AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! जरांगेंच्या आंदोलनावर सुनावणी, त्या कृतीमुळे न्यायालयाचा संताप; नेमकं काय घडलं?

जरांगे यांच्या या आंदोलनालामुळे संपूर्ण मुंबईचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. याच कारणामुळे जरांगेंच्या आंदोलनाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिका दाखल करणाऱ्यांत अॅड. गुणरत्न सदावर्ते यांचाही समावेश आहे. दरम्यान, या सुनावणीदरम्यान पूर्ण ताकदीने युक्तिवाद केला जात आहे. पण युक्तिवाद सुरु असतानाच न्यायाधीशांनी संताप व्यक्त केलाय. नियमांचे उल्लंघन होत असल्याने न्यायमूर्तींनी आक्रमक पवित्रा धारण केला आहे.

मोठी बातमी! जरांगेंच्या आंदोलनावर सुनावणी, त्या कृतीमुळे न्यायालयाचा संताप; नेमकं काय घडलं?
manoj jarange patil
| Updated on: Sep 01, 2025 | 3:10 PM
Share

Manoj Jarange Patil Mumbai Protest : मुंबईत मनोज जरांगे यांचे आमरण उपोषण चालू आहे. काहीही झालं तरी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण घेणार अशी भूमिका घेऊन जरांगे आझाद मैदानात ठाण मांडून बसले आहेत. जरांगे यांच्या या आंदोलनालामुळे संपूर्ण मुंबईचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. याच कारणामुळे जरांगेंच्या आंदोलनाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिका दाखल करणाऱ्यांत अॅड. गुणरत्न सदावर्ते यांचाही समावेश आहे. दरम्यान, या सुनावणीदरम्यान पूर्ण ताकदीने युक्तिवाद केला जात आहे. पण युक्तिवाद सुरु असतानाच न्यायाधीशांनी संताप व्यक्त केलाय. नियमांचे उल्लंघन होत असल्याने न्यायमूर्तींनी आक्रमक पवित्रा धारण केला आहे.

30 आणि 31 ऑगस्टच्या आंदोलनाला परवानगी नव्हती

मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना राज्याचे महाधिवक्ते विरेंद्र सराफ यांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनादरम्यान सर्व नियमांचे उल्लंघन करण्यात आले. 5000 आंदोलकांची मर्यादाही ओलांडण्यात आली. 30 आणि 31 ऑगस्ट रोजी जरांगे यांच्या आंदोलनाला सरकारने परवानगी दिली नव्हती, अशी मोठी माहिती महाधिवक्त्यांनी दिली आहे. तर दुसरीकडे जरांगे यांच्या आंदोलनाला विरोध करणारे अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनीदेखील आमरण उपोषणाची परवानगी नाही तरीदेखील ते चालू आहे. सामान्यांना त्रास दिला जात आहे, असा युक्तिवाद केला आहे. दरम्यान हा सर्व युक्तिवाद चालू असताना न्यायालयाने संताप व्यक्त केला आहे.

न्यायालयाचा संताप, नेमकं काय घडलं?

सध्या न्यायालयात जरांगे यांच्या आंदोलनावर युक्तिवाद चालू आहे. आंदोलनाला विरोध करणारे याचिकाकर्ते मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा उपस्थित करत आहेत. हा युक्तिवाद चालू असताना न्यायालयाच्या परिसरात मराठा आंदोलक जमले आहेत. सुनावणीदरम्यान या आंदोलकांचे वकीलही न्यायालयात उपस्थित आहेत. युक्तिवाद चालू असतानाच आंदोलकाच्या वकिलाने बोलण्याचा प्रयत्न केला. हस्तक्षेप अर्ज दाखल न करता हा बोलण्याचा प्रयत्न करण्यात आला. याच वेळी न्यायालयाने यावर आक्षेप व्यक्त केला. आंदोलकाच्या वकिलाला न्यायालयाने थांबावले. तसेच संताप व्यक्त करत हस्तक्षेप अर्ज दाखल न करता कसे बोलू शकता? असा प्रश्न उपस्थित केला. न्यायालयाच्या या भूमिकेनंतर आंदोलकांचे वकील शांत झाले असून न्यायालय नेमका काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Follow Us
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?.
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह..
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह...
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी.
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला.
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?.
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?.
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप.
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?.
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले.
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा.