AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Badlapur Case: रिव्हॉल्व्हर हिसकावली त्यानंतर…, अक्षय शिंदे सोबत शेवटच्या 10 मिनिटांत नेमकं काय घडलं?

Badlapur Case: मुंब्रा बायपासजवळून जात असलेली पोलिसांची गाडी... अक्षयने रिव्हॉल्व्हर हिसकावली त्यानंतर..., पोलीस जखमी आणि अक्षयचा याचा एन्काऊंटर... शेवटच्या 10 मिनिटांत नेमकं झालं तरी काय ? सर्वत्र बदलापूर घटनेची चर्चा...

Badlapur Case: रिव्हॉल्व्हर हिसकावली त्यानंतर..., अक्षय शिंदे सोबत शेवटच्या 10 मिनिटांत नेमकं काय घडलं?
| Updated on: Sep 24, 2024 | 8:29 AM
Share

बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर पोलिसांनी केला आहे. सांगण्यात येत आहे की, अक्षय याने पोलिसांची रिल्हॉल्व्हर हिसकावली आणि पोलिसांवरच गोळीबार केला. याचदरम्यान, एका पोलीस अधिकाऱ्याला गोळी देखील लागली. पोलिसांशी झालेल्या चकमकीत अक्षयला गोळी लागली, आणि त्याचा मृत्यू झाला… असा दावा देखील केला जात आहे. बदलापूर बलात्कार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्यासोबत शेवटच्या 10 मिनिटांत काय झालं? जाणून घेऊ…

अक्षय शिंदे हा बदलापूर येथील शाळेत सफाई कर्मचारी होता. अक्षय याच्यावर शाळेतील अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचाराचे आरोप करण्यात आले. तेव्हा पासून अक्षय शिंदे हा पोलिसांच्या ताब्यात होता. पण सोमवारी अक्षय याला कारागृहातून रिमांडसाठी पोलीस ठाण्यात घेऊन जात असताना जवळपास संध्याकाळी 6 च्या सुमारास एन्काऊंटरमध्ये त्याचा मृत्यू झाला.

शेवटच्या क्षणी नक्की झालं तरी काय?

मुंब्रा बायपासजवळून जात असताना आरोपी अक्षय शिंदे याने एपीआय नीलेश मोरे यांची सर्व्हिस रिव्हॉल्व्हर हिसकावली . त्यानंतर अक्षय शिंदे याने नीलेश मोरे यांच्यावर 3 गोळ्या झाडल्या. एक गोळी निलेश मोरे यांच्या पायाला लागली. दोन गोळ्या हवेत गेल्या. गोळी लागल्यानंतर निलेश मोरे यांनी देखील अक्षय याला जखमी केलं.

आरोपी अक्षय शिंदे आणि एपीआय निलेश मोरे गाडीत मागच्या सीटवर बसले होते. पुढे ड्रायव्हर आणि ड्रायव्हरच्या बाजूच्या सीटवर पोलिस निरीक्षक संजय शिंदे बसले होते. संजय शिंदे यांनी गोळ्यांचा आवाज ऐकल्यानंतर स्वसंरक्षणासाठी स्वतःची बंदूक काढली आणि अक्षय शिंदे याच्यावर गोळ्या झाडल्या. गोळी अक्षय शिंदे यांच्या चेहऱ्यावर लागली आणि जागीच अक्षय शिंदे याचा मृत्यू झाला.

पोलिसांच्या गाडी कोण-कोण होतं?

अक्षयने गोळीबार केला तेव्हा पोलिस दलातील चार सदस्य, दोन अधिकारी आणि इतर दोन लोक कारमधून प्रवास करत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं की, संबंधित प्रकरणी जलद गतीने सुनावणी सुरु आहे. सर्व दोषींना शिक्षा होणार… असं देखील मुख्यमंत्री म्हणाले होते.

पण एन्काऊंटरमध्ये अक्षय शिंदे याचा मृत्यू झाल्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. घडलेल्या घटनेमुळे राजकारणात देखील खळबळ माजली आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त बदलापूर येथे घडलेल्या घटनेची चर्चा सुरु आहे.

काय म्हणाल्या अक्षय शिंदेच्या आई?

अक्षय शिंदेच्या आई म्हणाल्या, ‘पोलिसांनी जाणूनबुजून त्याला गोळी मारली आहे. आजच त्याचं आणि माझं बोलणं झालं होतं. तो मला सांगत होता, माझी चार्जशीट आली आहे, आता माझी सुटका होईल. त्याला फटाके देखील वाजवता येत नव्हते, तो बंदूक कशी चालवेल? पोलिसांनी त्याला जाणूनबुजून मारलं आहे…’ आता याप्रकरणी पुढे काय होणार पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.