AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तब्बल 9 लाख लोकांनी मुंबई सोडली!

अनेक स्वप्न उराशी बाळगून मुंबईची वाट धरणाऱ्यांची संख्या मोठी आहे. दिवसागणिक असे अनेक लोक मुंबईत आसरा घेतात. मात्र, असाही एक वर्ग आहे जो मुंबईच्या आजूबाजूला निवारा शोधतो. नुकत्याच करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणानुसार मागील 10 वर्षात मुंबईतील 9 लाख लोकांनी मुंबईबाहेर स्थलांतर केले आहे.

तब्बल 9 लाख लोकांनी मुंबई सोडली!
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Aug 12, 2019 | 1:07 PM
Share

मुंबई : अनेक स्वप्न उराशी बाळगून मुंबईची वाट धरणाऱ्यांची संख्या मोठी आहे. दिवसागणिक असे अनेक लोक मुंबईत आसरा घेतात. मात्र, असाही एक वर्ग आहे जो मुंबईच्या आजूबाजूला निवारा शोधतो. नुकत्याच करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणानुसार मागील 10 वर्षात मुंबईतील 9 लाख लोकांनी मुंबईबाहेर स्थलांतर केले आहे. यापैकी एकट्या ठाण्यात यापैकी 8 लाख लोकांचे स्थलांतर झाले आहे.

या मोठ्या प्रमाणातील स्थलांतरनामुळे 2001 ते 2011 दरम्यान ठाण्याच्या लोकसंख्येत 29.3 लाखांची भर पडली. यापैकी 8 लाख लोक दक्षिण मुंबईतून येथे स्थलांतरित झाले. उपनगरीय भागातून ठाण्यात होणारे स्थलांतर 2001 ते 2011 मध्ये 10 पटीने वाढले आहे. ही वाढ 30 हजार 128 वरुन 3.9 लाख अशी आहे. हे स्थलांतर होण्यामागील मुख्य कारण शहरातील गर्दीच्या तुलनेत ठाण्यात राहण्यासाठी घरांची सहज होणारी उपलब्धता हे आहे. मुंबईत घर खरेदी करणे बहुतांशी बजेटच्या बाहेर गेलं आहे. मुंबईतील मिल बंद झाल्याने पूर्वी मिलमध्ये काम करणाऱ्या अनेकांचे रोजगार गेले आहेत. त्यामुळे लोक शहराच्या बाहेर आपल्या बजेटमधील घर घेत आहेत.

ज्यांची शहरात स्वतःच्या मालकीची घरं होती. त्यांना या घरांची मोठी किंमत मिळत असून या पैशात शहराबाहेर आहे त्यापेक्षा मोठी घरं मिळत असल्याने अनेकांनी तो पर्याय निवडला आहे. काही मध्यमवर्गीय कुटुंबांनी सुरुवातीला गुंतवणूक म्हणून घर, फ्लॅट घेतले. आता शहराबाहेरील या भागात वाहतूक व्यवस्था सुधारल्यामुळे त्या ठिकाणीच राहण्याचा निर्णय घेतला आहे. वाहतूकीच्या पर्यायांची उपलब्धता होत आहे तसा लोकांचा शहराच्या बाहेर राहण्याचा कलही वाढत आहे. प्रवासासाठी लागणाऱ्या वेळेपेक्षा खर्च करावे लागणारे पैसे अधिक असल्याने अनेकजण बाहेर जाण्याचा व्यवहारी मार्ग निवडत आहेत.

2001 पासून आपले स्वतःचे घर खरेदी करण्याचा ट्रेंड आहे. त्यामुळे लोक आपलं स्वतःचं घरं खरेदी करण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी वाशी, सानपाडा, मिरा भायंदर सारख्या ठिकाणांचा पर्याय निवडत आहेत. ठाण्यात झालेल्या लोकसंख्येच्या विस्फोटामुळे तेथील प्रशासनाला जिल्ह्याचे दोन भाग करावे लागले. ठाण्यानंतर लोकसंख्या स्थलांतराचा प्रवास कल्याण, उल्हासनगर, भिवंडी आणि पालघर या ठिकाणीही होत आहे. आगामी काळात मुंबईतून बाहेर स्थलांतरित होणाऱ्यांसाठी रायगड हे नवे आकर्षण असेल, असा अंदाज नगरविकास व्यवस्थापकांकडून व्यक्त केला जात आहे.

Follow Us
नेपाळमध्ये अडकलेल्या ११५ महाराष्ट्रीयांना मुख्यमंत्र्यांकडून मदत
नेपाळमध्ये अडकलेल्या ११५ महाराष्ट्रीयांना मुख्यमंत्र्यांकडून मदतीचा हात, सुखरूप परत आणणार
मुंबई महापालिकेकडून शालेय साहित्य वाटपास विलंब: इराण युद्ध कारणीभूत
मुंबईतील शालेय मुलांना छत्र्या मिळेनात: मुंबई महापालिकेचे अजब उत्तर इराण युद्ध
शिल्पा गवारे कुटुंबीयांकडून छळाचा आरोप, न्यायची मागणी
पिंपरी चिंचवडमधील शिल्पा गवारे मृत्यू प्रकरण: पती, सासू-सासरे आणि दिराला पोलीस कोठडी
नेपाळमध्ये अडकलेल्या नागपूरच्या 106 पर्यटकांची सुखरूप सुटका
नेपाळमध्ये अडकलेल्या नागपूरच्या 106 पर्यटकांची सुखरूप सुटका, मुख्यमंत्री फडणवीसांच्या प्रयत्नांनी परतीचा प्रवास सुरू
ट्रोलर्सवरील प्रतिक्रियेवरून रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
ट्रोलर्सवरील प्रतिक्रियेवरून रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
दिशा सालियान प्रकरणाची मुंबई हाटकोर्टात सुनावणी पार
Disha Salian Case : दिशा सालियान प्रकरणाची मुंबई हाटकोर्टात सुनावणी, काय सुनावणी घडलं?
नेपाळ पुराचा बिहारला फटका: पाटणा, चंपारण, गोपाळगंज, सारणमध्ये सतर्कता
नेपाळमधील महापुराचा बिहारला फटका: गंगा नदीकाठच्या झोपड्या पाण्याखाली
धक्कादायक! पोटच्या मुलालाच इतकं मारलं की... श्रावण महिन्यात मांसाहार
धक्कादायक! पोटच्या मुलालाच इतकं मारलं की... श्रावण महिन्यात मांसाहार मागणाऱ्या लेकाला पालकांनीच संपवलं
यंदाही नारळी पौर्णिमेनिमित्त आदित्य ठाकरे वरळी कोळीवाड्यात
यंदाही नारळी पौर्णिमेनिमित्त आदित्य ठाकरे वरळी कोळीवाड्यात; सांस्कृतिक सोहळ्यांमध्ये सहभाग
MPSC पेपरफुटी प्रकरणावर फडणवीसांचा मोठा निर्णय, दोषींवर कठोर...
MPSC पेपरफुटी प्रकरणावर फडणवीसांचा मोठा निर्णय, दोषींवर कठोर कारवाईचे निर्देश