…तर प्रवाशांना त्यांच्या खर्चाने क्वारंटाईन करुन काय साधणार?, अबू आझमींचे उद्धव ठाकरेंना पत्र

आमदार अबू आझमी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना 14 दिवसांच्या सशुल्क क्वारंटाईन बद्दल पत्र लिहिले आहे. Abu Azami Uddhav Thackeray

...तर प्रवाशांना त्यांच्या खर्चाने क्वारंटाईन करुन काय साधणार?, अबू आझमींचे उद्धव ठाकरेंना पत्र
आमदार अबू आझमी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलय
Follow us
| Updated on: Dec 26, 2020 | 11:41 AM

मुंबई: समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना 14 दिवसांच्या  सशुल्क क्वारंटाईन बद्दल पत्र लिहिले आहे. महाराष्ट्र सरकारनं यूरोप आणि मध्य पूर्व देशांतून येणाऱ्या प्रवाशांना पेड क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा पूनर्विचार करण्याची मागणी अबू आझमी यांनी केली आहे.  (Abu Azami wrote letter to Uddhav Thackeray on compulsory paid quarantine)

परदेशातून मुंबईच्या विमानतळांवर आल्यास पेड क्वारंटाईन करण्यात येणार आहे. यामुळे लोक देशातील दिल्ली, बेंगलोर, कोलकत्ता येथे विमानावरुन येऊन रेल्वे किंवा देशांतर्गत विमानसेवेद्वारे महाराष्ट्रात येतील. त्यांना क्वारंटाईटन कसं करणार हा प्रश्न अबू आझमींनी उपस्थित केला. कोरोनाच्या नव्या विषाणूच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असला तरी कोरोना रोखण्यासाठी हा मार्ग नाही, असंही त्यांनी स्पष्ट केले.

आखाती देशात काम करणाऱ्या मजुरांवर अन्याय

आखाती देशात काम करणारे मजूर सुट्टीसाठी आपल्या देशात परत येणार आहेत. तिथे मजूर एक एक पैसा साठवून भारतात कुटुंबाला पैसे पाठवत असतात. त्यांना भारतात परत आल्यास त्यांना स्वत:च्या पैशानं क्वारंटाईन व्हावं लागणार आहे. त्यामुळे ते मुंबईला थेट न येता अहमदाबाद, बंगळुरु किंवा दुसऱ्या विमानतळावर येतील. तिथून ते मुंबई किंवा त्यांच्या शरात जातील. यामुळे त्यांचे जादा पैसे खर्च होतील. पेड क्वारंटाईन करण्याचा निर्णय त्या मजुरांवर अन्यायकारक आहे. त्यामुळे सरकारनं पेड क्वारंटाईनचा निर्णय मागं घ्यावा, अशी विनंती अबू आझमी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

महाराष्ट्रात मध्यपूर्वेतून येणारे नागरिक 14 दिवस क्वारंटाईन

संपूर्ण यूरोपीय देशांसह मध्य-पूर्व देशांकडून महाराष्ट्रात उतरणाऱ्या प्रवाशांना 14 दिवस संस्थात्मक क्वारंटाईन बंधनकारक करण्यात आले आहे. अशा प्रवाशांना क्वारंटाईन केल्यानंतर त्यांची पाचव्या अथवा सातव्या दिवशी कोरोनाची चाचणी (आरटीपीसीआर) केली जाईल. त्यांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात येईल. ज्या विमानतळांवर आंतरराष्ट्रीय विमाने उतरतात तेथील महापालिका आयुक्तांनी अशा प्रवाशांना क्वारंटाईन करण्यासाठी हॉटेल आणि स्वतंत्र हॉस्पिटलची व्यवस्था करावी. त्याचबरोबर युरोपातून आलेल्या प्रवाशांना नव्या विषाणूची लक्षणे असल्यास त्यांच्यासाठी स्वतंत्र रुग्णालयाची देखील व्यवस्था करण्याचे आदेश उद्धव ठाकरेंनी यावेळी दिले होते.

संबंधित बातम्या:

कोरोनाचा कहर: ब्रिटनमधून भारतात येणाऱ्या सर्व विमानसेवा 31 डिसेंबरपर्यंत रद्द; केंद्राचा मोठा निर्णय

महाराष्ट्रात उद्यापासून रात्रीची संचारबंदी, मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय

(Abu Azami wrote letter to Uddhav Thackeray on compulsory paid quarantine)

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.