AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गुरुदेवजींच्या आशीर्वादानंतर चमत्कार, घशाची समस्या संपली, मुंबईच्या महापौर रितू तावडे यांचे विधान!

मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी एका कार्यक्रमात बोलताना गुरुदेवजींच्या चमत्कारामुळेच माझ्या घशाची समस्या नाहीशी झाली, असे विधान केले आहे. या कार्यक्रमाला मंगल प्रभात लोढादेखील उपस्थित होते.

गुरुदेवजींच्या आशीर्वादानंतर चमत्कार, घशाची समस्या संपली, मुंबईच्या महापौर रितू तावडे यांचे विधान!
ritu tawdeImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 31, 2026 | 9:13 PM
Share

Ritu Tawade : सध्या राज्यात भोंदूबाबा अशोक खरात हे प्रकरण खूपच चर्चेत आहे. या प्रकरणामुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. तो तंत्र-मंत्र तसेच जादू करण्याचे आश्वासन देऊन महिलांना जाळ्यात ओढायचा. आतापर्यंत त्याने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे समोर आले आहे. त्याच्या या कुकृत्याचे अनेक फोटोदेखील समोर आले आहेत. खरातचे प्रकरण समोर आल्यानंतर अंधश्रद्धा, बुवाबाजीचा मुद्दा चर्चेच्या केंद्रस्थानी आला. अंधश्रद्धेला बळी पडू नका, असे राजकीय नेत्यांपासून ते सामाजिक कार्यकर्त्यांपर्यंत सगळेच सांगत आहेत. असे असतानाच आता मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी एक विधान केले आहे. गुरुदेवजींच्या आशीर्वादाने माझ्या घशाची समस्या नाहीशी झाली. हा तर चमत्कार झाला, असे रितू तावडे म्हणाल्या आहेत. त्या मुंबईतील एका कार्यक्रमात बोलत होत्या. त्यांच्या या विधानानंतर आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.

रितू तावडे नेमकं काय म्हणाल्या?

या कार्यक्रमात बोलत असताना, रितू तावडे यांनी नम्रमुनी महाराज यांच्या चमत्कारामुळे माझ्या घशाचा त्रास नाहीसा झाला, अशा आशयाचे विधान केले. “तुम्हाला मी माझा एक अनुभव सांगू इच्छिते. गेल्या दीड-दोन वर्षांपासून मी माझ्या घशाबाबतच्या समस्येने खूप त्रस्त होते. माझा आवाज तुम्हाला जसा ऐकायला येतोय, तो असा नव्हता. मी परम गुरुदेवजी यांच्याकडे माझी समस्या मांडली. मी औषधं घेत आहे. परंतु काहीही फरक परत नाहीये. त्यानंतर गुरुदेवजींनी माझ्यासाठी प्रार्थना केली. आता मी चकित आहे. दीड वर्षांपासून मी ज्या घशाच्या समस्येने त्रस्त होते, त्यांनी आशीर्वाद दिल्याने मी आज तुमच्यासमोर असं बोलू शकत आहे,” असं रितू तावडे म्हणाल्या.

मंगल प्रभात लोढा यांच्याकडूनही चमत्काराचा उल्लेख

मी पराग भाई यांना याबाबत सांगत होते. हा तर खूपच मोठा चमत्कार झाला, कारण मी या समस्येमुळे खूप त्रासले होते, असेही रितू तावडे सांगायला विसरल्या नाहीत. दरम्यान, रितू तावडे यांच्या या विधानानंतर भाजपाचे नेते तथा मंत्री मंगलप्रभात लोढा यांनीदेखील गुरुदेवजींच्या चमत्काराचा उल्लेख केला. गुरुदेवजी यांची भेट घेतल्याने तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री अमित शाहा यांच्या आशीर्वादाने रितू तावडे मुंबईच्या महापौर झाल्या आहाेत, असे लोढा म्हणाले. दरम्यान, आता विरोधक यावर नेमकी काय प्रतिक्रिया देणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही' आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा
आदित्य ठाकरे यांचा शिंदे गटावर हल्लाबोल; 'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही'
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल; ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
मोदी-शाह संपले; काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान
काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान; 'मोदी-शाह संपले'
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप; मुंबईकडे कूच करण्याचा इशारा
कंगनाने वर्षा निवासस्थानी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट
कंगना रणौतची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वर्षा निवासस्थानी भेट
साठ्ये महाविद्यालयाबाहेर मनविसे-एबीविपी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची
मुंबईतील साठ्ये कॉलेजमध्ये नोंदणी मोहिमेवरून मनविसे आणि एबीविपीत वाद
भारताचा पाकिस्तानवर ५-३ असा दणदणीत विजय
भारताने पाकिस्तानला हरवून हॉकी वर्ल्डकपच्या नॉकआउटमध्ये स्थान मिळवले
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या; पोलिसांकडे तक्रार
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या: युवक काँग्रेसची पोलिसांकडे तक्रार
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर,
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर, काय म्हणाले?