AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईतील खासगी शाळांमधील 25 टक्के आरक्षित जागांवर मोफत प्रवेश सुरु, कसा अर्ज कराल?

मुंबई विभागातील खासजगी शाळेत 25 टक्के आरक्षित जागांवर मोफत प्रवेश प्रक्रिया (School Admission) सुरू झाली आहे.शिक्षणाचा (Educaiton right) हक्क अधिनियम 2009 (आर. टी. ई.) अन्वये, शैक्षणिक वर्ष 2022-2023 साठी खासगी प्राथमिक शाळांमध्ये हा प्रवेश मिळणार आहे.

मुंबईतील खासगी शाळांमधील 25 टक्के आरक्षित जागांवर मोफत प्रवेश सुरु, कसा अर्ज कराल?
नागपूर जिल्ह्यातील सर्व शाळा फक्त सकाळीच भरतील. Image Credit source: tv 9
| Updated on: Feb 16, 2022 | 10:50 PM
Share

मुंबई : मुंबईतील विद्यार्थ्यांना (Students) आणि पालकांना दिलासा देणारी ही बातमी आहे. कारण मुंबई विभागातील खासजगी शाळेत 25 टक्के आरक्षित जागांवर मोफत प्रवेश प्रक्रिया (School Admission) सुरू झाली आहे.शिक्षणाचा (Educaiton right) हक्क अधिनियम 2009 (आर. टी. ई.) अन्वये, शैक्षणिक वर्ष 2022-2023 साठी खासगी प्राथमिक शाळांमध्ये हा प्रवेश मिळणार आहे. पाल्याच्या प्रवेशासाठी संबंधित पालकांनी अर्ज करावेत, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. त्यानुसार, मुंबई जिल्ह्यातील एकूण 343 पात्र शाळांमधील आरटीईच्या 25 टक्के मोफत प्रवेशासाठी 6 हजार 469 जागा उपलब्ध आहेत.पालकांनी प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करुन आज पासून पाल्याच्या प्रवेशासाठी शासनाच्या student.maharashtra.gov.in (www नाही) या संकेत स्थळावरून किंवा education.maharashtra.gov.in (www नाही) या सरलच्या वेबसाईट मधील विद्यार्थी (Student) या टॅबमधील आरटीई पोर्टलवरुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावेत. अर्जासोबत कोणतीही कागदपत्रे अपलोड करण्याची आवश्यकता नाही. पालकांना या प्रवेश प्रक्रियेत कोणतीही अडचण येऊ नये, म्हणून संपूर्ण बृहन्मुंबई क्षेत्रात 53 मार्गदर्शक मदत केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. पालकांनी संकेतस्थळावरील हेल्प डेस्क (Help Desk) या पर्यायावर Mumbai BMC हा जिल्हा निवडून या मदत केंद्रांची यादी पहावी. सदर केंद्रांवर मोफत अर्ज भरण्याची सुविधा असून त्याचा पालकांनी लाभ घ्यावा.

कसा अर्ज कराल?

जे पालक स्वत:हून तसेच इतर कोणत्याही ठिकाणाहून ऑनलाईन व मोबाईल ऍप (Mobile App) द्वारे अर्ज करु शकतात, त्यांना मदत केंद्रावर येण्याची आवश्यकता नाही. अर्ज करण्यापूर्वी पालकांनी संकेतस्थळावरील माहिती काळजीपूर्वक वाचावी. तसेच नंतरही या प्रवेश प्रक्रियेबाबत अद्ययावत माहिती जाणून घेण्यासाठी सदर संकेतस्थळाला वेळोवेळी भेटी द्याव्यात.ज्या बालकांनी यापूर्वी आरटीई 25 टक्के अंतर्गत शाळेत प्रवेश घेतला आहे, अशा बालकांना पुन्हा अर्ज करता येणार नाही. प्रवेश अर्ज भरताना याबाबत चुकीची माहिती भरुन पुन्हा प्रवेश घेतल्याचे आढळल्यास प्रवेश रद्द करण्यात येईल. प्रवेशासाठी लागणाऱ्या सविस्तर माहितीसाठी महानगरपालिकेच्या mcgm.gov.in तसेच महाराष्ट्र शासनाच्या student.maharashtra.gov.in या संकेतस्थळास भेट द्यावी, असे शिक्षणाधिकारी (प्र.) श्री. राजू तडवी यांनी महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने आवाहन केले आहे.

मुंबईतील पालकांना मोठा दिलासा

हे शैक्षणिक वर्ष पूर्ण होण्याआधीच हे पत्रक पालिकेकडून जाहीर करण्यात आल्याने पालकांची चिंता कमी झाली आहे. मुंबईतल्या खासगी शाळांची अव्वाच्या सव्वा फी लक्षात घेता. अनेक गरीब विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे. मोठ्या संख्येने पालकांवरील आर्थिक ताण कमी होणार आहे. ही प्रक्रिया ऑनलाईन पूर्ण करता येत असल्यानेही मोठा फायदा होणार आहे. पालकांचा यामुळे वेळ वाचणार नाही. शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर पालकांची प्रवेशासाठी जी वणवण होते, ती यामुळे टळली आहे.

आश्रमशाळेतील विद्यार्थिनी होणार ‘डॉक्टर”; बदलापूरच्या शबानाचा ‘एमबीबीएस’ला प्रवेश, जिल्हाधिकाऱ्यांकडून अभिनंदन

दहावी, बारावीच्या परीक्षेसाठी केंद्रांची संख्या वाढवली; वर्षा गायकवाड यांनी सांगिलला परीक्षेचा संपूर्ण प्लॅन

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु वीज वापरात लाखोंच्या घरात, किती लाखांचं वीजबिल?

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.