AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आनंदाची बातमी! मुंबई-कोल्हापूर वंदे भारत ट्रेन सुरु होणार, तारीख आली समोर

लवकरच मुंबई ते कोल्हापूर अशी वंदे भारत ट्रेन सुरु होणार आहे. त्यामुळे मुंबई ते कोल्हापूर हा प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार आहे.

आनंदाची बातमी! मुंबई-कोल्हापूर वंदे भारत ट्रेन सुरु होणार, तारीख आली समोर
Vande Bharat
| Updated on: Jun 11, 2025 | 8:42 PM
Share

कोल्हापूरकरांसाठी आनंदाची बातमी आहे. आता लवकरच मुंबई ते कोल्हापूर अशी वंदे भारत ट्रेन सुरु होणार आहे. त्यामुळे मुंबई ते कोल्हापूर हा प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार आहे. क्षेत्रीय रेल्वे प्रवासी सल्लागार समितीच्या बैठकीत या ट्रेनची मागणी करण्यात आली होती, या मागणीला रेल्वे प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिल्याने आता लवकरच या मार्गावर वंदे भारत ट्रेन सुरु होणार आहे.

कोल्हापूरमधील अनेक लोक मुंबईला कामानिमित्त ये-जा करत असतात. तसेच मुंबईतील अनेक पर्यटक कोल्हापूरला देवीच्या दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा संख्या जास्त आहे, मात्र रेल्वेची चांगली कनेक्टिव्हीटी नाही. त्यामुळे या मार्गावर वंदे भारत ट्रेन सुरु करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत होती, त्यानुसार आता या मार्गावर ट्रेन सुरु होणार आहे.

सध्या पुणे-कोल्हापूर मार्गावर वंदे भारत ट्रेन

सध्या कोल्हापूर-पुणे या मार्गावर वंदे भारत ट्रेन धावत आहे. ही मिनी वंदे भारत ट्रेन सोमवार, गुरुवार आणि शनिवार असे 3 दिवस धावते. या ट्रेनला ८ डब्बे असून यात एसी चेअर कार आणि एसी एक्झिक्युटिव्ह चेअर कारचाही समावेश आहे.

मुंबई-कोल्हापूर वंदे भारत ट्रेन कधीपासून सुरु होणार?

मुंबई-कोल्हापूर वंदे भारत ट्रेन कधीपासून सुरु होणार? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार येत्या १५ दिवसांत या मार्गावर वंदे भारत ट्रेन धावण्याची शक्यता आहे. रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य शिवनाथ बियाणी यांनी सांगितले की, “ही रेल्वे थेट मुंबईपर्यंत धावेल. लवकरच तिचे वेळापत्रक जाहीर होईल.” हे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर या मार्गासाठी भाडे काय असेल याची माहितीही समोर येणार आहे.

वंदे भारत ट्रेनची वैशिष्ट्ये

वंदे भारत ट्रेन ही भारतीय रेल्वेने विकसित केलेली खास आणि आधुनिक सुविधांनी सज्ज असलेली ट्रेन आहे. या ट्रेनचा कमाल वेग 160 किमी/तास आहे. या ट्रेनच्या सर्व कोचमध्ये स्वयंचलित दरवाजे आहेत. तसेच ट्रेनचे सर्व कोच पूर्णतः वातानुकूलित आहेत. प्रवासादरम्यान स्थानकांचे अपडेट LCD स्क्रीनवर दिले जातात. तसेच यात आधुनिक व्हॅक्युम बायो-टॉयलेट्स आहेत. या ट्रेनला पारंपरिक ट्रेनच्या तुलनेत 30% कमी वेळ लागतो.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.