्या एसटीने दररोज ५० लाख प्रवासी प्रवास करतात. नवीन ८,३०० बसेस ताफ्यात आल्यानंतर हे लक्ष्य ७० ते ७५ लाखांपर्यंत नेण्याचे महामंडळाचे मानस आहे. यामुळे ग्रामीण भागातील मुक्कामी फेऱ्या आणि शाळा-कॉलेजच्या विद्यार्थ्यांची गैरसोय दूर होण्यास मदत होईल.

Follow Us
पहिला वार करायचा असेल तर माझ्यावर करा', लांडगेंना सुळेंचं थेट आव्हान
Supriya Sule on Mahesh Landge :पहिला वार करायचा असेल तर माझ्यावर करा', लांडगेंना सुळेंचं थेट आव्हान
CM फडणवीसांचा जेन-झींशी संवाद, क्रिकेटपटू तिलक वर्मासह 10 हजार...
Devendra Fadnavis : CM फडणवीसांचा जेन-झींशी संवाद, क्रिकेटपटू तिलक वर्मासह 10 हजारांहून अधिक तरुणांची उपस्थिती
भाजप आमदार संजय उपाध्याय यांची मोठी घोषणा! गणेशोत्सवासाठी कोकण...
भाजप आमदार संजय उपाध्याय यांची मोठी घोषणा! यंदाही गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना मोफत बससेवा
राष्ट्रवादीचा अखेरचा पत्ता उलगडणार? कोअर कमिटीची महत्त्वाची बैठक
राष्ट्रावादी अखेरचा पत्ता उलगडणार? एकाच आठवड्यात सलग बैठका, विलिनिकरणाबाबत....
आयकर विभागाची मोठी कारवाई! 16 नामांकित कंपन्यावर गुन्हा दाखल
आयकर विभागाची मोठी कारवाई! तब्बल 2143 कोटी... 16 नामांकित कंपन्यावर गुन्हा दाखल
तुकाराम मुंढेंच्या भीतीने जुनी परंपरा मोडली! पुण्यातील सुप्रिसिद्ध...
तुकाराम मुंढेंच्या भीतीने जुनी परंपरा मोडली! बऱ्याच काळापासूनची पुण्यातील प्रसिद्ध खाऊगल्ली बंद?
'सातारा जिल्हा बँकेची निवडणूक भाजप स्वबळावर लढणार' गोरेंचं विधान
सातारा जिल्हा बँकेची निवडणूक भाजप स्वबळावर लढणार- जयकुमार गोरे
उत्पादन घट आणि वाहतूक खर्च वाढल्याने सुकामेवा महागला...
उत्पादन घट आणि वाहतूक खर्च वाढल्याने सुकामेवा महागला; बदाम, पिस्त्याच्या दरात ३०० रुपयांपर्यंत वाढ
भोरमध्ये पुणे ट्रान्समिशन थ्री प्रकल्पाविरोधात शेतकऱ्यांचा रास्ता रोको
भोरमध्ये पुणे ट्रान्समिशन थ्री प्रकल्पाविरोधात शेतकऱ्यांचा रास्ता रोको
मनोज जरांगे पाटील यांची जालन्यात 130 गावांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांची जालन्यात 130 गावांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा