AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिंदेंनी भाजपची ‘ती’ गोष्ट आमच्याकडे येऊन रडत रडत सांगितली, आदित्य ठाकरे यांच्या विधानाने खळबळ

टीव्ही9 मराठीच्या 'महाराष्ट्राचा महासंकल्प' या कार्यक्रमामध्ये ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मोठे विधान केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना त्यांना मिंधे असा उल्लेख करत आदित्य ठाकरेंनी केलेल्या विधानाने खळबळ उडाली आहे. आदित्य ठाकरे शिंदेंबाबत असं काय म्हणालेत ज्याची इतक्या मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे जाणून घ्या.

शिंदेंनी भाजपची 'ती' गोष्ट आमच्याकडे येऊन रडत रडत सांगितली, आदित्य ठाकरे यांच्या विधानाने खळबळ
| Updated on: Sep 06, 2024 | 5:21 PM
Share

माझ्या आजोबांनी भूमिपुत्राच्या मुद्द्यावरून पक्ष उभा केला. तेच भाजप मानत नाही, आमचं हिंदु्तव चूल पेटवणारं आहे. भाजपचं हिंदुत्व घर पेटवणारं आहे. ते आधी हिंदुत्वावर बोलतात. नंतर काहीच नसलं तर भारत पाकिस्तानवर येतात. सर्वाधिक अतिरेकी हल्ले हे भाजपच्या सत्तेतच झाल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

या कार्यक्रमामध्ये आदित्य ठाकरे यांना, मविआ सरकार असताना गिरीश महाजनांना अटकेचा प्रयत्न झाला का यावरून प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना, अटकेची भीती कशासाठी होती. काही चुकीचं केलं असेल ना. एवढं घाबरण्याचं कारण काय होतं. आमचं तर भाजपच्या सरकार सारखं नव्हतं ना, कुणालाही अटक करा, असं आदित्य ठाकरे म्हणाले. त्यानंतर शिदेंवर निशाणा साधताना, मिंधेंना अटक करण्याची भाजपची तयारी होती. हे मिंधे यांनी आमच्याकडे येऊन रडत रडत सांगितल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले.

युतीत आम्ही दोनदा फसलो. 2014 ला त्यांनी युती तोडली. जी लोकं धर्माच्या नावावर घरे जाळता, लोकांना मारता, दहा वर्षात या देशात एक तरी शाश्वत विकासाची गोष्ट दाखवा. स्वतच्या पक्षाची केली नाही. स्मार्ट सिटीचं काय झालं. स्वच्छ भारतचं काय झालं, नोटबंदी, आधारचं काय झालं. एकही कार्यक्रम त्यांनी राबवला नाही. भाजप देशाला आणि महाराष्ट्राला संपवायला निघाली आहे. ते महाराष्ट्र द्वेष्टे आहे. महाराजांच्या पुतळ्यात जी भाजप भ्रष्टाचार करू शकते त्यांच्यासोबत युती करणार का ? आम्हाला नकली संतान म्हणाले. पवारांना भटकती आत्मा म्हणते, त्यांच्याशी युती कशी होईल, असंही आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

Follow Us
'राजकारणात असलेल्या लोकांनी काही सीमा...,' काय म्हणाले भुजबळ ?
'राजकारणात असलेल्या लोकांनी काही सीमा...,' काय म्हणाले भुजबळ ?.
देवकृपेनेच रुपाली चाकणकर यांचा राजीनामा झाला - करुणा मुंडे
देवकृपेनेच रुपाली चाकणकर यांचा राजीनामा झाला - करुणा मुंडे.
कर्तव्य म्हणून मी शिंदेंसोबत गेलो होतो, काय म्हणाले विखे पाटील ?
कर्तव्य म्हणून मी शिंदेंसोबत गेलो होतो, काय म्हणाले विखे पाटील ?.
भोंदूबाबाचे अनेक कारनामे उघड, काय म्हणताहेत मिरगावचे गावकरी ?
भोंदूबाबाचे अनेक कारनामे उघड, काय म्हणताहेत मिरगावचे गावकरी ?.
जे भोंदूबाबाला शरण गेले त्या सर्वांनीच राजीनामा द्यावा - यशोमती ठाकूर
जे भोंदूबाबाला शरण गेले त्या सर्वांनीच राजीनामा द्यावा - यशोमती ठाकूर.
भोंदूबाबा खरातचा पीए नीरज जाधव कोर्टात हजर होणार? आणखी बाहेर पडणार?
भोंदूबाबा खरातचा पीए नीरज जाधव कोर्टात हजर होणार? आणखी बाहेर पडणार?.
...तर तटकरे आणि प्रभृतींनी अजितदादांचा वारसा सांगू नये - सुषमा अंधारे
...तर तटकरे आणि प्रभृतींनी अजितदादांचा वारसा सांगू नये - सुषमा अंधारे.
'भोंदूबाबाचा ट्रायडंटवरुन मंत्र्यांना आदेश...,' संजय राऊत यांचा आरोप
'भोंदूबाबाचा ट्रायडंटवरुन मंत्र्यांना आदेश...,' संजय राऊत यांचा आरोप.
महिला आयोगाच्या अध्यक्षपदी आता IPS नेमा, अंजली दमानिया यांची मागणी
महिला आयोगाच्या अध्यक्षपदी आता IPS नेमा, अंजली दमानिया यांची मागणी.
पुणे पुन्हा हादरलं! त्या बॅनरवरून वाद; दोन गटांमध्ये गोळीबार
पुणे पुन्हा हादरलं! त्या बॅनरवरून वाद; दोन गटांमध्ये गोळीबार.